बहुप्रतिक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आजपासून उड्डाणे!

नवी मुंबई : बहुप्रतिक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ गुरुवारपासून म्हणजेच २५ डिसेंबर २०२५ रोजी अधिकृतपणे कार्यान्वित होणार आहे. यामुळे नवी मुंबई शहराची ओळख देशाच्या आणि विकसित राष्ट्रांच्या प्रवेशद्वारासारखी होणार आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आणि विविध समस्यांवर मात करून नवी मुंबई विमानतळाचे हे महत्त्वाकांशी प्रकल्प पूर्णत्वास आले आहे. बंगळूरुहून येणाऱ्या पहिल्या व्यावसायिक विमानाचे लँडिंग नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर होणार आहे. पहिल्याच दिवशी ४ हजारांहून अधिक प्रवासी प्रवास करणार असून, गोवा, कोची, दिल्ली आणि हैदराबाद या प्रमुख शहरांसाठी विमानसेवा सुरू होणार आहे.


या विमानतळावर पहिल्या टप्प्यात दररोज ३० ‘फ्लाइट अप-डाऊन' होतील, असे सांगण्यात आले.



९ कोटी प्रवाशांसाठी विमानतळ सज्ज


नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला २००७ मध्ये डीजीसीएकडून मान्यता मिळाली होती. त्यानंतर पर्यावरणीय अडथळे, जमीन संपादन, पुनर्वसन, कायदेशीर आणि तांत्रिक समस्यांचे मोठे आव्हान होते. पण या सर्व समस्यांवर मात करून विमानतळाचे काम पूर्ण झाले आहे. दीर्घकाळ चाललेल्या या प्रक्रियेनंतर विमानतळाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरल्याने नवी मुंबईसह संपूर्ण राज्यासाठी हा ऐतिहासिक क्षण मानला जात आहे. वार्षिक नऊ कोटी प्रवासी हाताळण्याची या विमानतळाची क्षमता आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील भार मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. यामुळे मुंबई महानगर क्षेत्रात आता दोन आंतरराष्ट्रीय विमानतळ उपलब्ध होणार असून, हवाई वाहतूक अधिक सुलभ आणि गतिमान होईल.


नवी मुंबई विमानतळ सुरू झाल्याने उद्योग-व्यवसाय, आयटी, लॉजिस्टिक्स, पर्यटन आणि सेवा क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. विमानतळालगत मोठ्या प्रमाणात एरोसिटी (Aero City) विकसित होणार असून, त्यामुळे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील आणि नवी मुंबईचा आर्थिक चेहरा पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची सुरुवात ही केवळ वाहतुकीची सुविधा नसून, विकासाचा नवा अध्याय आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या विमानसेवांमुळे नवी मुंबई देशाच्या नकाशावर अधिक ठळकपणे अधोरेखित होणार असून, ‘विकसित भारता'कडे नेणाऱ्या प्रवासात हा विमानतळ महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.



Comments
Add Comment

ShivendraRaje Bhonsle : मुंबई-गोवा महामार्गाचे 'मे' अखेरपर्यंत काम पूर्णत्वास; मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे विधानपरिषदेत आश्वासन

मुंबई : दरवर्षी होळी आणि गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या

Banjara Reservation : बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी अभ्यास समितीची स्थापना

मुंबई : मराठा आरक्षणासाठी ‘हैदराबाद गॅझेट’चा आधार घेतल्यानंतर, आता त्याच धर्तीवर बंजारा समाजाला अनुसूचित जमाती

Niranjan Davkhare : मुंबई-ठाणेकरांचा मेट्रो प्रवास लवकरच सुसाट! 'मेट्रो-४' प्रकल्पाच्या टप्प्याटप्प्याने उद्घाटनाचे सरकारचे नियोजन

मुंबई : मुंबई आणि ठाणे या जोडशहरांमधील प्रवास अधिक वेगवान आणि सुखकर करणाऱ्या 'मेट्रो-४' (ग्रीन लाईन) प्रकल्पाचे काम

Budget Session : कापूस खरेदीची मुदत १५ मार्चपर्यंत वाढविली

मुंबई : राज्यातील कापूस खरेदीची मुदत वाढवण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती. या अनुषंगाने पणन

Madhuri Misal : भटक्या श्वानांच्या उपद्रवावर राज्य सरकार मोठं पाऊल उचलणार; राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची सभागृहात घोषणा

शिक्षण संस्थांच्या सुरक्षिततेसाठी 'नोडल अधिकारी' नेमणार मुंबई : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सध्या

INS Anjdip : शत्रूला धडकी भरणार! 'आयएनएस अंजदीप' भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल

चेन्नई : आयएनएस अंजदीप, ही पाणबुडी विरोधी युद्धनौका , ‘शॅलो वॉटर क्राफ्ट (एएसडब्ल्यू-एसडब्ल्यूसी) प्रकल्पातील