गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश


कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन दिवस शोध मोहीम राबवून सुरक्षा पथकांनी गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार केले. हिडमाच्या मृत्यूनंतर गणेश उइके हा नक्षलवाद्यांचा एक मोठा नेता होता. सुरक्षा पथकांनी गणेश उइकेलाच माल्यामुळे आता नक्षलवादी कारवाया थंडावण्याची शक्यता वाढली आहे.


बेलघर पोलीस स्टेशन हद्दीतील गुम्मा वन क्षेत्रात झालेल्या चकमकीत दोन माओवादी नक्षलवादी ठार झाले. तर चकपड पोलीस स्टेशन हद्दीतील नारिग झोला वन क्षेत्रात झालेल्या दुसऱ्या चकमकीत आणखी तीन माओवादी नक्षलवादी ठार झाले.


नक्षलवादी गणेश उइकेवर १.१ कोटी रुपयांचे बक्षीस होते. गणेश उइके हा ओडिशातील नक्षलवादी संघटनेचा प्रमुख होता. गणेश व्यतिरिक्त चकमकीत सीपीआय माओवादी नक्षलवादी क्षेत्र समिती सदस्य बारी उर्फ ​​राकेश आणि दलम सदस्य अमृत यांचा मृत्यू झाला. बारी उर्फ ​​राकेश आणि दलम सदस्य अमृत या दोघांवर २३.६५ लाख रुपयांचे बक्षीस होते. एक महिला नक्षलवादीही चकमकीत ठार झाली पण तिची ओळख अद्याप पटलेली नाही.


गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीआधारे सुरक्षा दलाची २३ पथके, २० विशेष ऑपरेशन ग्रुप पथके, दोन CRPF पथके आणि एक BSF पथक यांनी संयुक्त मोहीम राबवली. सुरक्षा पथकांनी पाच नक्षलवादी ठार केले आणि शस्त्रसाठाही जप्त केला.


Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला