जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी

मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.


राज्यात उत्पादित झालेल्या डाळिंबाचे तीन कंटेनर वाशी येथील सुविधा केंद्रातून के.बी. एक्सपोर्ट्सचे चेअरमन प्रकाश खाखर यांनी नुकतेच ब्रिस्बेन- ऑस्ट्रेलिया, न्यूयॉर्क- अमेरिका, लॉस एंजेलिस- अमेरिका येथे निर्यात केले. या पार्श्वभूमीवर पणन मंत्री रावल यांनी प्रकाश खाखर यांचे अभिनंदन केले. त्यावेळी ते बोलत होते.


जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी सातत्याने वाढत आहे. राज्यात उत्पादित होणारा डाळिंब हा अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासह अन्य देशात निर्यात होत आहे. टप्प्याटप्प्याने इतर फळांची निर्यात करण्यासाठी पणन विभाग प्रयत्न करत आहे. यामुळे फळे व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या मेहनतीला जागतिक बाजारपेठेत स्पर्धात्मक मूल्य मिळेल. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासह अन्य देशांमध्ये कंटेनर रवाना होणे हे राज्याच्या कृषी-निर्यात व शेतकऱ्यांना उत्पन्नवाढीच्या दृष्टीने प्रोत्साहित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. येणाऱ्या काळात निर्यात सुविधा केंद्रातून मोठ्या क्षमतेने डाळिंब निर्यात केले जाणार असल्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Minister Chhagan Bhujbal : दुसऱ्या टप्प्यात जातनिहाय गणना होणार; मंत्री छगन भुजबळ यांना केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांचे पत्र

जातीनिहाय जनगणनेचा संभ्रम दूर मुंबई : जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील प्रश्नावलीत ओबीसींचा कॉलम नसल्याने

State Government : व्यावसायिक हेतूने होणाऱ्या शाळांच्या स्थलांतराला ब्रेक; राज्य सरकारकडून नवे धोरण जाहीर

 कमी पटसंख्येच्या शाळांना स्थलांतराच्या प्रक्रियेतून पूर्णपणे वगळले मुंबई : राज्यातील शाळांच्या

Uddhav Thackeray Eknath Shinde : "आम्ही इथे रिकामे बसलो नाही, नेत्यांना आवरा!" 'त्या' एका विनंतीने खंडपीठाची ठाकरे गटाला चपराक

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयात आज महाराष्ट्राच्या राजकारणाचे भवितव्य ठरवणाऱ्या अत्यंत

साताऱ्यातून मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा : पुढील वर्षी १५ लाख घरांचे वितरण

कर्जमाफी, शेतकरी मदत आणि ‘लखपती दीदी’ अभियानालाही वेग देणार सातारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या

युवकांचा अवमान सहन करणार नाही, संजय राऊत माफी मागा

युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांचा इशारा देशातील युवक सुसंस्कृत, राऊतच मंद झालेत ठाणे : देशातील

महाराष्ट्रात भारनियमन इतिहासजमा होणार - 'मॅजेस्टिक' योजनेला मंजुरी

 जागतिक बँकेच्या सहकार्याने वीज यंत्रणेचे आधुनिकीकरण करणार मुंबई : राज्यातील उद्योगांना आणि सर्वसामान्य