महामार्गावर मोठा अपघात, अवघ्या काही सेकंदात १७ जण होरपळले


चित्रदुर्ग : कर्नाटकमधील चित्रदुर्ग गुरुवारी पहाटे महामार्गावर मोठा अपघात झाला. अवघ्या काही सेकंदात १७ जणांचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेत १५ पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.





राष्ट्रीय महामार्ग ४८ वर भरधाव लॉरीने दिलेल्या धडकेमुळे बसने पेट घेतला आणि अवघ्या काही क्षणात या आगीने रौद्र रूप धारण केल्याने मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. हा अपघात चित्रदुर्ग जिल्ह्यातील हिरियुर परिसरात झाला.


बंगळुरूहून शिवमोगाच्या दिशेने सीबर्ड कोच ही खासगी स्लीपर बस ३२ प्रवाशांना घेऊन जात होती. बसला समोरून येणाऱ्या एका वेगवान लॉरीने दुभाजक ओलांडत धडक दिली. अपघातामुळे बसच्या डिझेल टाकीचा स्फोट झाला आणि बसने पेट घेतला.


पलिकडच्या बाजूने जात असलेल्या लॉरीच्या चालकाने नियंत्रण गमावले. यामुळे लॉरी दुभाजक ओलांडत समोरून बसला जोरात धडकली. बसची डिझेल टाकी जिथे असते त्याच भागाला थेट धडक बसली. यामुळे बसने क्षणार्धात पेट घेतला, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.


Comments
Add Comment

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने