मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार


मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील इच्छुक उमेदवारांच्या अंगात शंभर हत्तीचे बळ आल्याचे बोलले जात आहे. परंतु, ज्यांनी मनसेची साथ सोडून उबाठामध्ये प्रवेश केला, त्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे काय, असा सवाल उपस्थित होत आहे. ज्या मनसेवर टिका केली आणि तेथील वर्तणुकीमध्ये पक्ष सोडत उबाठा गटाची साथ धरली. त्या मनसेची मदत आता कशी घेतली जाणार, असाही सवाल उपस्थित होत आहे. त्यातच मनसेतून उबाठा गटात गेलेल्यांना उमेदवारी देवू नये, याबाबत राज ठाकरे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.


मनसेची स्थापना झाल्यानंतर शिवसेनेतील अनेकांनी त्या पक्षात प्रवेश देत राज ठाकरेंची साथ दिली. परंतु, २०१७ नंतर मनसेची ताकद मुंबईत कमी होवू लागल्यानंतर तसेच पक्ष संघटना वाढवण्याकडे कल नसल्याचे दिसून आल्यानंतर अनेकांनी मनसेची साथ सोडली. यामध्ये वांद्र्यातील अखिल चित्रे, बोरीवलीतील चेतन कदम, नितीन नांदगावकर, किर्तीकुमार शिंदे, धारावीतील हर्षला मोरे, जोगेश्वरी गोरेगावमधील सुगंधा शेट्ये आदींनी उबाठा गटामध्ये मनसेला सोडून उबाठा गटात प्रवेश केला आणि उबाठा गटातून कामाला सुरुवात केली. परंतु, आता मनसेच एकत्र आल्यामुळे पक्ष सोडून उबाठात गेलेल्यांचे काय होणार?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.


अखिल चित्रे, सुगंधा शेट्ये, हर्षला मोरे तसेच चेतन कदम यांची पत्नी आता इच्छुक उमेदवारांच्या चर्चेत आहे. त्यामुळे आता जिंकण्यासाठी ही मंडळी मनसेची मदत कशी घेणार आणि आपला पक्ष सोडून जात आपल्याच पक्षावर नाराजी व्यक्त करणाऱ्यांना मनसैनिक कशी मदत करणार हाही प्रश्न उपस्थित होत आहे. या मनसेतून उबाठात आलेल्यांमुळे उबाठातील प्रस्थापितांच्या जागा गेल्या आहेत. त्यामुळे आधी मनसेला जागा सोडल्यामुळे नाराजी आहेतच त्यात मनसेतून आलेल्यांना उबाठाकडून तिकीट दिले जात असल्याने ही नाराजी तळाला अधिकच वाढली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे उबाठामध्ये मनसेतून गेलेल्यांना तिकीट देवून नये किंवा त्यांना तिकीट दिल्यास आम्ही मतदान करणार नाही किंवा त्यांना मदतही करणार नाही, अशा प्रकारचे वातावरण तयार होण्याची दाट शक्यता असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे मनसेतून उबाठात गेलेल्यांना उमेदवारी देवू नये, अशा प्रकारच्या सूचना आता राज ठाकरे यांच्याकडून दिल्या जातात का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Comments
Add Comment

रविवार १ मार्चला मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक; रेल्वेसेवा बघूनच घराबाहेर पडा

मुंबई : दररोज मुंबईच्या उपनगरीय रेल्वेतून लाखो प्रवासी प्रवास करतात. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि

मुंबईतील महापालिका प्रकल्प कामांना मिळणार गती, पुढील महिन्यात ताब्यात येणार १५०० प्रकल्पबाधितांसाठीच्या सदनिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : प्रकल्पबाधित नागरिकांच्या पुनर्वसनासाठी मुंबईतील महापालिकेच्या प्रत्येक प्रशासकीय

मनरेगा मजुरांची होळी होणार आनंदात साजरी

केंद्राकडून १,१३८ कोटींची थकीत मजुरी मंजूर केंद्र सरकारकडून तब्बल ११३८ कोटी रुपयांची थकीत मजुरी राज्याला

'मुलांनी आणि तरुणांनी मराठी भाषा विसरू नये'

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : इतर भाषांच्या प्रभावाखाली मराठी भाषा हळूहळू नाहीशी होईल, अशी भीती व्यक्त केली जाते. पण,

'या' तारखेला दिसणार महराष्ट्रात खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार

मुंबई : यावर्षी जगात २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण दिसत असली, तरी भारतातून ३ मार्च २०२६ रोजी दिसणारे केवळ एकच

उच्च व तंत्रशिक्षण मध्ये पदभरती प्रक्रियेत बदल करण्याच्या सूचनेचा विचार करू – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई : शालेय शिक्षण विभागातील शिक्षकांप्रमाणेच उच्च व तंत्रशिक्षणमध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत शासन