नवी मुंबई विमानतळाला लवकरच दि.बा. पाटील यांचे नाव - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन

मुंबई : बहुचर्चित नवी मुंबई विमानतळाला ‘लोकनेते स्व. दि. बा. पाटील’ यांचे नाव देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे. त्याला मान्यता मिळून लवकरच या विमानतळाचे नामकरण होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिली.


मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंत्रालयात माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले, "नवी मुंबई विमानतळ उद्यापासून सेवेत येत आहे, याचा मला आनंद आहे. या विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे पाठवला आहे. तो प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे, त्यावर कारवाई चाललेली आहे. आम्ही त्यासंदर्भात केंद्रातल्या सर्व नेत्यांनाही भेटलो असून पंतप्रधानांनीही त्याबाबतचे सुतोवाच केले आहे. त्यामुळे या प्रस्तावाला मान्यता मिळेल आणि लवकरच या विमानतळाचे नाव हे दिबा पाटील विमानतळ होईल," असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत वाहतूक नियोजनात बदल; काही मार्गांवर प्रवेश मर्यादित

मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकांसाठी उद्या मतदान होणार असून, या प्रक्रियेच्या सुरळीत अंमलबजावणीसाठी

मशीदीवरचे भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देऊन उद्धव ठाकरेंनी प्रचार केला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप; कुणाचाही महापौर झाला तरी आम्ही भोंग्यांना परवानगी देणार नाही मुंबई :

संक्रांतीच्या उत्सवाला गालबोट; अहिल्यानगर जिल्ह्यात पतंग उडवताना चिमुकल्याचा....

अहिल्यानगर : मकर संक्रांतीच्या दिवशी आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यात एक हृदयद्रावक

BMC Election 2026 : महापालिका निकाल प्रक्रियेत बदल; मुंबईत मतमोजणीसाठी नव्या नियमांची अंमलबजावणी

मुंबई : राज्यात महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. १५ जानेवारी रोजी मतदान