‘टोमणे मारण्यापेक्षा त्यांनी आत्मपरीक्षण करावे’

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उबाठावर निशाणा 


‘सच्चा जिता, हार गया झूठा, जनताने दिया उबाठा को जमालगोटा’!


मी झोपायला नाही, झोप उडवायला आलोय


मुंबई : 'टोपणे मारण्यापेक्षा त्यांनी आत्मपरीक्षण करावे' फेसबुक लाईव्ह करून शिवसेना वाढली असता का? कोण असली आणि कोण नकली, हे जनतेने दाखवून दिले, असे स्पष्ट करत शिवसेना मुख्यनेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठावर निशाणा साधला.


आम्ही अनेक योजना आणल्या, विकासाला चालना दिली. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांच्या मतांची बेरीज केली तरी एकट्या शिवसेनेची मते जास्त आहेत. हा विजय इतिहास घडवणारा आहे. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेबांच्या विचारांची आहे", याची आठवणही शिंदे यांनी करून दिली.


स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विजयाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्यात बोलताना शिंदे यांनी उबाठावर जोरदार टीका केली. २५ वर्षे सत्तेत असणाऱ्या उबाठासाठी मुंबई सोन्याची अंड देणारी कोंबडी होती. कोविडमधला खिचडी घोटाळा, बनावट कोविड सेंटर, बॉडीबॅग घोटाळे करणाऱ्यांना मुंबईकर त्यांची जागा दाखवतील. सच्चा जिता, हार गया झूठा, जनताने दिया उबाठा को जमालगोटा’, अशी शायरी करीत ठाकरेंची खिल्ली उडवली. 'मी झोपायला नाही, झोप उडवायला आलोय', असा इशारा त्यांनी दिला. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये महायुतीचाच विजय होईल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.


शिवसेनेचा चांदा ते बांदा विस्तार


नगर परिषद निवडणुकांबाबत बोलताना शिंदे यांनी शिवसेनेचा चांदा ते बांदा विस्तार झाल्याचे सांगितले. "लोकसभेत आमचा स्ट्राईक रेट सर्वाधिक होता, विधानसभेतही चांगला होता. कमी जागा लढून जास्त जिंकल्या. आमदार नसलेल्या ठिकाणीही नगराध्यक्ष निवडून आले. राज्यात ६२ नगराध्यक्ष आहेत, हा आकडा ७० पर्यंत जाईल. यात ३३ लाडक्या बहिणी नगराध्यक्ष झाल्या. उबाठा आणि महाविकास आघाडीने कार्यकर्ते वाऱ्यावर सोडले होते. जे घरी बसले, त्यांना जनतेने कायमचे घरी बसवले. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांच्या नगराध्यक्षांपेक्षा शिवसेनेचे जास्त आहेत. सर्वसामान्यांची नाळ शिवसेनेला जोडलेली आहे, ती कधीच तुटणार नाही. शिवसेनेला हरवणे अशक्य आहे", असेही एकनाथ शिंदे म्हणाले.



Comments
Add Comment

३ इडियट्सचे १६ वर्षे: ५ कारणे ज्यामुळे राजकुमार हिरानींचा 'हा' चित्रपट आजही तितकाच ताजा वाटतो

मुंबई : राजकुमार हिरानी हे मोजक्या अशा फिल्ममेकर्सपैकी आहेत, ज्यांच्या कथा केवळ मनोरंजन करत नाहीत, तर दीर्घकाळ

आधी रेकी, मग बुरखा घालून दरोडा; उच्चभ्रू परिसरात भरदिवसा चोरी

नवी मुंबई : नवी मुंबईतील सीवूड्स परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या सशस्त्र दरोड्याच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

चहा बनवण्याची योग्य पद्धत,पित्त व ॲसिडिटीच्या त्रासापासून मिळेल कायमची सुटका

मुंबईकरांच्या दिवसाची सुरुवाट होतो ती म्हणजे चहाने ... भारतातच नाही तर संपूर्ण जगात असंख्य असे चहा प्रेमी आहेत .

श्रीराम लाईफ इन्शुरन्समधून पिरामल फायनान्स बाहेर पडणार 'या' कारणामुळे,६०० कोटीचा एकूण सौदा जाहीर

मुंबई: पिरामल फायनान्स लिमिटेड (Piramal Finance Limited) कंपनीने श्रीराम लाईफ इन्शुरन्स कंपनीतील आपला संपूर्ण १४.७२% हिस्सा

या वर्षीचा ख्रिसमस ठरतोय खास का ? जाणून घेऊया कारण

अंकांचा अनोखा योग जुळून आला आहे .तारीख बघा २५ /१२/२५ आहे ना आश्चर्यकारक डिसेंबर महिना सुरु झाला की सर्वांना आतुरता

उच्च रक्तदाबाने हैराण झाला आहात? मग रोज खा सुकं खोबर

रोज जेवण बनवताना वेगवेगळ्या पदार्थांचा वापर केला जातो.त्यामध्ये आवर्जून वापरला जाणारा पदार्थ म्हणजे