भारताने अल्प किंवा दीर्घकालीन युद्धासाठी तयार राहावे: तिन्ही संरक्षण दलांचे प्रमुख जनरल अनिल चौहान

मुंबई : दहशतवाद रोखण्यासाठी आणि शेजारी राष्ट्रांबरोबर असलेल्या प्रादेशिक वादाच्या पार्श्वभूमीवर भारताने उच्च तीव्रतेचे अल्पकालीन आणि दीर्घकालीन युद्धासाठी नेहमी तयार असले पाहिजे, असे महत्त्वाचे विधान भारताच्या तिन्ही संरक्षण दलांचे प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी केले. आशियातील सर्वात मोठ्या तंत्रज्ञान महोत्सवांपैकी एक असलेल्या आयआयटी मुंबईच्या टेकफेस्ट कार्यक्रमात बोलताना चौहान यांनी भविष्यातील बदलते युद्धांचे स्वरूप, तंत्रज्ञान आणि सामरिक दृष्टिकोनावर भाष्य केले.


अनिल चौहान यांनी पाकिस्तान आणि चीन यांचे नाव न घेता म्हटले की, भारताने कोणत्या प्रकारचे धोके आणि आव्हानांसाठी तयार असले पाहिजे? हे दोन तथ्यांवर आधारित असले पाहिजे. आपल्या शेजारचे दोन्ही देश अण्वस्त्रधारी देश आहेत. म्हणून आपण त्या पातळीपर्यंत प्रतिबंधकतेचे उल्लंघन होऊ देता कामा नये.


बदलत्या युद्धशैलीबाबतही चौहान यांनी भाष्य केले. ते म्हणाले, युद्धभूमी आता केवळ जमिनीपुरती मर्यादित राहिलेली नाही. युद्धक्षेत्राचा विस्तार आता अनेक क्षेत्रांपर्यंत झाला आहे. तंत्रज्ञानामुळे युद्धात क्रांतिकारक बदल घडले आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, हायपरसॉनिक शस्त्रे, प्रगत सेन्सर्स आणि डेटा विश्लेषणामुळे युद्ध अधिक वेगवान आणि बुद्धिमान बनत आहे. मानव विरुद्ध मानव याऐवजी मशीन विरुद्ध मशीन अशी युद्धाची दिशा झुकत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

मुंबईत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी 'फायर अलर्ट' जारी; हॉटेल्स, पब्स आणि मॉल्सची झाडाझडती सुरु

मुंबई : थर्टी फर्स्ट जवळ येतोय, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई हळू हळू सज्ज होत असतानाच, मुंबईकरांच्या

या वर्षीचा ख्रिसमस ठरतोय खास का ? जाणून घेऊया कारण

अंकांचा अनोखा योग जुळून आला आहे .तारीख बघा २५ /१२/२५ आहे ना आश्चर्यकारक डिसेंबर महिना सुरु झाला की सर्वांना आतुरता

Ashish Shelar : "विठ्ठलाला घेरणाऱ्या बडव्यांशी आता गळ्यात गळे का?"; आशिष शेलारांचा राज-उद्धव युतीवर जहरी प्रहार!

शेलारांचा 'लाव रे तो व्हिडिओ' स्टाईलने पलटवार मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या आगामी रणसंग्रामासाठी राजकीय

Navnath Ban : "हे ऐतिहासिक पर्व नाही, तर पराभवाची नांदी!"; नवनाथ बन यांचा संजय राऊतांवर घणाघाती हल्ला, मुंबई लुटणाऱ्यांना सुनावले खडेबोल

मुंबई : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या संभाव्य युतीवर राजकीय

सावित्रीबाई फुले, संत सावता स्मारकांचा मार्ग मोकळा

भूसंपादन तातडीने पूर्ण करण्याचे जयकुमार गोरेंचे निर्देश मुंबई : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व संत सावता

‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य नव्हे, आत्ता जीव वाचवणे महत्वाचे’

बांगलादेशात लोकशाहीचा चौथा स्तंभ धोक्यात ढाका : बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेचा सर्वाधिक फटका आता