मका, ज्वारी खरेदी-नोंदणी प्रक्रियेस मुदतवाढ

शेतकऱ्यांना ३१ डिसेंबरपर्यंत संधी


मुंबई : खरीप हंगाम २०२४–२५ अंतर्गत शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान व मका, ज्वारी, रागीसह भरड धान्य खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यास ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबत राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.
राज्यातील अनेक शेतकऱ्यांना विविध तांत्रिक अडचणी, कागदपत्रांची पूर्तता तसेच इतर कारणांमुळे वेळेत नोंदणी करता आली नव्हती. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, आदिवासी विकास महामंडळ तसेच विविध जिल्हा स्तरावरून नोंदणीस मुदतवाढ देण्याबाबत मागणी करण्यात आली होती. या मागणीचा सकारात्मक विचार करून राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी शासनाच्या वतीने हा निर्णय घेतला आहे.खरीप पणन हंगाम २०२४–२५ मध्ये धान व मका, ज्वारी, रागीसह भरड धान्य खरेदीसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करणे अनिवार्य आहे. नोंदणी पूर्ण केलेल्या पात्र शेतकऱ्यांकडूनच शासनामार्फत आधारभूत किंमतीने धान्याची खरेदी करण्यात येणार आहे. शासन निर्णयानुसार, शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करून शेतकऱ्यांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
या निर्णयामुळे राज्यातील धान व मका, ज्वारी, रागीसह भरड धान्य उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, अधिकाधिक शेतकऱ्यांना शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घेता येणार आहे. शेतकऱ्यांनी दिलेल्या मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह आपली ऑनलाईन नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Poisonous Snakes : मान्सूनमध्ये वाढतो 'या' ४ सापांचा वावर; कोणते आहेत हे जीवघेणे सर्प?

मुंबई : पावसाळा सुरू होताच निसर्ग हिरवागार होतो, मात्र त्याचवेळी विषारी सापांचा (Poisonous Snakes) वावरही मोठ्या प्रमाणात

Mhada: म्हाडातर्फे १३ जुलै रोजी १९ वा लोकशाही दिन साजरा होणार

मुंबई(Mumbai) : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (Mhada) एकोणीसावा लोकशाही दिन सोमवार १३ जुलै २०२६

Government of Maharashtra : 'आपत्तीवर वॉर मोड'! पावसाळी संकटाशी लढण्यासाठी महाराष्ट्र शासन सज्ज; मोशी, पालघरसह राज्यभर बचावकार्य वेगात

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूर, भूस्खलन आणि इतर नैसर्गिक आपत्तींच्या

Water Management : धरण ओव्हरफ्लो, तरी पाणीटंचाई कायम!

मुंबई(Mumbai) : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरण क्षेत्रांत पावसाने दमदार सुरुवात केली आहे. त्यामुळे धरणातील

Weather Update : बंगालच्या उपसागरातील ढग निवळले,राज्यातील पावसाचा जोर ओसरणार; पुणे, सातारा घाटमाथ्याला 'ऑरेंज अलर्ट'

मुंबई(Mumbai) : राज्यात गेल्या काही दिवसांपासून थैमान घालणाऱ्या पावसाचा जोर आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. मात्र,

Central Railway : लोणावळा–कर्जत रेल्वेमार्गावरील भूस्खलनाचा मोठा परिणाम! डेक्कन क्वीनसह अनेक एक्सप्रेस गाड्या १७ जुलैपर्यंत रद्द

मुंबई : मुसळधार पावसामुळे लोणावळा–कर्जत घाट विभागात झालेल्या भीषण भूस्खलनाचा फटका मध्य रेल्वेच्या वाहतुकीला