दिल्लीतील प्रदूषणावर निर्णायक कारवाई

८०० कारखाने बंद करण्याचा दिल्ली सरकारचा निर्णय


नवी दिल्ली : दिल्लीतील प्रदूषणावर निर्णायक कारवाई करण्याच्या दृष्टीने मोठी पावले उचलली जात असून, दिल्लीतील ८०० कारखाने बंद करण्याचा निर्णय दिल्ली मंत्रिमंडळाचा मंगळवारी घेतला.


मुख्यमंत्री कार्यालयात झालेल्या मंत्रिमंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत पर्यावरण संरक्षण आणि पायाभूत सुविधा बळकट करण्यासंबंधी अनेक कडक निर्णय घेण्यात आले. पर्यावरणाची हानी करणाऱ्यांना आता कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असे यावेळी पर्यावरण मंत्री मनजिंदर सिंग यांनी स्पष्ट केले.


दिल्लीतील सुमारे ५० टक्के बससेवा डीआयएमटीएसकडून चालवली जात होती, मात्र ही व्यवस्था आता संपुष्टात आणण्यात आली आहे. पुढे राजधानीतील सर्व बससेवा पूर्णपणे डीटीसीकडूनच चालवली जाणार आहे. यामुळे बस मार्गांचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता येईल आणि प्रवाशांना चांगली सेवा मिळेल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला. इलेक्ट्रॉनिक कचऱ्याच्या वाढत्या समस्येवर उपाय म्हणून दिल्ली सरकार होलंबी कला येथे भव्य ई-वेस्ट प्रक्रिया केंद्र उभारणार आहे. डीपीसीसीने ४११ उद्योगांना क्लोजर नोटीस बजावली, तर पालिकेने ४०० उद्योग सील केले.

Comments
Add Comment

NSG in Ayodhya : अयोध्येत NSG चे सातवे प्रादेशिक केंद्र सप्टेंबरपासून सुरू होणार

अयोध्या : उत्तर प्रदेशमध्ये अयोध्येत NSG चे (National Security Guard) सातवे प्रादेशिक केंद्र सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

105 indians missing nepal flood : नेपाळमध्ये महापुराचा हाहाकार : १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता; मानसरोवर यात्रेकरूंचाही समावेश, बचावकार्य तीव्र

काठमांडू : नेपाळमध्ये (Nepal Flood) आलेल्या भीषण महापुरामुळे प्रचंड प्रमाणात वित्त आणि जीवितहानी झाली आहे. या नैसर्गिक

India 1500 km missile Private Company : संरक्षण क्षेत्रात मोठा निर्णय : मोदी सरकारकडून १५०० किमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्र निर्मितीसाठी खासगी कंपन्यांना हिरवा कंदील!

नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण क्षमतेला अधिक मजबूत करण्यासाठी मोदी सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. संरक्षण

Women's Equality Day : जाणून घ्या २६ ऑगस्ट 'महिला समानता दिन' म्हणून का साजरा केला जातो?

मुंबई : २६ ऑगस्ट हा दिवस महिला समानता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पण हा दिवस फक्त महिलांना मिळालेली समानता

‘Misuse of powers’: राजस्थान उच्च न्यायालयात वादळ! प्रभारी मुख्य न्यायमूर्तींवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; SC चे न्यायमूर्ती संदीप मेहता यांचे सरन्यायाधीशांना पत्र

नवी दिल्ली : राजस्थान उच्च न्यायालयातील अंतर्गत वाद आणि गैरव्यवहाराचे प्रकरण आता थेट सर्वोच्च न्यायालयाच्या

Chhattisgarh Social Boycott : एकाच गावातील ३१ जणांचा सामाजिक बहिष्कार; ७ लहान मुलांचाही समावेश, अतिक्रमणाच्या आरोपाची शिक्षा?

धमतरी : छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यातील तर्रागोंदी गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुटुंबातील तब्बल ३१