दिल्लीतील प्रदूषणावर निर्णायक कारवाई

८०० कारखाने बंद करण्याचा दिल्ली सरकारचा निर्णय


नवी दिल्ली : दिल्लीतील प्रदूषणावर निर्णायक कारवाई करण्याच्या दृष्टीने मोठी पावले उचलली जात असून, दिल्लीतील ८०० कारखाने बंद करण्याचा निर्णय दिल्ली मंत्रिमंडळाचा मंगळवारी घेतला.


मुख्यमंत्री कार्यालयात झालेल्या मंत्रिमंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत पर्यावरण संरक्षण आणि पायाभूत सुविधा बळकट करण्यासंबंधी अनेक कडक निर्णय घेण्यात आले. पर्यावरणाची हानी करणाऱ्यांना आता कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असे यावेळी पर्यावरण मंत्री मनजिंदर सिंग यांनी स्पष्ट केले.


दिल्लीतील सुमारे ५० टक्के बससेवा डीआयएमटीएसकडून चालवली जात होती, मात्र ही व्यवस्था आता संपुष्टात आणण्यात आली आहे. पुढे राजधानीतील सर्व बससेवा पूर्णपणे डीटीसीकडूनच चालवली जाणार आहे. यामुळे बस मार्गांचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता येईल आणि प्रवाशांना चांगली सेवा मिळेल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला. इलेक्ट्रॉनिक कचऱ्याच्या वाढत्या समस्येवर उपाय म्हणून दिल्ली सरकार होलंबी कला येथे भव्य ई-वेस्ट प्रक्रिया केंद्र उभारणार आहे. डीपीसीसीने ४११ उद्योगांना क्लोजर नोटीस बजावली, तर पालिकेने ४०० उद्योग सील केले.

Comments
Add Comment

इस्रोच्या ब्लूबर्ड ब्लॉक-2 चे यशस्वी प्रक्षेपण

श्रीहरिकोटा : भारतीय अवकाश संशोधन संस्थाने नुकतेच एका ऐतिहासिक मोहिमेचे प्रक्षेपण केले आहे. श्रीहरिकोटा येथील

राजस्थानातील १५ गावांमध्ये महिलांना स्मार्टफोन वापरण्यास बंदी

पंचायतीच्या ‘तुघलकी’ फरमानावरून उलट-सुलट चर्चा जालोर : राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि अजब

बडगाम NIA न्यायालयाचा मोठा निर्णय, अमेरिकेत राहणाऱ्या काश्मिरी लॉबिस्टची जमीन जप्त

बडगाम : जम्मू काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातल्या एनआयए कोर्टाने मंगळवारी एक मोठा निर्णय दिला. अमेरिकेत राहणाऱ्या

पोलिसांसमोर २२ नक्षलवादी आले शरण

मलकानगिरी : मलकानगिरी जिल्ह्यात ओडिशा पोलिसांसमोर २२ नक्षलवादी शरण आले. आपल्या हातातील शस्त्र टाकून माओवादी

एनआयए प्रमुख सदानंद दाते होणार महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत अतिरेकी हल्ला केला होता. या

Bangladesh High Commission Protests Delhi : हिंदूंवरील अत्याचाराचे दिल्लीत तीव्र पडसाद; संतप्त हिंदू संघटनांचा बांगलादेशी उच्चायुक्तालयावर धडक मोर्चा

नवी दिल्ली : शेजारील देश बांगलादेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या भीषण हिंसाचाराचे आणि हिंदू