दिल्लीतील प्रदूषणावर निर्णायक कारवाई

८०० कारखाने बंद करण्याचा दिल्ली सरकारचा निर्णय


नवी दिल्ली : दिल्लीतील प्रदूषणावर निर्णायक कारवाई करण्याच्या दृष्टीने मोठी पावले उचलली जात असून, दिल्लीतील ८०० कारखाने बंद करण्याचा निर्णय दिल्ली मंत्रिमंडळाचा मंगळवारी घेतला.


मुख्यमंत्री कार्यालयात झालेल्या मंत्रिमंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत पर्यावरण संरक्षण आणि पायाभूत सुविधा बळकट करण्यासंबंधी अनेक कडक निर्णय घेण्यात आले. पर्यावरणाची हानी करणाऱ्यांना आता कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असे यावेळी पर्यावरण मंत्री मनजिंदर सिंग यांनी स्पष्ट केले.


दिल्लीतील सुमारे ५० टक्के बससेवा डीआयएमटीएसकडून चालवली जात होती, मात्र ही व्यवस्था आता संपुष्टात आणण्यात आली आहे. पुढे राजधानीतील सर्व बससेवा पूर्णपणे डीटीसीकडूनच चालवली जाणार आहे. यामुळे बस मार्गांचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता येईल आणि प्रवाशांना चांगली सेवा मिळेल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला. इलेक्ट्रॉनिक कचऱ्याच्या वाढत्या समस्येवर उपाय म्हणून दिल्ली सरकार होलंबी कला येथे भव्य ई-वेस्ट प्रक्रिया केंद्र उभारणार आहे. डीपीसीसीने ४११ उद्योगांना क्लोजर नोटीस बजावली, तर पालिकेने ४०० उद्योग सील केले.

Comments
Add Comment

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने

JEE Mains Response Sheet 2026 : जेईई (मुख्य) सत्र १ ची उत्तरतालिका आणि रिस्पॉन्स शीट आज जाहीर; 'असा' तपासा तुमचा स्कोअर

नवी दिल्ली : अभियांत्रिकी (Engineering) प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या जेईई (मुख्य) JEE Main 2026 (सत्र १) परीक्षेची

Sunetra Pawar : मोठी बातमी! सुनेत्रा पवारांना मोदी-शहांचे निमंत्रण; दिल्लीत राजकीय हालचालींना वेग!

मुंबई : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली असली तरी,

देशात पुन्हा परतणार पाऊस; 'या' ९ राज्यात वादळी वाऱ्यासह दमदार पावसाची हजेरी

नवी दिल्ली : देशातील बहुतांश राज्यात फेब्रुवारीत एरवी पाऊस पडत नाही. पण बदलत्या हवामानाचा परिणाम नागरिकांच्या