चाउमीन, पिझ्झा-बर्गर.. फास्ट फूडच्या अतिसेवनाने आतड्यांना छिद्र, ११ वीच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू

अमरोहा : एखाद्या गोष्टीच अतिव्यसन हे नेहमीच जीवघेणं ठरत. अश्याच एका अति फास्ट फूड (जंक फूड) व्यसनाने उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील एका अकरावीत शिकणाऱ्या मुलीचा मृत्यू झाला आहे.


रविवारी (२१ डिसेंबर) रात्री दिल्लीतील एम्समध्ये उपचारादरम्यान या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला . अहाना ही अमरोहा शहरातील मोहल्ला अफगाण येथील रहिवासी. अहानाच्या कुटुंबात आई-वडील आणि एक बहीण, भाऊ देखील आहेत. अहाना ही भावंडांमध्ये सर्वात लहान होती. ती शहरातील हाश्मी गर्ल्स इंटर कॉलेजमध्ये अकराव्या वर्गात शिकत होती. कुटुंबातील सदस्यांच्या मते, अहानाला फास्ट फूड ची खूप आवड होती. तिला बऱ्याचदा यासाठी मनाई करण्यात आली. समजावण्यात आलं, तरी ती चाउमीन, मॅगी, पिझ्झा आणि बर्गर सारखे फास्ट फूड पदार्थ सतत खात राहिली. त्यानंतर सप्टेंबरमध्ये अहानाची तब्येत बिघडली.


३० नोव्हेंबर रोजी तिला पोटात तीव्र वेदना होत होऊ लागल्या म्हणून मुरादाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सांगितलं की, तिच्या आतड्या एकमेकांना चिटकल्या आहेत आणि त्यात छिद्रही झाले आहेत. फास्ट फूडच्या सेवनामुळे आतड्यांचे नुकसान झाल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं.


त्यानंतर ३ डिसेंबरला अहानावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. दहा दिवसांनंतर, अहानाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, अहानाची ही दिवसेंदिवस अशक्त होत चालली होती. चार दिवसांपूर्वी तिची प्रकृती पुन्हा बिघडली. त्यानंतर तिच्या कुटुंबाने तिला दिल्लीतील एम्समध्ये दाखल केले. कुटुंबातील सदस्यांच्या मते, अहानाची प्रकृती थोडी सुधारली होती आणि ती चालायलाही लागली होती. पण, रविवारी रात्री तिची प्रकृती अचानक बिघडली आणि तिचं हृदय बंद पडलं. आहानाचे मामा गुलजार खान उर्फ गुड्डू यांनी सांगितले की, फास्ट फूडच्या सेवनामुळे आतड्यांचे नुकसान झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले. अहानाच्या मृत्यूनंतर तिचं कुटुंब शोकाकूल झालं आहे

Comments
Add Comment

Waterfall Trip : धबधब्याखाली भिजायचंय? मग हे 5 वॉटरप्रूफ गॅझेट्स नक्की सोबत ठेवा

वॉटरफॉल ट्रिपची तयारी झाली? धबधब्याखाली (Waterfall) मनसोक्त भिजण्याचा आनंद घ्या, पण तुमचा फोन, गॅझेट्स (Gadgets) आणि

Totapuri mango : तोतापुरी आंबा क्षेत्राच्या सर्वसमावेशक मूल्यांकनासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे निर्देश

नवी दिल्ली : आंध्रप्रदेशातील तोतापुरी आंबा उत्पादकांना भेडसावणाऱ्या आव्हानांचे परीक्षण करण्यासाठी आणि या

PM Internship Scheme : प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना तिसऱ्या टप्प्यात तरुणांसाठी मोठी संधी

पुणे : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (PMIS) २०२६ च्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली असून

Anti Terror Operation : जैशच्या ८ संशयित दहशतवाद्यांना अटक

गुजरात : देशाची सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली असून, गुजरात एटीएस (Gujarat ATS) आणि दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) केलेल्या

Indian Armed Forces: संरक्षण दलांची युद्धसज्जता वाढवण्यासाठी 52,000 कोटी रुपयांच्या भांडवली खरेदी प्रस्तावांना मंजुरी

नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली 03 जुलै 2026 रोजी झालेल्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने

Indus Waters Treaty : दहशतवादाला मदत आणि प्रोत्साहन देणार्‍या पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित

नवी दिल्ली : भारताने (India) पुन्हा एकदा पाकिस्तानच्या दुटप्पी धोरणावर आणि सीमापार दहशतवादाला मिळणाऱ्या