भारताने मुरीदकेत हल्ला केला तर चूक काय? पाकिस्तानी मौलानांचा आर्मी चीफ मुनीरांना थेट सवाल

कराची : कराचीतील ल्यारी भागात बसून पाकिस्तानचे ज्येष्ठ धर्मगुरू आणि जमियत उलेमा-ए-इस्लाम (फजल)चे अध्यक्ष मौलाना फजलूर रहमान यांनी थेट पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना सवाल करत देशाच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. भारताने मुरीदके येथे कारवाई केली, तर त्यात चूक काय, असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला.


२१ डिसेंबर २०२५ रोजी कराची येथे झालेल्या ‘तहफ्फुज दीनिया मदारीस कॉन्फरन्स’मध्ये मौलाना फजलूर रहमान मुख्य वक्ते म्हणून सहभागी झाले होते. या सभेत त्यांनी लष्कराच्या धोरणांवर, अफगाणिस्तानविषयक भूमिकेवर आणि पाकिस्तानातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर तीव्र शब्दांत टीका केली.


पाकिस्तान-अफगाणिस्तान संबंध बिघडण्यास थेट लष्कर जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांनी सांगितले की, लष्करी धोरणांमुळेच हे संबंध आज गर्तेत गेले आहेत. तसेच, मतदानातील गैरव्यवहारातून सत्तेत आलेल्या सरकारला हटवून देशात नव्या निवडणुका घ्याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.


अफगाणिस्तान धोरणावर भाष्य करताना फजलूर रहमान म्हणाले की, पाकिस्तानला नेहमीच प्रो-पाकिस्तान अफगाणिस्तान हवा आहे. मात्र झहीर शाहपासून अशरफ गनीपर्यंत अफगाणिस्तानमधील सरकारे भारताभिमुख राहिली असून, पाकिस्तानच्या अपेक्षांना कधीच पूरक ठरलेली नाहीत. ही बाब सातत्याने दुर्लक्षित केली जात असल्याचे त्यांनी नमूद केले.


काबूलवरील हल्ल्यांवर टीका करताना त्यांनी सांगितले की, काबूलवर बॉम्बहल्ले करणे म्हणजे इस्लामाबादवर बॉम्बहल्ला केल्यासारखे आहे. तालिबान काबूलवरील हल्ले शांतपणे कसे सहन करेल, असा सवाल उपस्थित करत त्यांनी लष्कराच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले.



भारतावर आक्षेप का, असा थेट सवाल


ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर भारताने मुरीदके, बहावलपूरसारख्या दहशतवादी अड्ड्यांवर केलेल्या कारवाईचा संदर्भ देत मौलाना फजलूर रहमान यांनी पाकिस्तानच्या लष्कराला आरसा दाखवला. आपण शत्रूच्या तळांवर कारवाई केली, ती योग्य असल्याचे जर मान्य करत असाल, तर भारताने काश्मीरमधील तसेच मुरीदके आणि बहावलपूरमधील दहशतवादी केंद्रांवर केलेल्या हल्ल्यांवर आक्षेप का घेतला जातो, असा सवाल त्यांनी केला.


जर भारताच्या कारवाईला विरोध केला, तर अफगाणिस्तानच्या बाबतीत पाकिस्तानवरही तेच आरोप होतील. मग अशा परिस्थितीत पाकिस्तानकडे काय उत्तर असेल, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. अफगाणिस्तानवरील कारवाई योग्य ठरवत असाल, तर भारताची कारवाई चुकीची कशी ठरवणार, असे त्यांनी ठामपणे सांगितले.



आपले अफगाण धोरण अपयशी ठरले आहे का?


जमियत उलेमा-ए-इस्लामचे अध्यक्ष म्हणाले की, पाकिस्तानने इराणवर कारवाई केली होती. जर इराणने प्रत्युत्तर दिले असते, तर त्याचे परिणाम काय झाले असते, याचाही विचार केला पाहिजे. इराण आणि अफगाणिस्तानबाबत पाकिस्तानची भूमिका वेगळी का आहे, यावर त्यांनी प्रश्न उपस्थित केला. अफगाणिस्तानमधील सत्ता कमजोर असल्यामुळेच पाकिस्तान वेगळी भूमिका घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला.


अफगाणिस्तानकडे केवळ सध्याच्या घडामोडींच्या दृष्टिकोनातून पाहू नये, असे सांगत त्यांनी पाकिस्तानच्या गेल्या ७८ वर्षांच्या अफगाण धोरणांचा आढावा घेण्याची गरज व्यक्त केली. पाकिस्तानला अफगाणिस्तानमध्ये कधीच खऱ्या अर्थाने मैत्रीपूर्ण सरकार मिळाले नाही. ही आपल्या धोरणांचीच अपयशाची कबुली आहे का, यावर देशात चर्चा झाली पाहिजे, असे ते म्हणाले.



पहलगाम हल्ल्याचा बदला ऑपरेशन सिंदूर


२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ७ मे २०२५ रोजी ऑपरेशन सिंदूर राबवले. भारतीय लष्कर, वायुदल आणि नौदलाच्या संयुक्त कारवाईत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील मुरीदके, बहावलपूर, मुजफ्फराबादसह नऊ दहशतवादी ठिकाणांवर अचूक हल्ले करण्यात आले. या कारवाईत १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचा दावा करण्यात आला असून, पाकिस्तानचे अनेक हवाई तळ आणि शस्त्रसाठेही उद्ध्वस्त झाल्याचे सांगण्यात आले आहे.

Comments
Add Comment

US-Iran War : अमेरिका-इराण युद्धविरामानंतर पुन्हा संघर्ष भडकला; दोन्ही बाजूंनी हल्ले

तेहरान : पश्चिम आशियातील तणाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. अमेरिकेने इराणवर हवाई हल्ले केल्यानंतर इराणनेही

युरोपला उष्णतेचा तडाखा; फ्रान्समध्ये उष्माघातामुळे एक हजारपेक्षा जास्त मृत्यू ! आरोग्य यंत्रणा अलर्ट

फ्रान्स : युरोपमध्ये उष्णतेची लाट आली आहे. फ्रान्सच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी सेशेल्सचा सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानीत! पर्यावरण संवर्धनातील नेतृत्वासाठी 'Guardian of the Blue Horizon' पुरस्कार प्रदान

सेशेल्स : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पर्यावरण संवर्धन, हवामान बदलावर प्रभावी नेतृत्व आणि शाश्वत

Karachi Suicide Attack : कराचीत मोठा आत्मघाती हल्ला : चकमकीत चार पाकिस्तानी रेंजर्सचा मृत्यू, पाच दहशतवादी ठार

- ‘जमात-उल-अहरार’ संघटनेने स्वीकारली जबाबदारी कराची : भारतात दहशतवादी हल्ले करणाऱ्या पाकिस्तानच्या कराची शहरात

US-Iran War : अमेरिकेचा इराणवर सलग दुसऱ्या दिवशी हल्ला; बहरीन-कुवेतमध्ये हवाई हल्ल्याचे सायरन, मध्य-पूर्वेत युद्धजन्य तणाव

होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ एका व्यापारी तेलवाहू जहाजावर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर मध्य-पूर्वेतील तणाव

Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाला पुन्हा भूकंपाचा हादरा! ७.५ रिश्टरनंतर आता ४.८ तीव्रतेचा धक्का; मृतांचा आकडा १,४३० वर

विनाशकारी भूकंपाच्या तडाख्यातून अद्याप सावरत नसलेल्या व्हेनेझुएलाला शनिवारी (२७ जून) पुन्हा एकदा भूकंपाचा