शिरोडा-वेळाघरमध्ये होणार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले पंचतारांकीत हॉटेल


पालकमंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश; ताज समूहासोबत लवकरच सामंजस्य करार


मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राला मोठी चालना देणारी बातमी समोर आली आहे. वेंगुर्ले तालुक्यातील निसर्गरम्य शिरोडा-वेळाघर येथे प्रख्यात ताज समूहाच्या माध्यमातून जिल्ह्यातील पहिले पंचतारांकीत (५ स्टार) हॉटेल उभारले जाणार आहे. हा प्रकल्प दीर्घकाळ प्रलंबित होता, मात्र पालकमंत्री नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे तो आता प्रत्यक्षात उतरणार आहे.





शिरोडा-वेळाघर येथील जमिनीबाबत इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड (ताज समूह) यांनी सादर केलेल्या पुरक करार पत्रावर चर्चा करण्यासाठी मंगळवारी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ताज समूहाच्या प्रतिनिधींनी हॉटेल उभारणीच्या योजना सविस्तार मांडल्या, अशी माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली.


या पंचतारांकित हॉटेल प्रकल्पासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी), स्थानिक ग्रामस्थ आणि ताज समूह यांच्यात लवकरच सामंजस्य करार करण्यात येणार आहे. ग्रामस्थांना जमिनीच्या मोबदल्याचे वाटप दोन टप्प्यांत केले जाणार असून, हा मोबदला एक ते दोन आठवड्यांत देण्यात यावा, तसेच यासंबंधित सर्व न्यायालयीन खटले मागे घेण्यात यावेत, अशा स्पष्ट सूचना बैठकीत देण्यात आल्याचे राणे म्हणाले. या बैठकीला सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह आमदार दीपक केसरकर, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे (ऑनलाइन), ताज समूहाचे प्रतिनिधी, संबंधित विभागांचे अधिकारी तसेच स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.



फायदा काय होणार?


नैसर्गिक सौंदर्य, हिरवीगार वनराई, लांब समुद्रकिनारे आणि ऐतिहासिक किल्ल्यांचा वारसा लाभलेला सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटकांना कायम मोहीत करीत असतो. शिरोडा-वेळाघर किनाऱ्याची नैसर्गिक सुंदरता आणि शांत वातावरणामुळे ताज समूहाचा हा प्रकल्प जिल्ह्यातील पर्यटनाला नवी दिशा देणारा ठरेल. या पंचतारांकीत हॉटेलमुळे जिल्ह्यात देशासह परदेशी पर्यटकांची संख्या वाढेल आणि स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील.


Comments
Add Comment

Mumbai : किरकोळ वादातून मारामरी,रागाच्या भरात मित्रानेच घेतला...नक्की काय घडलं ?

Mumbai :मुंबईतील एका परिसरात अत्यंत संतापजनक घटना घडली असून, बोलता बोलता वाद झाल्याने एका तरुणावर त्याच्याच

BMC Election 2026 : ६६ नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा, मनसेची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली; याचिकाकर्त्यांना सुनावले खडेबोल

मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकीत ६६ नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला असून, याविरोधात

मकरसंक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना गोड

आचारसंहितेतून वाट काढली ! मुंबई : राज्यातील लाडक्या बहिणींना संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा मिळाला

कोकण रेल्वेचा फुकट्या प्रवाशांना दणका

वर्षभरात २० कोटींचा दंड वसूल मुंबई : कोकण रेल्वेचा प्रवास अधिक सुरक्षित, सुरळीत आणि आरामदायी व्हावा यासाठी

घरोघरी गाठीभेटींवर उमेदवारांचा भर!

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मागील काही दिवसांपासून धडाधडाणाऱ्या राजकीय तोफा अखेर मंगळवारी

मतदान प्रक्रियेसाठी मुंबई पोलीस सज्ज

२५ हजारांहून अधिक मनुष्यबळ तैनात मुंबई : महापालिका निवडणुकीचा प्रचार थंडावल्यांनतर मतदान आणि