घाटकोपरमधील संजय भालेराव आणि डॉ अर्चना भालेराव यांचा उबाठाला 'जय महाराष्ट्र'

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपर पश्चिम मधील प्रभाग क्र. १२६च्या माजी नगरसेविका डॉ. अर्चना संजय भालेराव आणि माजी नगरसेवक संजय भालेराव यांनी मंगळवारी भाजपात प्रवेश केला. मनसेतून शिवसेनेत गेलेल्या सहा नगरसेवकांपैकी डॉ अर्चना एक आहेत. तर भाजपाचे स्थानिक आमदार राम कदम यांच्या विरोधात दोन वेळा आमदारकीची निवडणूक संजय भालेराव यांनी लढवली आहे.


शिवसेनेत उबाठाचे माजी नगरसेवक प्रवेश करत असताना आता आकांक्षा शेट्ये, तेजस्वी घोसाळकर यांच्या पाठोपाठ भालेराव दांपत्यानेही भाजपाचा झेंडा आपल्या हाती घेतला. उबाठाकडे राहिलेल्या नगरसेवकांपैकी आणखी माजी नगरसेवक भाजपाच्या समूहात सामील झाला आहे.


संजय भालेराव हे २०१२ मध्ये मनसेचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तर नंतर २०१७मध्ये आरक्षण बदलल्याने त्यांची पत्नी डॉ अर्चना भालेराव यांना उमेदवारी मिळाली आणि त्या निवडून आल्या होत्या. त्यानंतर मनसेतून त्यांनी उबाठा मध्ये प्रवेश केला होता.


भालेराव दांपत्याने भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि माजी खासदार मनोज कोटक यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी मंचावर , आमदार राम कदम, पक्षाचे सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठी, सरचिटणीस राजेश शिरवडकर, सरचिटणीस श्वेता परूळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Comments
Add Comment

IRCTC पूर्ण करणार प्रवाशांची काश्मीर ते गोवा फिरण्याची संधी, जाणून घ्या माहिती

मुंबई : फिरण्याची इच्छा असते, पण वेळ आणि बजेटमुळे अनेकदा प्लॅन पुढे ढकलला जातो. अशा प्रवाशांसाठी Indian Railway Catering and Tourism

एप्रिलमध्ये तब्बल इतके बँक हॉलिडेज, ही सुट्ट्यांची यादी जाहीर

मुंबई : एप्रिल महिन्यात कुठे फिरायला जायचा प्लॅन करत असाल, तर बाहेर गावी जायच्या आधी बँक हॉलिडेज नक्की तपासून

इंधन संकटकाळात भारताची श्रीलंकेला मदत; पंतप्रधान मोदींचे केले आभार व्यक्त

मुंबई : इंधन पुरवठ्याच्या अडचणींना सामोरे जात असलेल्या श्रीलंकेच्या मदतीच्या हाकेला भारताने तत्काळ प्रतिसाद

आयपीएलमधून ऐनवेळी माघार घेणाऱ्या क्रिकेटपटूंवर कठोर कारवाईची गावस्करांची मागणी

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ही एक अशी लीग आहे, ज्यात खेळण्याचे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. पण

राज्यातील १०,००० पेक्षा जास्त मंजूर पदसंख्या असलेल्या शासकीय आस्थापनांच्या वर्गवारीतून कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभाग व व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय प्रथम

कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले अभिनंदन मुंबई : राज्यातील १०,००० पेक्षा

मुंबईकरांसाठी मोठी दिलासादायक बातमी! दोन नव्या मेट्रो मार्गिका अखेर सेवेत

मुंबई : अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या मेट्रो प्रकल्पांबाबत अखेर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दहिसर ते