आमदार निलेश राणे यांचे शिवसेनेतील वजन वाढले

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण आणि कणकवली नगर परिषद निवडणुकीत शिवसेना आमदार निलेश राणे यांनी केलेल्या चमकदार कामगिरीनंतर त्यांचे पक्षातील वजन वाढले आहे. या प्रतिष्ठेच्या लढतीत निलेश राणे यांनी प्रभावी रणनीती आणि संघटन कौशल्य दाखवत पक्षाला यश मिळवून दिले असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कामगिरीचे भरभरून कौतुक केले आहे. या यशामुळे निलेश राणे यांना लवकरच शिवसेनेत नेतेपदी नियुक्ती मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.


सूत्रांनी सांगितले की, एकनाथ शिंदे यांनी निलेश राणे यांच्या निवडणूक व्यवस्थापन आणि संघटन बांधणीवर समाधान मानले. त्यामुळे महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये राणे यांच्यावर पक्षांतर्गत मोठी जबाबदारी सोपवली जाणार आहे. शिवाय कमी कालावधीत कोकणातील संघटनात्मक बांधणीत केलेल्या चमकदार कामगिरीची दखल घेऊन निलेश राणे यांना शिवसेना नेतेपदी बढती मिळणार असल्याचेही सांगण्यात आले.


शिवसेनेत नेते पदाला अतिशय महत्व आहे. मुख्य नेत्यानंतर शिवसेना नेते हे संघटनेतील क्रमांक दोनचे पद आहे. त्यानंतर उपनेते पदाला महत्त्व आहे. मुख्य नेत्याच्या निवडीसह पक्ष संघटनेतील अति महत्त्वाचे निर्णय नेत्यांचे मत जाणून घेतल्याशिवाय होत नाहीत.

Comments
Add Comment

बारव संवर्धनाला प्राधान्य देऊन अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबवा; मंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई : राज्यातील ऐतिहासिक बारवांचे जतन व संवर्धन करण्यास पुरातत्व विभागाने प्राधान्य द्यावे, यासाठी कृती

Sunil Narine : जीटीविरुद्ध सुनील नरेन ऐतिहासिक रेकॉर्डच्या उंबरठ्यावर ; २०० सामने खेळणारा पहिला विदेशी!

IPL 2026 : आयपीएलमध्ये आज एक मोठा इतिहास घडणार आहे. आयपीएलमध्ये आज १६ मे रोजी कोतकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात

Belgium national football team : बेल्जियमचा वर्ल्ड कप संघ जाहीर, केविन डी. ब्रुयनला कर्णधारपद, ओपेंडा संघातून बाहेर

आगामी फिफा वर्ल्डकप २०२६ साठी (FIFA WORLD CUP 2026) बेल्जियम फुटबॉल फेडरेशनने २६ खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे. यावेळी

NEET UG 2026 Paper Leak : नीट २०२६ पेपरफुटी प्रकरण : सीबीआयची मोठी कारवाई, एनटीएच्या बायोलॉजीच्या प्राध्यापिकेला पुण्यातून अटक

नवी दिल्ली : 'नीट-युजी' (NEET-UG) परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) तपासाची चक्रे

'पाकिस्तानने ठरवावे की त्यांना भूगोलाचा भाग व्हायचे आहे की इतिहासाचा ?'

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला केला आणि त्यांची हत्या केली. या

नाशिकमधील 'कॉर्पोरेट जिहाद'नंतर राज्य सरकार ॲक्शन मोडमध्ये

 सरकारी आणि खासगी कंपन्यांमध्ये होणार झाडाझडती; महिलांच्या सुरक्षेसाठी ‘पॉश’ कायद्याची कठोर अंमलबजावणी मुंबई