आमदार निलेश राणे यांचे शिवसेनेतील वजन वाढले

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण आणि कणकवली नगर परिषद निवडणुकीत शिवसेना आमदार निलेश राणे यांनी केलेल्या चमकदार कामगिरीनंतर त्यांचे पक्षातील वजन वाढले आहे. या प्रतिष्ठेच्या लढतीत निलेश राणे यांनी प्रभावी रणनीती आणि संघटन कौशल्य दाखवत पक्षाला यश मिळवून दिले असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कामगिरीचे भरभरून कौतुक केले आहे. या यशामुळे निलेश राणे यांना लवकरच शिवसेनेत नेतेपदी नियुक्ती मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.


सूत्रांनी सांगितले की, एकनाथ शिंदे यांनी निलेश राणे यांच्या निवडणूक व्यवस्थापन आणि संघटन बांधणीवर समाधान मानले. त्यामुळे महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये राणे यांच्यावर पक्षांतर्गत मोठी जबाबदारी सोपवली जाणार आहे. शिवाय कमी कालावधीत कोकणातील संघटनात्मक बांधणीत केलेल्या चमकदार कामगिरीची दखल घेऊन निलेश राणे यांना शिवसेना नेतेपदी बढती मिळणार असल्याचेही सांगण्यात आले.


शिवसेनेत नेते पदाला अतिशय महत्व आहे. मुख्य नेत्यानंतर शिवसेना नेते हे संघटनेतील क्रमांक दोनचे पद आहे. त्यानंतर उपनेते पदाला महत्त्व आहे. मुख्य नेत्याच्या निवडीसह पक्ष संघटनेतील अति महत्त्वाचे निर्णय नेत्यांचे मत जाणून घेतल्याशिवाय होत नाहीत.

Comments
Add Comment

Malegaon : मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील चारही आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता

मुंबई  : २००६ मधील बहुचर्चित आणि संवेदनशील असलेल्या मालेगाव साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील चार आरोपींना मुंबई

Metro : मेट्रो मार्गिका-५ अ, टप्पा एक आणि टप्पा दोनला मंजुरी

मुंबई : मुंबई मेट्रो मार्गिका-५ अ, टप्पा एक आणि टप्पा दोन अशा एकूण १८,१३०.५५ कोटी रुपयांच्या कामांना मुख्यमंत्री

​PMMSY : मत्स्यपालन क्षेत्राला केंद्राचे बळ; 'प्रधानमंत्री मत्स्य संपदा' योजनेला मुदतवाढ

नवी दिल्ली : देशातील मत्स्यपालन क्षेत्राचा शाश्वत विकास साधण्यासाठी आणि 'नील क्रांती' अधिक प्रभावीपणे

Nitesh Rane PC : महिला आरक्षण विधेयकामुळे विरोधकांचा खरा चेहरा समोर आला

मुंबई : महिला आरक्षण विधेयकाला विरोध करून विरोधकांनी आपला महिलाविरोधी चेहरा पुन्हा एकदा उघड केला असून,

केंद्र सरकारच्या iGOT–‘Sadhana Saptah 2026’ मध्ये महाराष्ट्र अव्वल

मुंबई : केंद्र सरकारच्या ‘मिशन कर्मयोगी’ अंतर्गत आयोजित ‘साधना सप्ताह २०२६ मध्ये राज्याने देशात प्रथम क्रमांक

Biogas : प्रत्येक जिल्ह्यात कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती, राज्याकडून ५०० कोटींच्या तरतुदीसह हरित ऊर्जेला बळ

मुंबई : राज्यातील वाढत्या शहरीकरणासोबत निर्माण होणारी कचऱ्याची समस्या आता रोजगाराची आणि स्वच्छ ऊर्जेची संधी