'मामूंची टोळी एकत्र आल्याने भाजपला काही फरक पडत नाही'

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची घोषणा मंगळवारी होणार आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष तथा आमदार अमित साटम यांनी या युतीवर जोरदार हल्लाबोल केला असून, "मामूंची टोळी एकत्र आली तरी मुंबईत काही फरक पडणार नाही," असा टोला लगावला आहे.


दादर येथे माध्यमांशी संवाद साधताना साटम म्हणाले, राजकारणात कुणीही कोणाशी युती करू शकते, एकत्र येऊ शकते किंवा वेगळे होऊ शकते. मात्र, मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालावर याचा काही परिणाम होणार नाही. "मामूंची टोळी एकत्र आली तरी मुंबई मनपा निवडणुकीत काही फरक पडणार नाही. ठाकरे गटाचे नेते-कार्यकर्ते सातत्याने भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. मामूंच्या नादी लागल्यामुळे महाराष्ट्रभरात त्यांची दारुण अवस्था झाली आहे. त्यामुळे उरले-सुरलेलेही पक्ष सोडून भाजपमध्ये येत आहेत. हे लोक खरेतर हिंदुत्वासाठी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत," असा दावा साटम यांनी केला.


साटम पुढे म्हणाले की, मराठी माणूस पूर्णपणे भाजपच्या आणि महायुतीच्या पाठीशी उभा आहे. पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या रशीद मामूला (रशीद खान) पक्षात प्रवेश दिल्यानंतर खरे हिंदुत्ववादी त्यांचा पक्ष सोडून जात आहेत. मराठी माणसाला चांगलेच माहीत आहे की, गेल्या ११ वर्षांत मुंबई शहराचा आणि मुंबईकरांचा विकास कुणी केला. मराठी भाषेला अभिजात दर्जा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने दिला. बीडीडी चाळीतील मराठी कुटुंबांना १६० चौ.फूट ऐवजी ५६० चौ.फूट घर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मिळवून दिले. त्यामुळेच मराठी माणूस महायुतीला आशीर्वाद देताना दिसत आहे."



२५ वर्षांत मराठी माणसासाठी काय केले ?


"मुंबई महापालिकेत २५ वर्षे राज्य करूनही त्यांनी मुंबई आणि मराठी माणसासाठी एकही काम दाखवावे. आम्ही गेल्या ११ वर्षांत केलेली १० कामे सहज दाखवू शकतो. गेल्या २५ वर्षांत महापालिकेत बसूनही त्यांच्याकडे एकही काम दाखवायला नाही. किमान भविष्यात काय करणार हे तरी सांगावे. भावनिक मुद्दे सोडले तर दुसरा कोणताच मुद्दा त्यांच्याकडे नाही. मुंबईकरांना त्यांचे खरे स्वरूप कळलेले आहे. त्यामुळेच मुंबईकर महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत," असे साटम म्हणाले.

Comments
Add Comment

Mumbai Local Train Power Block : प्रवाशांनो घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक तपासा! पनवेल, कर्जत, कल्याण मार्गावर ब्लॉकचा मोठा फटका; परिणाम कुठे होणार ?

मुंबई : डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर (समर्पित माल वाहतूक मार्ग) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला वेग

Devendra Fadanvis : हवं तर ऑईल पेंट वापरा, पण विनाकारण...; शाईच्या वादावर फडणवीसांचा राज ठाकरेंना खोचक टोला

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी सकाळी साडेसात

अखेर सोन्यात सुटकेचा निःश्वास! सोन्यात ४ दिवसांनी प्रथमच घसरण 'या' कारणामुळे

मोहित सोमण: आज नवा कल सोन्यात पाहिला मिळाला आहे. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, सोन्याच्या २४ कॅरेट

Snake Spotted Polling Station : चेंबूरमधील मतदान केंद्रात विषारी सापाचं दर्शन! सुरक्षा रक्षकांमध्ये भीतीचं वातावरण; थेट आला अन्...

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीसाठी आज सकाळी मतदानाला सुरुवात होण्यापूर्वी चेंबूर परिसरातील

बायोकॉन हेल्थकेअर कंपनीकडून ४१५० कोटीची QIP निधी उभारणी

मोहित सोमण: बायोकॉन या जागतिक दर्जाच्या हेल्थकेअर कंपनीने ४१५० रूपयांची गुंतवणूक इक्विटी क्यूआयपी (Qualified Institutional

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वे अपघात! नेल्लोरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

नेल्लोर : आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून रेल्वे अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे एका धावत्या