अलिबागमध्ये शेकापला रोखण्यात भाजप, शिवसेना अपयशी

उबाठाचे दोन शिलेदार विजयी, भाजपाला एकच जागा


सुभाष म्हात्रे अलिबाग : अलिबाग नगर परिषदेत महाविकास आघाडीतील शेकापच्या अक्षया प्रशांत नाईक निर्विवाद बहुमताने निवडून आल्या आणि शेकापने त्यांचे वर्चस्व कायम राखले असले, तरी नगरपालिका निवडणुकीत उमेदवार शोधावा लागणाऱ्या भाजपने देखील यावेळी पालिकेमध्ये एक उमेदवार रूपाने शिरकाव केला आहे. त्याचवेळी महाविकास आघाडीमधील उबाठाला हलके घेणाऱ्या शेकापला देखील त्यांच्याच श्रीबाग प्रभागातील बालेकिल्ल्यात दणका मिळाला असून, शेकापक्षाचे पालिकेतील दोन सदस्य कमी झाले असल्याचे चित्र अलिबाग नगरपालिकेच्या निवडणूक निकालानंतर दिसून आले.


अलिबाग नगर परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा चुरशीचा सामना झाला. या सामन्यात यावेळीही शेकापच बाजी मारेल असा अलिबागेत राजकीय वर्तुळात सुरवातीपासूनच अंदाज बांधला जात होता. हा अंदाज खरीही ठरला. पण तीन जागा गेल्याचे दु:ख शेकापला नक्कीच झाले आहे. यावेळी आघाडीतील शिवसेना उबाठा गटाने शेकापक्षाकडे दोन जागा मागितल्या होत्या, मात्र त्या देण्यास शेकापक्ष तयार झाला नाही. त्यामुळे शिवसेना उबाठाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती.


यामध्ये ठाकरे गटाच्या श्वेता पालकर आणि संदीप पालकर हे दांपत्य निवडून आले. महायुतीमधील भाजपचे एकमेव अॅड. अंकित बंगेरा हेही निवडून आल्याने पालिकेच्या शेकापच्या निरंकुश सत्तेवर नियंत्रण ठेवणारे तीन सदस्य पलिका सभागृहात विरोधी बाकावर दाखल झाले आहेत. अलिबाग नगरपालिका निवडणुकीत नगरसेवक पदाच्या निवडीत आघाडीच्या शेकापक्षाला १६, काँग्रेस १, शिवसेना उबाठा २, तर भाजपला १ जागांवर यश मिळाले आहे. सकाळपासून महाविकास आघाडीमधील शेकापक्षाचे कार्यकर्ते मतमोजणी केंद्र परिसरात दाखल झाले होते. त्यांच्यामध्ये शेकापक्षाचा नगराध्यक्ष निवडून येणार याचा आत्मविश्वास स्पष्टपणे दिसून येत होता, तसेच बहुसंख्य उमेदवार शेकापक्षाचे निवडून येतील ही खात्री देखील त्यांना होती.


जसजसा निकाल बाहेर येत राहिला. त्याप्रमाणे एका पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सुरुवातीला भंडारा उधळून आपला आनंद व्यक्त केला. शेकापचे राज्याचे चिटणीस जयंत पाटील यांना सर्वच्या सर्व उमेदवार निवडून यावेत असे वाटत होते. मात्र शेकाप-काँग्रेस आघाडीचे तीन उमेदवार पराभूत झाले. तीन उमेदवार पराभूत होण्याने शेकापला एकप्रकारे धक्काच बसला असून, ज्या तीन जागा गेल्या त्या शेकापक्षाला अपेक्षित नव्हत्या. हे उमेदवार पराभूत होण्यामागे नेमकी काय कारणे होती. याबाबत आत्मपरिक्षण पक्षाच्या बैठकीत होणार असल्याचे शेकापचे राज्याचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी आजच्या पक्षाच्या कार्यक्रमात सांगताना या निवडणुकीत ८२ टक्के मते मिळाली असल्याचे सांगितले. त्यामुळे पुढील निवडणुकीत गेलेल्या जागा शेकापकडे कशा परत येतील यासाठी त्या दृष्टीने शेकाप काम करेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.


अलिबाग नगरपालिकेत वकिलांची संख्या वाढली


अलिबाग नगरपालिकेत २० सदस्यांपैकी निवडून आलेले सात सदस्य हे व्यवसायाने वकील आहेत. यामध्ये अॅड. मानसी म्हात्रे, अॅड. अंकित बंगेरा, अॅड . नीलिमा हजारे, अॅड. निवेदिता वाघमारे, अॅड ऋषिकेश माळी, अॅड. संदीप पालकर व अॅड. श्वेता पालकर या विजयी सदस्यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

Ashok Kharat Case : भोंदू खरातचा उरणमध्ये जमीन खरेदी विक्रीत कोट्यवधींचा झोलझाल

रायगड : अशोक खरात केसमध्ये हे प्रकरण किती खोल आहे याचा अंदाज महाराष्ट्राला येत जात आहे, अशोक खरातचे काळे धंदे करत

Eknath Shinde : 'पात्र लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहणार नाहीत'

रायगड : बोरीचा माळ सारख्या छोट्या गावात लक्ष्मी नारायणाचे मंदिर उभे राहिले आहे. त्यामुळे आता तुम्हाला रोज

GI Tag White Onion Production : जीआय टॅग मिळूनही अडचण; पांढऱ्या कांद्याच्या उत्पादनात मोठी घट

रायगड : बदलत्या हवामानाचा मोठा फटका यंदा अलिबाग तालुक्यातील पांढरा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. यावर्षी

Mumbai Goa Expressway : कोकणात विकेंड रश; मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

माणगाव : उन्हाळी सुट्ट्यांची सुरुवात आणि सलग तीन दिवसांचा विकेंड यामुळे कोकणाच्या दिशेने पर्यटकांचा ओघ प्रचंड

मुंबई-गोवा महामार्गावर बस उलटून भीषण अपघात; ३८ प्रवासी जखमी दोघांचा मृत्यू

नागोठणे : शुक्रवारी ( ३ एप्रिल ) मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका खासगी बसचा मुंबई गोवा महामार्गावर अपघात झाला.

कोकणातील दुर्गम भागात ऊर्जेचे नवे पर्व

लघु जलविद्युत विकास योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी अलिबाग : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या