सामान्य प्रशासन विभागाकडून तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. त्यात ए. शैला, डॉ. कश्मीरा संखे आणि एम. अरुण या आयएएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.


वित्त विभागात सचिव पदी कार्यरत असलेल्या ए. शैला यांची नियोजन विभागात सचिव आणि विकास आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. २०२३ च्या बॅचच्या सनदी अधिकारी डॉ. कश्मीरा संखे यांच्याकडे आयटीडीपीमध्ये प्रकल्प अधिकारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्या भंडारा जिल्ह्यातील तुमसर उपविभागीय कार्यालयात सहायक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होत्या. याव्यतिरिक्त त्यांच्याकडे नाशिकच्या कळवान उपविभागीय कार्यालयात सहायक जिल्हाधिकारी पदाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. तर, २०२३ च्या बॅचचे सनदी अधिकारी एम. अरुण यांच्याकडेही आयटीडीपीमध्ये प्रकल्प अधिकारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडे गडचिरोली उपविभागाच्या सहायक जिल्हाधिकारी पदाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे.

Comments
Add Comment

"मुंबईच्या सुवर्णकाळाची सुरुवात...", मुंबई महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन

मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन आज, ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता

उत्पन्न वाढीसाठी एसटी बसेस फेऱ्यांचा वक्तशीरपणा वाढवा - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : “बसेस वेळेवर धावल्या तरच उत्पन्नाची चाके वेगाने फिरतील, असे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग

वांद्रे–वरळी सी लिंक आणि कोस्टल रोडवर हेलिपॅड उभारा

मंत्री आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मुंबई : पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर दोन दिवसांपूर्वी गॅस

डोंगरी, मांडवी,मोहम्मद अली रोड परिसरात महापालिकेच्या या अधिकाऱ्याची घुसून कारवाई... महापालिकेच्या नवख्या सहाय्यक आयुक्ताने मुंबईकरांची तोंडे केली गप .

मुंबई : मुंबई महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार मुंबईतील काही विभागांमध्ये महापालिकेच्या वतीने अनधिकृत

दोन प्रवाशांच्या भांडणात तरुणाने कायमचा गमावला डोळा; जाणून घ्या नेमकं प्रकरण

मुंबई : मुंबईची लोकल ही मुंबईची लाईफलाईन आहे. मुंबईची शान आहे, पण याच रेल्वेवर हल्ली प्रवाशांचा ताण वाढत चालला आहे.

Pariksha Pe Charcha 2026: 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात सांगलीच्या मातीचा, महाराष्ट्राच्या लेकराचा गौरव; मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी 'परीक्षा पे चर्चा' च्या निमित्ताने