भारत दौऱ्यातून मेस्सीला ८९ कोटींची कमाई, भारताला कररूपाने ११ कोटींचे उत्पन्न

मुंबई  : लोकप्रिय फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने नुकताच भारताचा दौरा केला होता. कोलकाता येथे झालेल्या १३ डिसेंबर रोजीच्या कार्यक्रमात मोठा गोंधळ झाला होता. सॉल्ट लेक मैदानातून मेस्सी १० मिनिटांत निघून गेल्यानंतर मैदानातील प्रेक्षकांनी खुर्च्यांची मोडतोड करत जाळपोळ केली. यानंतर पश्चिम बंगाल सरकारने कार्यक्रमाचा मुख्य आयोजक सत्यद्रू दत्तावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.


दत्ता याने सांगितले की, भारताच्या दौऱ्यासाठी मेस्सीला ८९ कोटी रुपये मिळाले. तर भारताला कराच्या रुपातून ११ कोटी रुपये मिळाले, अशी माहिती पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. पश्चिम बंगालने कोलकाता इव्हेंटची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना केली होती. एसआयटीसमोर बोलताना दत्ता यांनी वरील माहिती दिली. मेस्सीच्या दौऱ्याचा एकूण खर्च १०० कोटी रुपये झाला आहे. यातील ३० टक्के रक्कम प्रायोजकांमार्फत तर ३० टक्के रक्कम तिकिटांमधून गोळा करण्यात आली.

कोलकाताच्या सॉल्ट लेक स्टेडियममध्ये झालेल्या इव्हेंटसाठी हजारो लोकांनी महागडी तिकीटे विकत घेतली होती. लिओनेल मेस्सीभोवती अनेक लोकांचा गराडा असल्यामुळे स्टेडियममधील लोकांना मेस्सी दिसतच नव्हता. त्यामुळे चिडलेल्या लोकांनी स्टेडियममध्ये गोंधळ घालत मोडतोड केली. सत्येद्रू दत्ताने एसआयटीसमोर झालेल्या चौकशीत म्हटले की, कोलकाताच्या इव्हेंटसाठी केवळ १५० जणांना पासेस देण्यात आले होते. मात्र काही प्रभावशाली व्यक्तींनी स्वतःच अनेक लोकांना मैदानावर आणले. त्यामुळे मेस्सीच्या भोवती खूप गर्दी गोळा झाली. सदर प्रभावशाली व्यक्ती मैदानात शिरल्यानंतर कार्यक्रमाची लय बिघडली आणि वेळापत्रक कोलमडले, त्यामुळे परिस्थिती चिघळली.

Comments
Add Comment

भारतीय संघ कसोटीत अपयशी; टी - २० त ‘ब्लॉकबस्टर’!

मुंबई  : भारतीय क्रिकेट संघासाठी २०२५ हे वर्ष संमिश्र यश देणारे ठरले. या वर्षात भारताने १० कसोटी, १४ वनडे आणि २२

पाकिस्तानच्या नक्वीचा भारताच्या १९ वर्षांखालील क्रिकेटपटूंनी केला अपमान

मुंबई  : जेतेपदाच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने समीर मिन्हासच्या धमाकेदार शतकाच्या जोरावर ३४७

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारतीय संघाची सहाव्या स्थानावर घसरण

नवी दिल्ली  : माऊंट मांघनाई इथे सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजचा ३२३ धावांनी धुव्वा उडवत न्यूझीलंडने

युवा भारताचे स्वप्न अधुरे!

१३ वर्षांनंतर पाकची जेतेपदावर मोहोर दुबई : १९ वर्षांखालील आशिया कप २०२५ स्पर्धेतील अंतिम सामना रविवारी झाला. या

भारतीय महिला संघाची विजयी सलामी

जेमिमाच्या अर्धशतकाने श्रीलंकेची कोंडी; मालिकेत १-० ने आघाडी विशाखापट्टणम : महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ चे

Rohit Sharma...२०२३ वर्ल्ड कपचा पराभव जिव्हारी लागला; क्रिकेट कायमचा सोडण्याचा विचार केला होता

मुंबई : भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा याने २०२३ च्या वनडे वर्ल्ड कप फायनलमधील पराभवाबाबत मनमोकळं वक्तव्य