Mumbai Local Horror : क्रूरतेचा कळस! लेडीज डब्यात घुसखोरी करणाऱ्या नराधमाची मुजोरी, १८ वर्षीय विद्यार्थिनीला ५० वर्षीय प्रवाशाने धावत्या लोकलमधून ढकललं

नवी मुंबई : महिलांच्या डब्यात बेकायदेशीरपणे घुसणाऱ्या एका ५० वर्षीय व्यक्तीला हटकणे एका १८ वर्षीय तरुणीच्या जिवावर बेतल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली. पनवेल ते खांदेश्वर स्थानकांदरम्यान हार्बर लोकलमध्ये हा संतापजनक प्रकार घडला. महिलांच्या डब्यात शिरलेल्या या इसमाला तेथील प्रवाशांनी जाब विचारला असता, त्याने क्रूरतेचा कळस गाठत एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीला धावत्या लोकलमधून बाहेर ढकलून दिले.



नक्की काय घडली घटना?




मिळालेल्या माहितीनुसार, ५० वर्षीय शेख अख्तर नवाज हा आरोपी पनवेलहून सुटलेल्या लोकलच्या महिलांच्या डब्यात शिरला होता. डब्यातील महिलांनी त्याला पुरुष असून महिलांच्या डब्यात का चढला, असा सवाल करत खाली उतरण्यास सांगितले. यामध्ये १८ वर्षांची श्वेता महाडिक ही विद्यार्थिनी पुढाकार घेऊन त्याला जाब विचारत होती. यामुळे संतापलेल्या आरोपीने श्वेतासोबत वाद घातला आणि गाडीचा वेग वाढताच तिला दारातून बाहेर ढकलून दिले. धावत्या गाडीतून फेकल्या गेल्यामुळे श्वेता गंभीररीत्या जखमी झाली असून तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती सध्या चिंताजनक असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे रेल्वेतील महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत प्रवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. घटनेनंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला रेल्वे पोलिसांनी (GRP) तातडीने सापळा रचून अटक केली आहे. आरोपीवर खुनाचा प्रयत्न आणि रेल्वे कायद्यांतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलांच्या डब्यात भरदिवसा घुसखोरी करणाऱ्या अशा प्रवृत्तींविरुद्ध आता कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.



नराधमाचा पळ काढण्याचा प्रयत्न


दरम्यान, पनवेल-खांदेश्वर दरम्यान एका १८ वर्षीय तरुणीला धावत्या लोकलमधून फेकून देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. पीडित तरुणीला ढकलल्यानंतर आरोपी शेख अख्तर नवाज (५०) याने खांदेश्वर रेल्वे स्थानकावर उतरून गर्दीचा फायदा घेत पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, डब्यातील महिला प्रवाशांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे रेल्वे पोलिसांनी त्याला पळ काढण्यापूर्वीच ताब्यात घेतले. आरोपी शेख अख्तर याच्यावर पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात गंभीर कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यामध्ये बीएनएस (BNS) कलम १०९ (जीवे मारण्याचा प्रयत्न) यासह भारतीय रेल्वे अधिनियमातील कलम १६२ आणि १३८ चा समावेश आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय तायडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस तपासातून आरोपीबाबत काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शेख हा एक फिरस्ता असून त्याचे कोणतेही नातेवाईक किंवा ठराविक पत्ता नाही. प्राथमिक तपासादरम्यान त्याचे मानसिक संतुलन बिघडल्याचे दिसून आले आहे. याच मानसिक स्थितीमुळे किंवा वैफल्यातून त्याने हे टोकाचे कृत्य केले असावे, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, भरदिवसा महिलांच्या डब्यात घुसून तरुणीला मृत्यूच्या दारात ढकलणाऱ्या या इसमावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे. या घटनेत डब्यातील इतर महिला प्रवाशांनी तातडीने आरडाओरडा करून रेल्वे पोलिसांना माहिती दिली. त्यांच्या सतर्कतेमुळेच आरोपीला स्थानकाबाहेर पडण्याआधीच पकडणे शक्य झाले. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून पीडित तरुणीच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे बारीक लक्ष आहे.

Comments
Add Comment

Bharat Gogawale : नाशिकला गिरीश महाजन आणि रायगडमध्ये भरत गोगावले करणार ध्वजारोहण

मुंबई : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या शासकीय समारंभासाठी राज्य शासनाकडून जिल्हा निहाय ध्वजारोहण

Weather Update : महाराष्ट्रातील विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

मुंबई : राज्यात श्रावणाचं आगमन धो धो पावसानं होणार आहे. महाराष्ट्रातील विविध भागांत गुरुवार १३ ते शनिवार १५ ऑगस्ट

NEET Students Protest : नीट विद्यार्थी आंदोलनावर संसदेत चर्चेचे गृहमंत्री अमित शहा यांचे आव्हान

नवी दिल्ली : जंतरमंतर येथे झालेल्या विद्यार्थी आंदोलनावर आणि नीट पेपर फुटीप्रकरणावरून संसदेत आक्रमक झालेल्या

PM Narendra Modi : शॉर्टकटचा मोह टाळा, मेहनत आणि संघर्षाचा मार्ग निवडा, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जेन-झी पिढीला मोलाचा सल्ला

नवी दिल्ली : सोशल मीडिया, रील्स आणि इन्फ्लुएन्सर्सच्या या आधुनिक युगात तरुणांनी क्षणिक यशाच्या मागे न धावता

CJP : 'सीजेपी'च्या समर्थनार्थ काढलेल्या मोर्चातील आंदोलकांवरील गुन्हे मागे

मुंबई : राज्यातील राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांवर दाखल झालेले खटले मागे

Piyush Goyal : नऊ मुक्त व्यापार करारांमुळे भारतीय उद्योग, व्यवसायांना मिळाली चालना

नवी दिल्ली : भारतीय उद्योगपतींनी आणि नागरिकांनी भारतीय उत्पादने आणि सेवा जागतिक बाजारपेठेत नेताना उचित व्यापार