नाशिक जिल्ह्यात शिवसेनेची सरशी

धनंजय बोडके


नाशिक जिल्ह्यातील ११ ठिकाणच्या नगरपरिषदांमध्ये जाहीर झालेल्या थेट नगराध्यक्षपदाच्या निकालात शिवसेनेला सर्वाधिक ५ जागा मिळाल्या आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी ३ जागांवर विजय मिळाला आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांना मात्र एकही जागा मिळवता आलेली नाही. जिल्ह्यात सात आमदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ तीन ठिकाणी समाधान मानावे लागले. तर नांदगाव येथील शिवसेना आमदाराच्या मतदारसंघातील दोन्ही जागांसह सटाणा, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी येथे नगराध्यक्ष निवडून आणत शिवसेनेने जिल्ह्यात आपली सरशी सिद्ध केली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने एकप्रकारे राष्ट्रवादी आणि भाजपला इशारा दिला आहे. नाशिक जिल्ह्यात पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांचा निकाल रविवारी जाहीर झाला. राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीने जिल्ह्यात विजयी घोडदौड केली आहे. येवला, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि ओझर पिंपळगाव येथे शिवसेना विरुद्ध भारतीय जनता पक्ष असा थेट सामना रंगला होता. या ठिकाणी शिवसेनेने विजय मिळवला.


नांदगाव आणि मनमाड येथे आमदार सुहास कांदे यांनी आपले वर्चस्व कायम राखत दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे नगराध्यक्ष निवडून आणले. या ठिकाणी भाजपने उमेदवार न दिल्याने शिवसेनेला फायदा झाला. ऐनवेळी भाजपने उमेदवार न दिल्यामुळे भाजपातील इच्छुक उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले होते. येवल्यात मंत्री छगन भुजबळ व खासदार समीर भुजबळ यांनी, तर सिन्नरमध्ये माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपापले गड शाबूत ठेवले. नांदगाव व मनमाड येथे शिवसेना आमदार सुहास कांदे, तर चांदवडमध्ये भाजप आमदार डॉ. राहुल आहेर यांचे उमेदवार विजयी झाले. सटाण्यात मात्र भाजप आमदार दिलीप बोरसे यांचा उमेदवार पराभूत झाला आणि शिवसेनेच्या उमेदवाराने बाजी मारली. प्रतिष्ठेच्या पिंपळगाव बसवंत नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप बनकर यांना जबर धक्का बसला असून येथे भाजपच्या उमेदवाराने विजय मिळवला. ओझर व पिंपळगाव बसवंत येथे भाजपचे नगराध्यक्ष निवडून आल्याने निफाड विधानसभा मतदारसंघात आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात थेट सामना होण्याची चिन्हे आहेत. भगूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस, तर त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी येथे शिवसेनेचे उमेदवार विजयी ठरले. विरोधी महाविकास आघाडीचा जिल्ह्यात सपशेल पराभव झाला आहे.



भाजपाची रणनीती ठरली कमकुवत


सिन्नर येथे भाजपने उशिरा रणनीती आखल्याचा फटका बसला. आयात उमेदवारांवर अधिक भर दिल्याने पराभव पत्करावा लागला. त्र्यंबकेश्वर येथे अति आत्मविश्वास भाजपच्या पराभवाचे कारण ठरला. सटाण्यात मागील वेळी भाजपचा नगराध्यक्ष असतानाही यावेळी सातत्य राखता आले नाही. पिंपळगाव बसवंत व ओझर येथे आमदार दिलीप बनकर यांना धक्का बसल्याने भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष यतीन कदम यांचे नेतृत्व पुढे आले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत निफाडमधून यतीन कदम भाजपचे उमेदवार असण्याची शक्यता आहे.



भगूरला २५ वर्षांनंतर सत्तांतर


भगूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि भाजप हे सर्व पक्ष शिवसेनेविरोधात एकत्र लढले होते. या अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली असून प्रेरणा बलकवडे या नगराध्यक्षपदी निवडून आल्या आहेत. भगूर नगरपरिषदेत गेल्या २५ वर्षांपासून विजय करंजकर यांची एकहाती सत्ता होती. अनिता करंजकर यांचा १,९१३ मतांनी पराभव करत प्रेरणा बलकवडे विजयी झाल्या. शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार विजयी होऊ नये यासाठी भाजपने राष्ट्रवादीला साथ दिली आणि त्याचा थेट फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला झाला.



भाजपाच्या ग्रामीण संघटनात्मक बांधणीत त्रुटी; अंतर्गत वाद


राज्यात सर्वत्र भाजपचा विजय होत असताना नाशिक जिल्ह्यात पक्ष काहीसा मागे पडल्याचे दिसून आले. ग्रामीण भागातील संघटनात्मक बांधणी कमकुवत ठरली. तसेच पक्षातील अंतर्गत वादही पराभवाला कारणीभूत ठरले.जिल्ह्यात आमदार राहुल आहेर वगळता प्रभावी नेतृत्वाचा अभाव दिसून आला. इतर जिल्ह्यातील मंत्र्यांनी ऐनवेळी आपल्या पक्षातील उमेदवारांना संधी न देता आयात उमेदवारांना उमेदवारी दिल्याने भाजपला मोठा फटका बसल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे.

Comments
Add Comment

कमी दृश्यमानता ठरली अपघाताचे कारण ?

पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांचे आज म्हणजेच बुधवार २८

CM Fadnavis Dy CM Eknath Shinde Meet Sunetra Pawar in Baramati : सुनेत्रा वहिनींनी जोडलेले हात अन् मुख्यमंत्री-राज्यपालांची स्तब्धता; बारामतीतील ते दृश्य पाहून महाराष्ट्र हळहळला

बारामती : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे, रूबाबदार आणि 'दादा' नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे उपमुख्यमंत्री

Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांच्या विमानातील 'ती' क्रू-मेंबर; बाबा, दादांशी तुमचं बोलणं करून देईन..पिंकीचा तो शब्द शेवटचाच ठरला!

बारामती : संपूर्ण महाराष्ट्र आज एका अत्यंत दुर्दैवी आणि सुन्न करणाऱ्या बातमीने जागा झाला. बारामतीमध्ये

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अकाली निधनाने गौतम अदानींनी शोककळा व्यक्त केली

मुंबई:अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी बुधवारी बारामतीजवळ झालेल्या अजितदादांसह सहा व्यक्तींच्या

Ajit Pawar Passed Away : कमी दृश्यमानतेमुळे अजित पवारांच्या विमानाचा अपघात; नागरी उड्डाण मंत्र्यांचे स्पष्टीकरण

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली जात असतानाच, या भीषण

Ajit Pawar Plane Crash : अजितदादांवर उद्या बारामतीत अंत्यसंस्कार; पंतप्रधान मोदी आणि अमित शहा 'दादां'ना अखेरचा निरोप देण्यासाठी येणार!

बारामती : २८ जानेवारी २०२६ हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात काळा दिवस म्हणून नोंदवला गेला आहे. राज्याचे