बांगलादेशातील चितगावमधील भारतीय व्हिसा सेवा अनिश्चित काळासाठी स्थगित

नवी दिल्ली (प्रतिनिधी): बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारतीय व्हिसा अर्ज केंद्राने (आयव्हीएसी) चितगाव येथे असलेल्या सर्व व्हिसा सेवा बंद करण्याची घोषणा केली आहे. आयव्हीएसी बांगलादेशने स्पष्ट केले आहे की, रविवारपासून पुढील आदेश येईपर्यंत व्हिसा सेवा निलंबित राहतील.शहरातील भारताच्या सहाय्यक उच्चायोगाच्या (एएचसीआय) परिसरात घडलेल्या एका सुरक्षा घटनेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
आयव्हीएसीकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात सांगण्यात आले आहे की, स्थानिक परिस्थितीची सखोल पाहणी केल्यानंतरच व्हिसा सेवा पुन्हा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. सध्या परिस्थिती लक्षात घेता कोणतीही ठराविक तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. व्हिसा सेवा स्थगित करण्याचा निर्णय अशा वेळी घेण्यात आला आहे, जेव्हा बांगलादेशच्या अनेक भागांत हिंसक घटनांचे सत्र सुरू आहे.

दरम्यान, रविवारी मयमनसिंह जिल्ह्यात २७ वर्षीय हिंदू युवक दीपुचंद्र दास यांच्या हत्येप्रकरणी १० जणांना अटक करण्यात आली. आरोपांनुसार, काही कथित आरोपांवरून जमावाने त्या युवकावर हल्ला केला, ज्यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद यूनुस यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे या अटकांची पुष्टी केली. त्यांनी सांगितले की रॅपिड अॅक्शन बटालियन (आरएबी) ने ७ तर पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली.

या प्रकरणामुळे तणाव इतका वाढला आहे की राजधानी ढाक्यातही सध्या परिस्थिती तणावपूर्ण आहे. ढाका विद्यापीठ परिसरात इन्कलाब मंचचे संयोजक शरीफ उस्मान हादी यांच्या अंत्यसंस्कारानंतर त्यांच्या समर्थकांनी शाहबाग परिसराकडे मोर्चा काढला. काही दिवसांपूर्वी हादी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यांच्या मृत्यूनंतर ढाक्यात सातत्याने आंदोलन सुरू आहेत. रविवारीही शाहबाग चौकात मोठ्या संख्येने लोक जमा होऊन न्यायाची मागणी करताना दिसून आले.
Comments
Add Comment

बांगलादेशमध्ये हिंसाचाराचा कहर; नेत्याचं घर पेटवलं, ७ वर्षांच्या मुलीचा मृत्यू

ढाका : बांगलादेश पुन्हा एकदा हिंसाचाराच्या आगीत सापडला असून लक्ष्मीपूर सादर उपजिल्ह्यातील एक हृदयद्रावक घटना

पाकिस्तानातील जाफर एक्सप्रेस बॉम्बस्फोट करुन उडवण्याचा प्रयत्न, बलुचिस्तानमध्ये रेल्वे ट्रॅकचे नुकसान

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या अशांत बलुचिस्तानमधून एक धक्कादायक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जाफर एक्सप्रेस या

बांगलादेशात हिंदू तरुणाची निर्घृण हत्या! १० आरोपींना अटक, युनुस सरकार काय निर्णय घेणार ?

ढाका: बांगलादेशातील मयमनसिंह जिल्ह्यात एका हिंदू तरुणाची जमावाने हत्या केल्याच्या घटनेनंतर, आतापर्यंत दहा

बांगलादेशातील हिंदूच्या हत्येप्रकरणी ७ जणांना अटक

ढाका : बांगलादेशातील मैमनसिंग जिल्ह्यातील भालुका येथे दीपू चंद्र दास या २७ वर्षीय हिंदू तरुणाची जमावाकडून

चीनकडून बांगलादेशात लष्करी आणि पायाभूत सुविधांमध्ये वाढ

नवी दिल्ली  : भारताला घेरण्यासाठी चीनने पाकिस्ताननंतर आपले लक्ष आता बांगलादेशवर केंद्रित केले आहे.

अमेरिकेने दहशतवाद्यांच्या ७२ ठिकाणांवर केले हल्ले; सीरियात युद्धसदृश परिस्थिती

सीरिया : सीरियामध्ये अमेरिकन सैन्यावर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने मोठी लष्करी कारवाई करत इस्लामिक