राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतींसाठी सकाळी दहा वाजता सुरू होणार मतमोजणी


मुंबई : महाराष्ट्रातील २८८ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी दोन टप्प्यात मतदान झाले. पहिल्या टप्प्याचे मतदान २ डिसेंबर आणि दुसऱ्या टप्प्याचे मतदान २० डिसेंबर रोजी झाले. आता मतमोजणी आज म्हणजेच रविवार २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी दहा वाजता सुरू होणार आहे. टप्प्याटप्प्याने निकाल जाहीर होण्यास सुरुवात होईल. महायुती आणि महाविकास आघाडीतील घटकपक्ष अनेक ठिकाणी एकमेकांविरोधात उभे ठाकल्याने या निवडणुकीत कोण गुलाल उधळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


राज्यात शनिवारी झालेल्या २३ नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ४७.०४ टक्के मतदान झाले होते. याआधी राज्यात पहिल्या टप्प्यात २६३ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये सरासरी ६७.६३ टक्के मतदान झाले.


दोन्ही टप्प्यात महायुतीच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणात प्रचार केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे फिरत होते. यामुळे निकाल कसे लागणार यावरुन चर्चेला उधाण आले आहे.




  1. २४६ नगरपरिषदा

  2. ४२ नगरपंचायती

  3. २८८ एकूण नगरपरिषदा, नगरपंचायती

  4. रविवार २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात


Comments
Add Comment

ICC ODI World Cup : आयसीसीने एकदिवसीय विश्वचषकाचे स्वरूप बदलले; आता सुपर सिरीज आणि सुपर ७ फेरीचा समावेश

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) पुढील वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या स्वरूपात

Smriti Mandhanaभारतीय संघाचे नेतृत्व करण्यास सज्ज: स्मृती मानधना

नवी दिल्ली : इंग्लंडमध्ये नुकत्याच झालेल्या आयसीसी महिला टी-२० विश्वचषकात भारताचे आव्हान साखळी फेरीतच

Navi Mumbai International Airport : नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय सेवेला सुरुवात

पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बुधवारी आंतरराष्ट्रीय सेवेला सुरुवात झाली. याअंतर्गत एअर इंडिया

India UK Trade : २०३० पर्यंत भारत-यूके व्यापार ११२ अब्ज डॉलर्सवर नेण्याचे उद्दिष्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; भारत-यूके मुक्त व्यापार कराराचा मुंबईत शुभारंभ मुंबई(Mumbai) : भारत आणि युनायटेड किंगडम

Shevgaon News : कोट्यवधी खर्चूनही १० वर्षांपासून रखडला शेवगावचा सांडपाणी प्रकल्प; गैरव्यवहाराच्या चौकशीची मागणी

शेवगाव : नगरपरिषदेमार्फत सुमारे दहा वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर कोट्यवधी

Vadkhal Bypass : वडखळ बायपासची दुरवस्था; अपूर्ण कामातच टोलवसुलीमुळे वाहनचालक संतप्त

रायगड : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वडखळ बायपासची दुरवस्था दिवसेंदिवस गंभीर होत असून, पावसाळ्यात हा