राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतींसाठी सकाळी दहा वाजता सुरू होणार मतमोजणी


मुंबई : महाराष्ट्रातील २८८ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी दोन टप्प्यात मतदान झाले. पहिल्या टप्प्याचे मतदान २ डिसेंबर आणि दुसऱ्या टप्प्याचे मतदान २० डिसेंबर रोजी झाले. आता मतमोजणी आज म्हणजेच रविवार २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी दहा वाजता सुरू होणार आहे. टप्प्याटप्प्याने निकाल जाहीर होण्यास सुरुवात होईल. महायुती आणि महाविकास आघाडीतील घटकपक्ष अनेक ठिकाणी एकमेकांविरोधात उभे ठाकल्याने या निवडणुकीत कोण गुलाल उधळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


राज्यात शनिवारी झालेल्या २३ नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ४७.०४ टक्के मतदान झाले होते. याआधी राज्यात पहिल्या टप्प्यात २६३ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये सरासरी ६७.६३ टक्के मतदान झाले.


दोन्ही टप्प्यात महायुतीच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणात प्रचार केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे फिरत होते. यामुळे निकाल कसे लागणार यावरुन चर्चेला उधाण आले आहे.




  1. २४६ नगरपरिषदा

  2. ४२ नगरपंचायती

  3. २८८ एकूण नगरपरिषदा, नगरपंचायती

  4. रविवार २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात


Comments
Add Comment

SRH IPL 2026 : ईशान किशन आणि अभिषेक शर्मावर हैदराबाद संघाने टाकली मोठी जबाबदारी

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या आधी, सनरायझर्स हैदराबादने एक मोठा निर्णय घेतला आहे. भारताच्या नुकत्याच

Karachi Natural Disaster : काराचीवर नैसर्गिक संकट; वादळामुळे १९ जणांचा मृत्यू तर अनेक जखमी

पाकिस्तानची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कराची शहरात मुसळधार पाऊस आणि वादळी-वाऱ्यामुळे मोठे नुकसान

Gold Silver Price : आनंदवार्ता! नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण

- गुंतवणूकदारांसाठी दिलासादायक बातमी मुंबई : आठवड्याच्या चौथ्या व्यापारी दिवशी म्हणजेच गुरुवार १९ मार्च रोजी,

Assam Assembly Election 2026 : आसाम विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर

- मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा जलुकबारी मतदारसंघातून निवडणूक लढवणार-प्रद्युत बोरदोलोई यांना दिसपूरमधून

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला आणखी दोन मंत्रिपदे ?

- खासदार श्रीकांत शिंदे, श्रीरंग बारणे यांच्या नावाची चर्चा; ‘ऑपरेशन टायगर’द्वारे खासदारांचे बळ वाढवण्याचा

होर्मुझवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर मोदींची कुवेतच्या युवराजांशी चर्चा; प्रादेशिक शांततेवर भर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुवेतचे युवराज शेख सबाह अल-खालिद अल-हमद अल-मुबारक अल-सबाह यांच्याशी दूरध्वनीवरून