नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत २८८ पैकी १२९ जागांवर भाजपचा निर्विवाद विजय

मुंबई : राज्यातील २८८ नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीने राज्यभरात घवघवीत यश मिळवले असून, भाजप हा क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. तीन ते चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पार पडलेल्या या निवडणुकीत जनतेने विकासाच्या मुद्द्यांना प्राधान्य देत महायुतीला कौल दिला. महाविकास आघाडीला मात्र मोठा धक्का बसला असून, त्यांचा प्रभाव नाममात्र राहिला.


राज्यातील एकूण २८८ नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल रविवारी (२१ डिसेंबर २०२५) जाहीर झाले. मतमोजणी सकाळी १० वाजता सुरू झाली आणि संध्याकाळपर्यंत बहुतांश निकाल स्पष्ट झाले. महायुतीला सुमारे २१४ हून अधिक जागांवर विजय मिळाला, तर महाविकास आघाडीला केवळ ४९ जागा आणि स्थानिक आघाड्या तथा अपक्षांना २५ जागा मिळाल्या. विशेष म्हणजे, एकट्या भाजपचे १२९, नगराध्यक्ष आणि ३ हजार ३२५ नगरसेवक निवडून आले. उबाठा आणि शरद पवार गटाला दोन आकडी संख्या देखील गाठता आलेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारादरम्यान "२० तारखेला दिवसभर कमळाची काळजी तुम्ही करा, त्यानंतर पुढची पाच वर्षे तुमची काळजी देवाभाऊ घेईल", असे आवाहन केले होते. ते जनतेला भावले. या निवडणुकीत भाजपने १२९ नगराध्यक्षपदे मिळवली, तर महायुतीचे घटकपक्ष शिवसेना ५१ आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ३५ जागा जिंकल्या.



कोणाच्या किती जागा ?


पक्ष - नगराध्यक्ष - सदस्य
भाजप - १२९ - ३३२५
शिवसेना - ५१ - ६९५
राष्ट्रवादी - ३५ - ३११
काँग्रेस - ३५ - १३१
उबाठा - ९ - ३७८
शरद पवार गट - ७ - १५३
इतर - २२ - १४०



विभागनिहाय निकाल :


- विदर्भ (१०० जागा): भाजप ५८, शिवसेना ८, राष्ट्रवादी ७, काँग्रेस २३, उबाठा ०, शरद पवार ०, इतर ४.
- मराठवाडा (५२ जागा): भाजप २५, शिवसेना ८, राष्ट्रवादी ६, काँग्रेस ४, उबाठा ४, शरद पवार २, इतर ३.
- उत्तर महाराष्ट्र (४९ जागा): भाजप १८, शिवसेना ११, राष्ट्रवादी ७, काँग्रेस ५, उबाठा २, शरद पवार १, इतर ५.
- पश्चिम महाराष्ट्र (६० जागा): भाजप १९, शिवसेना १४, राष्ट्रवादी १४, काँग्रेस ३, उबाठा १, शरद पवार ३, इतर ६.
- कोकण (२७ जागा): भाजप ९, शिवसेना १०, राष्ट्रवादी १, काँग्रेस ०, उबाठा २, शरद पवार १, इतर ४.



मागील नगराध्यक्ष संख्या


भाजप - ९४
शिवसेना - ३६
काँग्रेस - ५१
राष्ट्रवादी - २९
इतर - २८
अपक्ष - २२

Comments
Add Comment

मराठमोळ्या मुलीशी लग्न करुन आता पत्नीला बुरख्यातच ठेवतो; म्हणाल्या, पुरुष स्त्रियांकडे...

मुंबई: प्रसिद्ध युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अदनान शेख सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत

Ahilyanagar Acid Attack Case: सहावीतील विद्यार्थीनीवर ॲसिड हल्ला प्रकरणी रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया समोर, काय म्हणाल्या?

अहिल्यानगर: अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यात सहावीत शिकाणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अज्ञात तरूणाकडून ॲसिड हल्ला

Sangamner : संगमनेर हादरलं! शाळकरी मुलीवर ॲसिड हल्ला

संगमनेर : संगमनेर तालुक्यातील रणखांब परिसरात एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच, वडगाव

'धुरंधर २' ला २१ कट्स, 'ए' प्रमाणपत्र; जाणून घ्या चित्रपटाची लांबी आणि बदल

मुंबई: रणवीर सिंगच्या बहुप्रतिक्षित 'धुरंधर: द रिव्हेंज' या चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

महापुरुषांची नावे संक्षिप्त घेणाऱ्यांवर कारवाई करा; शिवसेना नगरसेवकांची मागणी

मुंबई: मुंबई महापालिकेच्या वतीने जोगेश्वरी रुग्णालयाचे नामकरण हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब