पुलाच्या कामामुळे कल्याणमध्ये वाहतूक मार्गात २० दिवस बदल , वालधुनी उड्डाणपुलावर काम सुरू

कल्याण : कल्याण पश्चिम आणि कल्याण पूर्वेला जोडणारा वालधुनी उड्डाणपूल दुरुस्तीच्या कामासाठी काही काळ वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पुलाच्या डांबरीकरणासह आवश्यक दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आल्यामुळे वाहनचालकांना पुढील काही दिवस वाहतूक कोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार २० डिसेंबरच्या रात्रीपासून हा पूल पुढील २० दिवसांसाठी पूर्णपणे बंद राहणार असून १० जानेवारी २०२६ पर्यंत वाहतूक बंद असणार आहे. यासंदर्भात वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.


शाळांना नाताळच्या सुट्ट्या सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या दैनंदिन वाहतुकीवर कमी परिणाम व्हावा, या उद्देशाने या कालावधीत दुरुस्तीचे काम नियोजित करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. या काळात नागरिकांनी नियोजित पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


या कालावधीत कल्याण पूर्वेकडून स्व. आनंद दिघे उड्डाणपुलावरून शहरात येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना सम्राट चौकातून वालधुनी पुलाकडे जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. संबंधित वाहनांनी सम्राट चौकात उजवीकडे वळून शांतीनगर-उल्हासनगर मार्गे आपल्या इच्छित स्थळी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उल्हासनगरकडून वालधुनी पुलाच्या माध्यमातून कल्याण पश्चिमेकडे येणाऱ्या वाहनांनाही सम्राट चौकात प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. ही वाहने डावीकडे वळवून स्व. आनंद दिघे उड्डाणपुलाच्या दिशेने वळवली जाणार आहेत.


तसेच कल्याण पश्चिमेकडून वालधुनी पुलावरून उल्हासनगर किंवा स्व. आनंद दिघे उड्डाणपुलामार्गे कल्याण पूर्वेकडे जाणाऱ्या वाहनांना सुभाष चौकात थांबवण्यात येणार आहे. ही वाहने पुढे कर्णिक रोडने जात प्रेम ऑटो परिसरात उजवे वळण घेऊन शहाड पुलामार्गे मार्गस्थ केली जाणार आहेत. नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Comments
Add Comment

पेपर सुरु असताना विद्यार्थिंनीसोबत घडला लाजिरवाणा प्रकार, नेमकं घडलं काय?

नाशिक: नाशिकमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. १३ मार्च रोजी दहावीचा पेपर सुरू असताना एका

सहावीत शिकणाऱ्या मुलीवर ॲसिड हल्ला करणाऱ्या आरोपीचे रेखाचित्र जारी; पोलिसांनी केलं आवाहन

संगमनेर: अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील ॲसिड हल्ला प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. एका सहा

मुंबईतील जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचे ऑडिट, भाजपाने का केली मागणी?

मुंबई: मुंबईत बोगस जन्म प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्र

कडक शिस्तीच्या महापौर बाई, जेव्हा सभागृहात किशोरी पेडणेकर यांना चिडीचूप करतात तेव्हा...

मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठाला आता २५ वर्षांनंतर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे. मात्र, या विरोधी बाकांवर

इराणप्रश्नी भारताने ठाम भूमिका घ्यायला हवी होती; राज ठाकरेंचे वक्तव्य

मुंबई: "इराणने दीर्घकाळ भारताला साथ दिली. आता त्या देशावर हल्ले होत असताना भारतानेही ठामपणे पाठिंबा द्यायला हवा

महाराष्ट्रात गेमिंग, क्रिएटर इकॉनॉमी आणि पायाभूत सुविधा उभारण्यावर भर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कंटेंट क्रिएटर्ससोबत संवाद

मुंबई: महाराष्ट्रात गेमिंग, क्रिएटर इकॉनॉमी, शिक्षण आणि डिजिटल पायाभूत सुविधा उभारण्यासाठी शासन सक्षम वातावरण