Ramesh Chennithala : महाविकास आघाडी फुटली, काँग्रेसने उबाठाविरोधात ठोकला शड्डू; रमेश चेन्निथलांची घोषणा

मुंबई महापालिका स्वबळावर लढणार


मुंबई : मुंबई पालिका निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीत मोठी फूट पडली आहे. काँग्रेसने ही निवडणूक स्वबळावर लढण्याची अधिकृत घोषणा केली असून, थेट उबाठा गटाला आव्हान दिले आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी शनिवारी मुंबईत पक्षाच्या बैठकीनंतर ही घोषणा केली. “आम्ही भाजप आणि उबाठाविरोधात निवडणूक लढवणार आहोत”, असे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसच्या या निर्णयामुळे मविआतील समीकरणे मात्र पूर्णपणे बदलली आहेत.


रमेश चेन्निथला सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. काँग्रेसच्या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “काँग्रेस मुंबई महापालिकेच्या २२७ जागांवर स्वतंत्रपणे उमेदवार उभे करेल. आम्ही भाजप आणि उबाठा गटाविरोधात लढणार आहोत. सच्चे देशभक्त, धर्मनिरपेक्ष आणि मुंबईच्या विकासासाठी समर्पित असलेल्या लोकांनी आमच्यासोबत यावे. सत्ता आमच्याकडे आल्यानंतर मुंबईचा कारभार पारदर्शी आणि जनमुखी पद्धतीने चालवू. याबाबतचा सविस्तर जाहीरनामा लवकरच मतदारांसमोर सादर करू", असे त्यांनी सांगितले.



पालिकेच्या कारभारावर टीका


चेन्निथला यांनी मुंबई महापालिकेच्या कारभारावर टीका कली. ते म्हणाले, गेल्या चार वर्षांपासून निवडणुका न झाल्याने प्रशासकीय हस्तक्षेप वाढला असून, मुंबईकरांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवले गेले आहे. वाढते प्रदूषण, रुग्णालयांची दयनीय अवस्था, आरोग्य सुविधांची कमतरता, रस्त्यांची खराब स्थिती आणि सर्वत्र पसरलेला भ्रष्टाचार यामुळे सामान्य मुंबईकर, विशेषतः गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. देशाच्या आर्थिक राजधानीत नागरिकांना पाणी, स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षणासारख्या मूलभूत गरजा पूर्ण होत नसतील, तर हे अत्यंत दुर्दैवी आहे, असे ते म्हणाले.

Comments
Add Comment

Air India Safety : हवाई प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्या, केंद्र सरकारचे एअर इंडियाला आदेश

नवी दिल्ली : फुकेतहून दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात झालेल्या ‘टर्ब्युलन्स’ (हवेचे धक्के) आणि विमान

Rahul Gandhi News: राहुल गांधी यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

नवी दिल्ली: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एका आदेशाविरोधात सर्वोच्च

Packaged Food : पॅकबंद अन्नावरील 'इशारा लेबल' प्रकरणी सुप्रीम कोर्ट संतप्त

नवी दिल्ली : पॅकबंद खाद्यपदार्थांमधील साखर, मीठ आणि सॅच्युरेटेड फॅटचे उच्च प्रमाण दाखवणारे ‘इशाऱ्याचे लेबल्स’

Independence Day : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी लाल किल्ला सज्ज

नवी दिल्ली : यंदा शनिवार १५ ऑगस्ट २०२६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत लाल किल्ल्यावर ८० वा

Sangeet Natak Akademi Award : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान

· महाराष्ट्रातील दहा कलावंतांचा राष्ट्रीय गौरव · संगीत, नृत्य, नाट्य व लोककलेतील योगदानाचा

Vande Mataram : वंदे मातरमच्या १५० वर्षपूर्तीनिमित्त पहिल्यांदाच लाल किल्ल्यावरून राष्ट्रीय गीत गायले जाणार

जेन-झींचं प्रतिनिधीत्व अधिक पाहायला मिळणार नवी दिल्ली : सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण मानला जाणाऱ्या