Ramesh Chennithala : महाविकास आघाडी फुटली, काँग्रेसने उबाठाविरोधात ठोकला शड्डू; रमेश चेन्निथलांची घोषणा

मुंबई महापालिका स्वबळावर लढणार


मुंबई : मुंबई पालिका निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीत मोठी फूट पडली आहे. काँग्रेसने ही निवडणूक स्वबळावर लढण्याची अधिकृत घोषणा केली असून, थेट उबाठा गटाला आव्हान दिले आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी शनिवारी मुंबईत पक्षाच्या बैठकीनंतर ही घोषणा केली. “आम्ही भाजप आणि उबाठाविरोधात निवडणूक लढवणार आहोत”, असे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसच्या या निर्णयामुळे मविआतील समीकरणे मात्र पूर्णपणे बदलली आहेत.


रमेश चेन्निथला सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. काँग्रेसच्या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “काँग्रेस मुंबई महापालिकेच्या २२७ जागांवर स्वतंत्रपणे उमेदवार उभे करेल. आम्ही भाजप आणि उबाठा गटाविरोधात लढणार आहोत. सच्चे देशभक्त, धर्मनिरपेक्ष आणि मुंबईच्या विकासासाठी समर्पित असलेल्या लोकांनी आमच्यासोबत यावे. सत्ता आमच्याकडे आल्यानंतर मुंबईचा कारभार पारदर्शी आणि जनमुखी पद्धतीने चालवू. याबाबतचा सविस्तर जाहीरनामा लवकरच मतदारांसमोर सादर करू", असे त्यांनी सांगितले.



पालिकेच्या कारभारावर टीका


चेन्निथला यांनी मुंबई महापालिकेच्या कारभारावर टीका कली. ते म्हणाले, गेल्या चार वर्षांपासून निवडणुका न झाल्याने प्रशासकीय हस्तक्षेप वाढला असून, मुंबईकरांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवले गेले आहे. वाढते प्रदूषण, रुग्णालयांची दयनीय अवस्था, आरोग्य सुविधांची कमतरता, रस्त्यांची खराब स्थिती आणि सर्वत्र पसरलेला भ्रष्टाचार यामुळे सामान्य मुंबईकर, विशेषतः गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. देशाच्या आर्थिक राजधानीत नागरिकांना पाणी, स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षणासारख्या मूलभूत गरजा पूर्ण होत नसतील, तर हे अत्यंत दुर्दैवी आहे, असे ते म्हणाले.

Comments
Add Comment

अयोध्येच्या राम मंदिरात ७० नवे पुजारी

नवी मुंबई  : अयोध्येतील राम मंदिराचे काम पूर्ण झाले आहे. नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

चालक परवान्याचे वेळेत नूतनीकरण करणे अनिवार्य

नवी दिल्ली  : चालक परवान्याची मुदत ज्या दिवशी संपते, त्याच दिवसापासून संबंधित व्यक्तीचा चालक म्हणून असलेला दर्जा

राजस्थानच्या फतेहपूर-माउंट अबूमध्ये तापमान ४ अंश सेल्सिअस

नवी दिल्ली  : उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेशसह ८ राज्यांमध्ये शनिवारी सकाळी कडाक्याच्या थंडीसह दाट

होमगार्ड पदासाठी पदवीधरांची गर्दी

भुवनेश्वर  : ओडिशात संबलपूर येथे होमगार्डच्या भरती परीक्षेसाठी ८ हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने त्यांची

कर संकलनामध्ये भारताची विक्रमी झेप, सरकारच्या तिजोरीत १७.०४ लाख कोटी जमा

नवी दिल्ली  : चालू आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेसाठी देशाच्या दिलासादायक बातमी आहे. १ एप्रिल ते १७ डिसेंबर या

PMVBRY Employment : पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना जाहीर; ३.५ कोटी नोकऱ्यांसाठी केंद्र सरकारचा ९९,४४६ कोटींचा मेगा प्लॅन

नवी दिल्ली : देशातील बेरोजगारीची समस्या दूर करण्यासाठी आणि तरुणांना स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकारने