Ramesh Chennithala : महाविकास आघाडी फुटली, काँग्रेसने उबाठाविरोधात ठोकला शड्डू; रमेश चेन्निथलांची घोषणा

मुंबई महापालिका स्वबळावर लढणार


मुंबई : मुंबई पालिका निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीत मोठी फूट पडली आहे. काँग्रेसने ही निवडणूक स्वबळावर लढण्याची अधिकृत घोषणा केली असून, थेट उबाठा गटाला आव्हान दिले आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी शनिवारी मुंबईत पक्षाच्या बैठकीनंतर ही घोषणा केली. “आम्ही भाजप आणि उबाठाविरोधात निवडणूक लढवणार आहोत”, असे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसच्या या निर्णयामुळे मविआतील समीकरणे मात्र पूर्णपणे बदलली आहेत.


रमेश चेन्निथला सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. काँग्रेसच्या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “काँग्रेस मुंबई महापालिकेच्या २२७ जागांवर स्वतंत्रपणे उमेदवार उभे करेल. आम्ही भाजप आणि उबाठा गटाविरोधात लढणार आहोत. सच्चे देशभक्त, धर्मनिरपेक्ष आणि मुंबईच्या विकासासाठी समर्पित असलेल्या लोकांनी आमच्यासोबत यावे. सत्ता आमच्याकडे आल्यानंतर मुंबईचा कारभार पारदर्शी आणि जनमुखी पद्धतीने चालवू. याबाबतचा सविस्तर जाहीरनामा लवकरच मतदारांसमोर सादर करू", असे त्यांनी सांगितले.



पालिकेच्या कारभारावर टीका


चेन्निथला यांनी मुंबई महापालिकेच्या कारभारावर टीका कली. ते म्हणाले, गेल्या चार वर्षांपासून निवडणुका न झाल्याने प्रशासकीय हस्तक्षेप वाढला असून, मुंबईकरांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवले गेले आहे. वाढते प्रदूषण, रुग्णालयांची दयनीय अवस्था, आरोग्य सुविधांची कमतरता, रस्त्यांची खराब स्थिती आणि सर्वत्र पसरलेला भ्रष्टाचार यामुळे सामान्य मुंबईकर, विशेषतः गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. देशाच्या आर्थिक राजधानीत नागरिकांना पाणी, स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षणासारख्या मूलभूत गरजा पूर्ण होत नसतील, तर हे अत्यंत दुर्दैवी आहे, असे ते म्हणाले.

Comments
Add Comment

Vande Mataram : शाळांपासून संसदेपर्यंत आता संपूर्ण 'वंदे मातरम्' घुमणार! केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय, सर्व ६ कडवी आता अनिवार्य

नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात क्रांतीची ठिणगी टाकणाऱ्या 'वंदे मातरम्' या गीताचा सन्मान वाढवण्यासाठी

Sunetra Pawar : दिल्लीत राजकीय खलबतं! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मोदी-शाहांच्या भेटीला, तर रोहित पवारही राजधानीत

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्र आज मुंबईहून देशाची राजधानी दिल्लीत सरकले आहे. राज्याच्या

Rohit Pawar : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघात नव्हे घातपात!

- रोहित पवार यांनी व्यक्त केला संशय; पूर्व विदर्भातील नेत्याच्या फाईलवर सही करण्यास उशीर झाल्याने करावा लागला

EPFO 3.0 : नोकरदारांसाठी मोठी बातमी : आता पीएफचे पैसे मिळतील एका क्लिकवर, 'ही' आहे महत्त्वाची तारीख!

नवी दिल्ली : देशातील सुमारे ८ कोटी नोकरदार कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. कर्मचारी

Thanya Nathan C: अभिमानस्पद! देशाला मिळाल्या पहिल्या दृष्टिहीन महिला न्यायाधीश

देशाला लवकरच पहिल्या महिला दृष्टिहीन न्यायाधीश मिळणार आहेत. ही देशासाठी अभिमानस्पद गोष्ट आहे. केरळच्या

Delhi Crime: पलंगाखाली सापडला खजिना, मोलकरीण ३० लाखांचे दागिने घेऊन फरार

नवी दिल्ली: द्वारका येथे एका मोलकरणीने केलेल्या मोठ्या चोरीचा उलगडा दिल्ली पोलिसांनी केला आहे. जलदगतीने कारवाई