माणिकराव कोकाटे सर्वोच्च न्यायालयात जाणार?

मुंबई (प्रतिनिधी): जामीन मंजूर झाल्यामुळे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांची अटक टळली मात्र त्यांच्या आमदारकीवर अजूनही टांगती तलवार कायम आहे. आता आमदारकी वाचवण्यासाठी कोकाटे सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती मिळत आहे.


बनावट कागदपत्रांच्या आधारे चार सरकारी सदनिका लाटल्याप्रकरणी नाशिक सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावलेले कोकाटे यांना या याचिकेवरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. मात्र, त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला.


माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिल्याने त्यांच्या आमदारकीवरील संकट कायम आहे. नियमानुसार दोन वर्षांची शिक्षा ठोठावल्यानंतर संबंधित लोकप्रतिनिधीचे पद धोक्यात येते. उच्च न्यायालयाने कोकाटेंच्या आमदारकीचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निर्णय देतात, याकडे लक्ष लागले आहे.


दरम्यान, कोकाटे उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत हाती येताच सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती मिळत आहे. प्रकरण उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असल्याने सत्र न्यायालयाच्या निकालाला स्थगिती देण्याची मागणी करणार आहेत.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा कांस्य पुतळा

नवी मुंबई विमानतळ : महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय

Vladimir Putin : भारतावर निर्बंधांचा परिणाम होणार नाही, पुतिन यांचा मोदींवर विश्वास

मॉस्को : ‘भारत आणि रशिया यांच्यातील सहकार्य आणि व्यापारी भागीदारी अत्यंत मजबूत आहे. कोणत्याही देशाने दिलेल्या

Gautami Patil's new song : गौतमी पाटीलचं नवं गाणं होतंय तुफान व्हायरल, भाऊ कदम म्हणतोय 'हिल हिल पोरी हिला’

Gautami Patil's new song : गौतमी पाटीलला महाराष्ट्रात कोणी ओळखत नाही असं फार क्वचित वेळेत दिसून येईल. सबसे कातील गौतमी पाटील अशी

Chalisgaon : चाळीसगाव महावितरणाचा अजब कारभार: अधिकारी 'मस्तवाल', जनता 'बेहाल'!

Chalisgaon :  चाळीसगाव शहरासह परिसरात महावितरण विभागाचा मनमानी कारभार शिगेला पोहोचला असून, सध्या 'त्रस्त नागरिक आणि

BCCI SELECTION : BCCI कडून दोन मोठ्या स्पर्धांसाठी भारतीय संघांची घोषणा; श्रेयस अय्यरकडे नेतृत्व, तिलक वर्मा उपकर्णधार

MUMBAI : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आगामी इंग्लंड दौरा 2026 आणि आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 (जपान) यासाठी भारतीय पुरुष

BCCI SQUAD SELECTION : भारतीय क्रिकेट संघाच्या निवडीसाठी बीसीसीआयची बैठक सुरू; श्रेयस अय्यरकडे सोपवली जाणार धुरा?

BCCI : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) वरिष्ठ निवड समिती आज मुंबईतील मुख्यालयात महत्त्वाची बैठक घेत आहे. या बैठकीत