'महाविस्तार ॲप' जिल्ह्यातील शिवारात क्रांती घडविणार

कृषी विभागाचा एआय तंत्रज्ञानावर विशेष भर ; १८ हजार वापरकर्ते


अलिबाग : कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय तंत्रज्ञानावर आधारित आणि शेतकऱ्यांसाठी डिजिटल सल्लागार म्हणून महाविस्तार अॅप कृषी क्षेत्रात डिजिटल क्रांती घडवत आहे. हे महाविस्तार अॅप सध्या शेतकऱ्यांसाठी डिजिटल सल्लागार म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत असून, रायगड जिल्ह्यातील १८ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी याचा वापर करीत शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराची कास धरली आहे.


हे अॅप शेतकऱ्यांमध्ये दिवसेंदिवस लोकप्रिय ठरत चालले आहे. या अॅपचा वापर करण्याकडे शेतकऱ्यांचाही दिवसेंदिवस कल वाढत चालला असून, त्यामुळे हे महाविस्तार अॅप कृषी क्रांतीत शेतकऱ्यांचा डिजिटल फ्रेंड बनले आहे, या अॅपच्या माध्यमातून कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना शेतीविषयक आवश्यक सल्ले देत त्यावर विविध उपाययोजना सांगून कृषी क्रांतीत आमूलाग्र बदल घडवला जात आहे. रायगड जिल्ह्यातील १८ हजार ६४५ शेतकऱ्यांनी हे अॅप डाऊनलोड करून त्याचा वापर सुरू केला आहे. रोहा तालुक्यात सर्वाधिक १ हजार ९८० शेतकरी याचा वापर करीत आहेत. शेतकऱ्यांना सुलभ मार्गदर्शन लाभावे म्हणून कृषी विभागातर्फे महाविस्तार एआय हे अॅप विकसित करण्यात आलेले आहे. गेल्या २१ मेपासून हे अॅप कार्यान्वित झाले आहे. या अॅपद्वारे शेतकऱ्यांसाठी पीक सल्ला, हवामानाचा अचूक अंदाज, मृद आरोग्य पत्रिका, खत मात्रा गणक, माहितीपूर्ण व्हिडीओ आणि शेतीशाळा, हवामान अनुकूल तंत्रज्ञान आदींची इत्यंभुत माहिती आणि कृषीविषयक माहिती उपलब्ध करून दिली जात आहे.


अॅपविषयी अधिक माहिती


शेतकऱ्यांना वापर करण्याच्या दृष्टीने हे अॅप सुलभ व सोपे आहे. गुगल प्ले स्टोअरवर जाऊन महाविस्तार एआय अॅप डाउनलोड करता येतो. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या अॅपचा वापर करावा म्हणून कृषी विभागातर्फे जनजागृती मोहीम राबवली जात आहे. शेतकऱ्यांनी या अॅपचा वापर करून कृषी क्षेत्रातील या डिजिटल क्रांतीत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठी डिजिटल सल्लागार म्हणून महत्त्वाची भूमिका बजावणारे महाविस्तार एआय हे अॅप शेतकऱ्यांमध्ये दिवसेंदिवस लोकप्रिय ठरत असून, शेतकऱ्यांचा कल वाढत चालला आहे.

Comments
Add Comment

जिल्ह्यातील १८१ आदिवासी वाड्या रस्त्याविना

अलिबाग : आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहासोबत आणण्याचा आणि त्यांचा सर्वांगीण विकास घडवून यावा, या उद्देशाने

अवचित गडाचा मार्ग आता होणार सुखकर

खारापटीतील तरुणांनी केली रस्ता दुरुस्ती रोहा : ऐतिहासिक वारसा असलेल्या अवचित गडावर जाणाऱ्या रस्त्याची

लोकअदालतीतून वर्षभरात १९ संसारांचे पुनर्मिलन

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे समुपदेशन; तुटणाऱ्या नात्यांना नवसंजीवनी अलिबाग: बदलती जीवनशैली, वाढता ताणतणाव,

रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा आधारवड

८ महिन्यांत ६० रुग्णांना मिळाली मदत अलिबाग:रायगड जिल्ह्यातील गरीब, गरजू रुग्णांसाठी जिल्हास्तरीय मुख्यमंत्री

वर्षभरात ६२७ अपघातात २५८ जणांचा मृत्यू

रस्ते बनलेत मृत्यूचा सापळा; अपघातांना कारणीभूत धोकादायक वळणे, रस्त्यांची दुरवस्था वाहनांची वाढलेली वर्दळ,

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लांबणीवर

नांदगाव मुरुड : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याच्या