मतदार याद्यांच्या सखोल तपासणीतून तामिळनाडूत ९८ लाख नावे हटविली

मृत, स्थलांतरीत, तसेच दुबार-तिबार नावांचा समावेश


२६ लाख ९४ हजार मृत मतदारांचा समावेश , ६६ लाख ४४ हजार मतदार कायमस्वरूपी स्थंलातरीत , ३ लाख ३९ हजार २७८ दुबार मतदार


नवी दिल्ली :  सध्या देशातील काही राज्यांत सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या पुनरीक्षणादरम्यान, तामिळनाडूमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एसआयआरनंतर तयार करण्यात आलेल्या तामिळनाडूमधील मतदार यादीच्या मसुद्यामधून तब्बल ९७ लाख ३७ हजार ८३२ नावे हटववण्यात आली आहेत. तर नव्या मतदार यादीच्या मसुद्यामध्ये ५ कोटी ४३ लाख, ७६ हजार ७५५ मतदारांचा समावेश आहे.


तामिळनाडूच्या मुख्य निवडणूक अधिकारी अर्चना पटनायक यांनी सांगितले की, मतदार याद्यांच्या पुनरीक्षणानंतर तयार करण्यात आलेल्या राज्यातील मतदार याद्यांच्या मसुदा यादीमध्ये ५ कोटी ४३ लाख, ७६ हजार ७५५ मतदारांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये २ कोटी ६६ हजार महिला आणि २ कोटी ७७ लाख पुरुषांचा समावेश आहे. एसआयआर पूर्वी तामिळनाडूमध्ये सुमारे ६ कोटी ४१ लाख नोंदणीकृत मतदार होते. तसेच या प्रक्रियेनंतर त्यापैकी तब्बल ९७ लाख ३७ हजार ८३२ मतदारांची नावे हटवण्यात आली आहेत.



नोंदणीकृत पत्त्यावर मतदार आढळलेच नाही


हटवण्यात आलेल्या मतदारांमध्ये २६ लाख ९४ हजार मृत मतदारांचा समावेश आहे. तर ६६ लाख ४४ हजार मतदार असे आहेत; जे कायमस्वरूपी स्थलांतरीत झालेले आहेत. ३ लाख ३९ हजार २७८ दुबार मतदारांची नावेही यादीतून हटवण्यात आली आहेत. या मतदारांची नाव एकापेक्षा अधिक ठिकाणी नोंदवलेली आहेत. ज्या मतदारांना स्थलांतरीत म्हणून चिन्हांकित करण्यात आले होते. त्यातील ६६ लाख ४४ हजार ८८१ मतदार राज्यात घरोघरी जाऊन करण्यात आलेल्या पडताळणीच्या तीन टप्प्यांनंतरही नोंदणीकृत पत्त्यावर आढळून आले नसल्याची माहिती अर्चना पटनायक यांनी दिली.



मतदारांना हटवण्याचा कट


दरम्यान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी केलेल्या तीव्र विरोधानंतरही तामिळनाडूमध्ये एसआरआयची प्रक्रिया पार पाडण्यात आली आहे. स्टॅलिन यांच्या डीएमके पक्षाने एसआयआरविरोधात सर्वोच्च न्यायालयात एक याचिकादेखील दाखल केली होती. आता एसआयआरवर टीका करताना स्टॅलिन यांनी त्याचा लोकशाहीविरोधी पाऊल असा उल्लेख केला आहे.

Comments
Add Comment

देवेंद्र फडणवीसांच्या एका कॉलनं बदलला निर्णय, प्राजक्त तनपुरेंनी राहुरी पोटनिवडणुकीतून घेतली माघार

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार अर्ज भरण्याची मुदत सोमवारी संपुष्टात आली आहे. या निवडणुकीत दिवंगत

Nagpur Crime : नागपूर हादरलं! पैशांसाठी १४ वर्षीय मित्राची निघृण हत्या

नागपूर : नागपूर शहरात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. शहराला हादरवून सोडणाऱ्या १४ वर्षीय मुलाच्या अपहरण आणि

Gautami patil : गौतमी पाटीलच्या 'या' नवीन गाण्यानं घातला धूमाकूळ

मुंबई : आपल्या मनमोहक अदांनी प्रेक्षकांची मनं जिंकणारी महाराष्ट्राची लाडकी नृत्यागंणा गौतमी पाटील ( Gautami Patil ) चा

Gautami Patil : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर गौतमी पाटीलनं दिली प्रतिक्रिया, म्हणाली...

नाशिक : नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरातचे दिवसेंदिवस अनेक काळे कारनामे समोर येत असून महिला लैंगिक शोषण, आर्थिक

Bigg Boss Marathi 6 : पहिला फायनलिस्ट कोण ठरणार ? तिकीट टू फिनालेची उत्सुकता वाढली

मुंबई : बिग बॉस मराठी ६ सीझन आता शेवटच्या टप्प्यात पोहचलं असून ११ जानेवारी २०२५ रोजी सुरु झालेल्या बिग बॉस मराठी

Ramayana Movie : रामायणमध्ये भूमिका साकारणार बिग बींचा जावई, 'या' महत्वाच्या भूमिकेत झळकणार

मुंबई : रामायण ( Ramayana ) सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरु असून रामायणमधील रणबीर कपूर ( Ranbir Kapoor) चा पहिला लूक पाहिल्यानंतर