वाशी सुविधा केंद्रातून हंगामातील डाळिंबाचा पहिला कंटेनर समुद्र मार्गे अमेरिकेसाठी रवाना - पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी राज्याची पणन व्यवस्था अत्याधुनिक व सर्व सोयी-सुविधायुक्त करण्यासाठी शासन प्रयत्नशील


मुंबई : महाराष्ट्रात उत्पादित डाळिंबाचा हंगामातील पहिला कंटेनर मुंबईतील जेएनपीटी बंदरातून समुद्रमार्गे अमेरिकेसाठी रवाना करण्यात आला असून, कृषी पणन मंडळाच्या वाशी नवी मुंबई येथील विकिरण सुविधा केंद्रावरून हा कंटेनर रवाना करण्यात आला आहे. राज्यातील फळनिर्यातीच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा आहे,अशी माहिती राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.


सध्याच्या काळात अमेरिका - भारत कृषी-निर्यातविषयक घडणाऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये उच्चस्तरीय चर्चा सुरू आहेत. अशा परिस्थितीत डाळिंबाचा पहिला कंटेनर रवाना होणे हे भारताची विश्वासार्हता, गुणवत्ता आणि आंतरराष्ट्रीय मानकांशी सुसंगततेचे प्रतीक असल्याचे मानले जात आहे.


यासंदर्भात पणनमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील उत्पादित होणारे फळे भाजीपाला आणि इतर शेतमालाला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धात्मक दर मिळण्यासाठी जागतिक स्पर्धेत टिकेल अशी पणन व्यवस्था सक्षम करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. आंबे,डाळिंब इतर फळे व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या मेहनतीला जागतिक बाजारपेठेत स्पर्धात्मक मूल्य मिळावे, यासाठी राज्य शासन, कृषि पणन मंडळ आणि केंद्र शासन प्रयत्नशील आहे. अमेरिकेसाठी हंगामातील पहिला जेएनपीटी बंदरातून डाळिंब कंटेनर रवाना होणे हे राज्याच्या कृषी-निर्यात क्षमतेसाठी तसेच शेतकऱ्यांना उत्पन्नवाढीच्या दृष्टीने प्रोत्साहित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. येणाऱ्या काळात निर्यात सुविधा केंद्रातून मोठ्या क्षमतेने डाळिंब निर्यात केले जाणार आहेत असे पणन मंत्री म्हणाले”


भारतीय डाळिंबांचा अमेरिकन बाजारपेठेतील वाटा वाढल्यास राज्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न  २० ते ३०  टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी नमूद केले. यासाठी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, अपेडा, एनपीपीओ व निर्यातदार अमेरिकन अधिकाऱ्यांसोबत सातत्याने तांत्रिक व धोरणात्मक पातळीवर कार्यरत आहेत.


सन २०१७ -१८  मध्ये काही तांत्रिक कारणामुळे अमेरिकेला भारतातून डाळिब निर्यात बंद झाली होती. परिणामी जवळपास सहा वर्षे भारतीय डाळिंब अमेरिकन बाजारपेठेत पोहोचू शकला नव्हता. निर्यात पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्र शासनाच्या अपेडा व राष्ट्रीय वनस्पती संरक्षण संस्था (एनपीपीओ) यांनी अमेरिकेच्या कृषी विभागाशी (यू.एस.डी.ए.) तांत्रिक व प्रशासकीय पातळीवर सातत्याने चर्चा करून कृषी पणन मंडळाच्या विकिरण सुविधा केंद्रावर आवश्यक चाचण्या घेऊन अहवाल सादर केले.

पॅक-हाऊसमध्ये डाळिंबाची प्रतवारी व प्रक्रिया आंतरराष्ट्रीय मानकांनुसार करण्यात आली. त्यानंतर यू.एस.डी.ए. व एनपीपीओ अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष तपासणीनंतर विकिरण प्रक्रिया पार पाडण्यात आली.४८००  बॉक्सेसमधून १७६१६  किलो (सुमारे १७.६  मेट्रिक टन) डाळिंब निर्यात करण्यात आली आहे.


सन २०२४  मध्ये अमेरिकेने निर्यातीसाठी काही शास्त्रीय निकष लागू केले आहेत. यामध्ये माईट वॉश प्रोटोकॉल, सोडियम हायपोक्लोराईडद्वारे निर्जंतुकीकरण, तसेच वॉशिंग व ड्रायिंग प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. तसेच डाळिंबाचे ४ किलो क्षमतेच्या प्रमाणित बॉक्समध्ये पॅकेजिंग करून अधिकृत विकिरण सुविधा केंद्रात विकिरण प्रक्रिया करण्यात आली आहे. या सर्व प्रक्रिया यू.एस.डी.ए. व एनपीपीओ अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष तपासणी व मान्यतेनंतरच पूर्ण केल्या गेल्या आहेत.


या प्रसंगी यू.एस.डी.ए. निरीक्षक श्री. रॉबर्टो रिवाझ, एनपीपीओचे डॉ. बी. एल. मिना, कृषि पणन मंडळाचे विभाग प्रमुख श्री. अनिमेष पाटील, अपेडाचे श्री. बामणे तसेच संबंधित अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.


कृषि पणन मंडळाचे कार्यकारी संचालक श्री. संजय कदम यांनी सांगितले की, “चालू २०२५ -२६  हंगामात अमेरिकेस सुमारे ३००  मेट्रिक टन डाळिंब निर्यातीचे नियोजन करण्यात आले आहे.”


अमेरिकेतील बाजारपेठेत डाळिंबाची मागणी झपाट्याने वाढत असून, तेथील डाळिंब बाजारपेठ सध्या अंदाजे १.२  ते १.५  अब्ज अमेरिकी डॉलर इतकी आहे. विशेषतः भारतीय ‘भगवा’ व ‘सुपर भगवा’ जातींना चव, रंग व साखर-आम्ल संतुलनामुळे अधिक मागणी आहे.

Comments
Add Comment

MLC Election : विधानपरिषदेच्या १५ जागांवर भाजप वरचढ

 शिवसेना-राष्ट्रवादीकडे केवळ एकेका जागेवर बहुमत; पुण्यात भाजप-राष्ट्रवादीत मोठी चढाओढ मुंबई : विधानपरिषदेच्या

Shiv Thakare :शिव ठाकरेचे मुंबईतील घर पाहिले का? ‘या’ गोष्टींनी वेधले लक्ष

Shiv Thakare Home Tour: फराह खानने बॉलीवूडमध्ये कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहे. तसेच ती अनेक

Yash Dayal : हा माझा निर्णय नव्हता; यश दयालच्या वक्तव्यानं खळबळ, RCB व्यवस्थापनावर अप्रत्यक्ष सवाल

IPL 2026 :रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (आरसीबी) वेगवान गोलंदाज यश दयाल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आयपीएल २०२६ च्या संपूर्ण

अपघातग्रस्त कामगारांच्याबाबत प्रत्यारोपण शस्त्रक्रियांच्या तातडीसाठी उपाययोजना करा; कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर

मुंबई : राज्यातील कारखान्यांमध्ये आणि औद्योगिक कंपन्यांमध्ये मशीनवर काम करताना अपघात होऊन हात गमावावा

Mantri Nitesh Rane : हर्षवर्धन सपकाळ यांनी लायकीनुसार बोलावे ! मंत्री नितेश राणे

मंत्री नितेश राणे यांचा हल्लाबोल; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीकेला

Divyanka Tripathi Dahiya : लग्नाच्या 10 वर्षांनी प्रेग्नंट दिव्यांका त्रिपाठी, जुळ्या मुलांची झाली आई !

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी (Divyanka Tripathi) आणि अभिनेता विवेक दहिया (Vivek Dahiya) यांच्या आयुष्यात नवा