मध्यरात्री झोपेतच विद्यार्थ्यांचे केस आणि भुवया कापल्या!

चास आश्रमशाळेतील प्रकार


मोखाडा : मोखाडा तालुक्यातील चास आश्रमशाळेत एका १४ वर्षीय विद्यार्थ्यासोबत घडलेल्या विचित्र प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून मुलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, वस्तीगृहात सर्व विद्यार्थी झोपलेले असताना ही घटना घडली. अज्ञात व्यक्तीने सुविदासच्या डोक्यावरील केस आणि भुवया अशा पद्धतीने कापल्या की, त्याला काही ठिकाणी जखमा देखील झाल्या आहेत.


आपल्या मुलाच्या बाबतीत घडलेल्या या विचित्र प्रकारामुळे वडील शंकर जाधव यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. "आश्रमशाळेत मुले सुरक्षित नसतील तर कोणाकडे बघायचे? जर रात्रीच्या वेळी एखादा मोठा अनर्थ घडला असता, तर त्याला जबाबदार कोण?" असा संतप्त सवाल पालकांनी विचारला आहे. तसेच वस्तीगृहातील अधीक्षकांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या प्रकरणाबाबत मुख्यध्यापक संजय गडपाले यांना विचारणा केली असता, त्यांनी हा प्रकार मुलांनीच एकमेकांच्या खोड्या काढताना केला असावा, अशी शक्यता वर्तवली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने मुलांच्या वस्तीगृहात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

भारतातील मलेरिया रुग्णसंख्येत लक्षणीय घट

मुंबई : मलेरिया हा आजार एकेकाळी भारतातील सार्वजनिक आरोग्यासमोरील मोठे आव्हान मानला जात होता. मात्र गेल्या दशकात

‘जा-मर’ म्हणणे जीवन संपविण्यास प्रवृत्त करणे नव्हे!

हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल कोची : दोन व्यक्तीच्या भांडणादरम्यान एकाने जा आणि मर यांसारखी विधाने करणे हे

मुंबई-बडोदरा आणि भिवंडी-मनोर मार्गांचे काम युद्धपातळीवर

रस्त्यांच्या जाळ्यांमुळे विकासाची कोंडी फुटणार वसंत भोईर वाडा : गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्थेचा सामना

किश्तवाड जिल्ह्यातील मोबाईल, इंटरनेट सेवा बंद

नवी दिल्ली : श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात लपून बसलेल्या जैश-ए-मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांचा

राम मंदिर गर्भगृहात ४०० वर्षं जुन्या संस्कृत वाल्मीकी रामायणाची प्रत

मंदिराच्या भित्तिचित्र आणि इतर सुविधा अंतिम टप्प्यात अयोध्या : श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या

‘मेड इन इंडिया’ अनमॅन्ड क्राफ्ट भारतीय नौसेनेत

नवी दिल्ली : भारतीय नौसेनेच्या क्षमतेत लवकरच मोठी भर पडणार आहे. पुण्यातील सागर डिफेन्स इंजिनिअरिंग या