माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा

माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा


मुंबई : बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका मिळवल्याप्रकरणी नाशिक सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवल्यानंतर क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला होता. अजित पवार यांनी गुरुवारी तो स्वीकारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला आहे.


कोकाटे यांनी सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात बुधवारी उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, न्यायालयाने तातडीच्या सुनावणीस नकार दिल्याने, त्यांच्या अडचणीत वाढ झाली. कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी झाल्याने, त्यांच्याकडील खाते काढून घेण्याची शिफारस बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे केली. त्यानुसार, कोकाटे यांच्याकडील खाते काढून ते अजित पवार यांच्याकडे सोपविण्यात आले. त्यानंतर, गुरुवारी कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारून तो मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवल्याची माहिती अजित पवार यांनी समाज माध्यमांद्वारे दिली.


न्यायालयाच्या निकालानंतर राजीनामा - अजित पवार


याविषयी अजित पवार म्हणाले, न्यायालयाच्या निकालानंतर कोकाटे यांनी आपला राजीनामा माझ्याकडे सुपूर्द केला आहे. कायदे-नियम हे सर्वोच्च स्थानी असून ते कोणत्याही व्यक्तीपेक्षा सर्वोतोपरी आहेत, पक्षाच्या दीर्घकालीन भूमिकेनुसार हा राजीनामा तत्त्वतः स्वीकारण्यात आला आहे. संवैधानिक प्रक्रियेनुसार पुढील कार्यवाहीसाठी कोकाटे यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला आहे. कोकाटे यांनी उच्च न्यायालयात सादर केलेल्या याचिकेवर शुक्रवारी (दि. १९ डिसेंबर) सुनावणी होणार आहे.


Comments
Add Comment

Cyprus and India : सायप्रस आणि भारत यांच्यातील सांस्कृतिक संबंध दृढ

सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस 'इश्का' बॉलिवूड चित्रपटाचा थाटात मुहूर्त मुंबई :

रस्त्यावरील व दुर्लक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक; मंत्री आदिती तटकरे

मुंबई :  रस्त्यावर राहणाऱ्या, अनाथ, एकल आणि दुर्लक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक’ पथदर्शी योजना सहा

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

अनुदानित खतांसोबत विना अनुदानित खतांची सक्तीची विक्री बंद

कृषी विभागाचा निर्णय; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार मुंबई : "राज्यात काही खत उत्पादक आणि पुरवठादार

टेक-महाइम्पॅक्ट परिषदेत पहिल्याच दिवशी १५० कोटींचे करार

मुंबई : राज्याच्या तंत्रज्ञान आणि औद्योगिक विकासाला मोठी गती देण्यासाठी ‘आयटी’ विभागाच्या वतीने बुधवारी

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत; कृषि मंत्री दत्तात्रय भरणे

द्राक्ष पिकाचा समावेश करण्याचे निर्देश मुंबई : राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी