राज्यातील २९ महानगरपालिकेतील समन्वयक, शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांची आढावा बैठक पार ;प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची माहिती...

विदर्भ, मराठवाडा, उत्तर-पश्चिम महाराष्ट्र, ठाणे विभागातील पदाधिकारी उपस्थित...


राष्ट्रवादी काँग्रेस आणि मुख्यमंत्री यांची बैठक आज अपेक्षित ;महायुती म्हणून सामोरे जायचे यावर धोरण ठरवले जाण्याची शक्यता...


मुंबई - राज्यातील २९ महानगरपालिकेंच्या निवडणूका जाहीर झाल्या असून दिनांक २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. अशावेळी त्या - त्या जिल्ह्यासाठी नेमलेले समन्वयक, शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष यांच्यासमवेत आढावा बैठक घेतल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.


महिला आर्थिक विकास मंडळ सभागृहात पार पडलेल्या बैठकीत विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, लातूर, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, पश्चिम महाराष्ट्रातील पिंपरी - चिंचवड, पुणे, सांगली, इचलकरंजी, कोल्हापूर, सोलापूर, मुंबई - ठाणे विभागातील कल्याण' डोंबिवली, ठाणे शहर, मिरा-भाईंदर, वसई - विरार या महानगर पालिका क्षेत्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यासोबत राजकीय परिस्थिती आणि महायुती म्हणून सामोरे जाताना नेमकी कोणती पाऊले उचलली गेली पाहिजेत व आतापर्यंत त्या- त्या महानगरपालिकेत मित्रपक्षांशी चर्चा झाली असेल याबाबतचा अहवाल घेतला असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.


आज (शुक्रवारी) रात्री राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्यासोबत बैठक होणार आहे. त्यावेळी चर्चा होईल. राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनाही याची माहिती दिली जाईल आणि कदाचित आमची आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बैठक अपेक्षित आहे. ती बैठक झाली तर राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणूकांना महायुती म्हणून सामोरे जायचे यावर धोरण ठरवले जाईल असे स्पष्ट मत सुनिल तटकरे यांनी व्यक्त केले.


महायुतीबाबत ठिकठिकाणी वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलल्यानंतर भाजप प्रभारी यांच्याशी चर्चा करत आहे. त्यामुळे या सर्व निवडणूका महायुती म्हणून सामोरे जाण्याचे धोरण ठरले जाईल असे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सुनिल तटकरे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.


प्रत्येक महानगरपालिकानिहाय राजकीय परिस्थिती वेगवेगळी आहे. ज्या ठिकाणी सत्ता आहे ते अधिक संख्याबळ मागणे हे स्वाभाविक आहे. कार्यकर्त्यांच्या भावना जरुर असतात परंतु महायुती म्हणून चर्चेच्या अनेक फेरी घडवाव्या लागत असतात. परंतु महायुती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अनुकूल आहे असेही सुनिल तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांवर बोलताना सांगितले.

Comments
Add Comment

Flight Incident : दिल्लीत आलेल्या वादळाचा एअर इंडियाच्या तीन विमानांना तडाखा

नवी दिल्ली : दिल्लीत इंदिरा गांधी आंतराष्ट्रीय विमातळावर रविवारी संध्याकाळी ४:३० च्या दरम्यान अचानक जोरात वादळी

Chief Minister Devendra Fadnavis : राज्यातील रेल्वेमार्ग फाटकमुक्त होणार

 मुख्यमंत्र्यांचे 'महारेल'ला आदेश; पहिल्या टप्प्यात १३१ पैकी ६५ उड्डाणपुलांच्या कामांना मान्यता मुंबई :

शेअर बाजारात 'ब्लॅक मंडे' : सेन्सेक्स ७१९ अंकांनी आपटला, निफ्टीचीही मोठी घसरण; गुंतवणूकदारांचे कोट्यवधींचे नुकसान!

नवी दिल्ली : नव्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजाराने गुंतवणूकदारांच्या पदरात मोठी निराशा टाकली

Monsoon Weather Update : अरबी समुद्रात कमी दाबाचे संकट! चक्रीवादळाची शक्यता; मुंबईत मान्सून कधी धडकणार?

मुंबई : राज्यात मान्सूनच्या आगमनाची जोरदार चाहूल लागली असतानाच अरबी समुद्रातील हवामानातील घडामोडींनी हवामान

Nitesh Rane : मटका, जुगारासह ऑनलाइन गेमिंगवर कारवाईसाठी विशेष मोहीम हाती घ्या!

पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश; मंत्रालयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकासकामे व कायदा-सुव्यवस्थेचा घेतला

IND vs AFG Test Match : भारताचा एकतर्फी विजय! एक डाव आणि ३०० धावांनी भारताचा अफगाणिस्तानवर दणदणीत विजय

न्यू चंदीगड : भारतीय संघाने अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात (IND vs AFG Test Match) वर्चस्वपूर्ण कामगिरी करत एका