पत्र गहाळ झाली नसून ती सोनिया गांधींकडे आहेत

केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाची सोशल मीडियावर भूमिका स्पष्ट


नवी दिल्ली : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी संबंधित कागदपत्रे ‘पंतप्रधान संग्रहालय व ग्रंथालया’तून गहाळ झालेली नसून, ती सोनिया गांधी यांच्याकडे आहेत, असा खुलासा केंद्र सरकारने केला. काँग्रेसने या मुद्द्यावरून सरकारकडे माफीची मागणी केल्यानंतर, सांस्कृतिक मंत्रालयाने सोशल मीडियाद्वारे भूमिका स्पष्ट केली.


सांस्कृतिक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, २९ एप्रिल २००८ रोजी सोनिया गांधींचे प्रतिनिधी एम. व्ही. राजन यांनी एक पत्र पाठवून नेहरूंची सर्व खासगी पत्रे आणि नोंदी परत देण्याची विनंती केली होती. या विनंतीनंतर, २००८ मध्ये नेहरूंच्या खासगी कागदपत्रांचे ५१ कार्टन्स सोनिया गांधी यांच्या स्वाधीन करण्यात आली होती.


मंत्रालयाने स्पष्ट केले की, हे कागदपत्रे परत मिळवण्यासाठी सोनिया गांधी यांच्या कार्यालयाशी पत्रव्यवहार सुरू आहे. २८ जानेवारी २०२५ आणि ३ जुलै २०२५ रोजी पाठवलेल्या पत्रांचाही समावेश आहे. ‘नेहरूंची ही कागदपत्रे कुठे आहेत हे सरकारला ठाऊक आहे, त्यामुळे ती 'गहाळ' झाली आहेत असे म्हणणे चुकीचे आहे,’ असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.


केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी 'एक्स'वर पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘नेहरूंची कागदपत्रे हा देशाचा ऐतिहासिक वारसा आहे. ती कोणाचीही वैयक्तिक मालमत्ता असू शकत नाही. ही कागदपत्रे सार्वजनिक संग्रहालयात असणे संशोधकांसाठी आवश्यक आहे. सोनिया गांधी नक्की काय लपवू पाहत आहेत? ही कागदपत्रे परत न करण्यासाठी दिलेली कारणे पटण्यासारखी नाहीत.’

Comments
Add Comment

सोन्याच्या दरात घसरण; भाव १ लाखांच्या खाली येणार? तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज

गेल्या काही आठवड्यांपासून सोन्याच्या (Gold Rate) दरांमध्ये मोठी चढ-उतार पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी विक्रमी

New MIDC : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गालगत नवी एमआयडीसी; मावळ तालुक्यात १,१०० एकरांवर औद्योगिक प्रकल्प

सरकारी नोकरी हवीय? मग 'ही' रेल्वे भरतीची संधी चुकवू नका

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने (Indian Railway) टेक्निशियन पदांसाठी मोठी

Government Employees: सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता ‘स्वग्राम’ बदलण्यासाठी मिळणार अतिरिक्त संधी

 महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. सामान्य प्रशासन

Borivali Bribery Case: दंड कमी करण्यासाठी ५ हजारांची लाच मागितली; आरटीओ कर्मचाऱ्याला ACB ने रंगेहात पकडलं

मुंबईतील बोरिवली (Boriwali) प्रादेशिक परिवहन कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने

Bharat Taxi Service : महाराष्ट्रात लवकरच अॅप आधारित सहकारी टॅक्सी सेवा, 'या' शहरात सुरु होणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी आणि टॅक्सी चालकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यात लवकरच अॅप आधारित