ठेकेदाराला हलगर्जीपणा नडला, रंगकाम करताना कोसळून मजूराचा जागीच मृत्यू

पुणे: पुण्यात कामाच्या ठिकाणी मजुरांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करणे एका कंत्राटदाराला चांगलेच महागात पडले आहे. सहकारनगर परिसरातील एका बंगल्यात रंगकाम करत असताना उंचावरून तोल जाऊन पडल्याने एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झालाची धक्कादायक घटना घडली आहे. तर दुसरा मजूर गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी मजुरांच्या सुरक्षेची पुरेशी काळजी न घेतल्याचा ठपका ठेवत सहकारनगर पोलिसांनी संबंधित ठेकेदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर थेट मृत्यू झाल्यामुळे या प्रकरणावरून मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.



नेमकी घटना काय?


पुण्याच्या सहकारनगर येथील गणेशदत्त सोसायटीमधील एका बंगल्यात सध्या नूतनीकरणाचे आणि रंगकामाचे काम सुरू आहे. यासाठी दीपक गुप्ता आणि दीनानाथ मेणक चौधरी या मजुरांना ठेकेदारांनी कामासाठी नेमले होते. दरम्यान रंगकाम करताना दोन्ही मजूरांचा तोल गेला आणि ते उंचावरून खाली कोसळले. या दुर्घटनेत दीपक गुप्ता यांचा जागीच मृत्यू झाला, तर दीनानाथ चौधरी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


या प्रकरणी मुन्ना जोखुप्रसाद गुप्ता यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी कंत्राटदार अफसर शेख आणि क्रांतीलाल यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मजुरांना उंचावर काम करताना आवश्यक असणारे सेफ्टी बेल्ट, हेल्मेट किंवा सुरक्षित मचान पुरवण्यात आले नव्हते. मजुरांच्या जीविताला धोका निर्माण होईल अशी परिस्थिती असतानाही त्यांना काम करायला लावल्याने हा अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.




कामाच्या ठिकाणी मजुरांच्या सुरक्षिततेची जबाबदारी पूर्णतः ठेकेदाराची असते. या घटनेत नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाल्यामुळे पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. खाजगी बंगले किंवा इमारतींच्या कामात अनेकदा मजुरांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जाते, ज्यामुळे अशा जीवघेण्या घटना घडतात. या घटनेमुळे कामगार वर्गात संताप व्यक्त होत असून, कंत्राटदारांनी कामाच्या ठिकाणी सुरक्षा ऑडिट करणे किती गरजेचे आहे, हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Comments
Add Comment

जळगावात मयत ग्राहकाच्या पत्नीला पैशाचं आमिष दाखवून...

जळगाव: जळगावमध्ये एका मयत ग्राहकाच्या पत्नीला पैशाचं आमिष देऊन अपघाताचं प्रकरण बनवलं आणि विम्याचे ५० लाख

सरकारने १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटांसंदर्भातील दिली मोठी बातमी, काय सांगितलं?

नवी दिल्ली: देशातील चलनात १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटांचा तुटवडा आहे का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. रोखीचे

जेएनपीए बंदरात कंटेनर अडकलेल्या फळे व भाजीपाला निर्यातदारांना मोठा दिलासा; पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील फळे व भाजीपाला उत्पादक शेतकरी व निर्यातदार यांचे हित लक्षात घेता केंद्र सरकारच्या

लोकनेते बाळासाहेब देसाई यांना ११६व्या जयंतीनिमित्त अभिवादन; मुख्यमंत्र्यांसह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती

मुंबई: लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांच्या ११६व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम मुंबई येथील मेघदूत

राज्यातील शाळांमध्ये ‘केंब्रिज क्लायमेट क्वेस्ट’द्वारे हवामान शिक्षण मिळणार

मुंबई : पर्यावरणाबाबत विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासून जागरूकता निर्माण करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने

धक्कादायक! १२ वर्षाच्या विद्यार्थ्याने रचला स्वतःच्याच अपहरणाचा बनाव, कारण ऐकून थक्क व्हाल...

सिनेमातले कथानकालाही लाजवेल असा एक प्रकार पवनी तालुक्यात समोर आला आहे. एका नामांकित शाळेतील १२ वर्षीय