मेट्रो- ९, मेट्रो- २ बीचे निवडक टप्पे ३१ डिसेंबरपर्यंत सुरू होणार

मुंबई : मेट्रो लाईन ९ आणि मेट्रो लाइन २ बी या दोन नव्या मेट्रो मार्गांचे निवडक टप्पे ३१ डिसेंबरपर्यंत प्रवाशांसाठी खुले होणार आहेत. यामुळे मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी दोन्ही मार्गांच्या आंशिक उद्घाटनासाठीची तयारी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती दिली आहे.


दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो-९ ही विद्यमान मेट्रो लाइन ७ ची विस्तारित लाईन आहे. अंधेरी (पूर्व) ते दहिसर (पूर्व) मेट्रो-७ मार्गकेची एकूण लांबी १३.५८ किमी आहे. दहिसर पूर्व आणि वेगाने विकसित होत असलेल्या मीरा-भाईंदर परिसरातील दळणवळण अधिक मजबूत करण्यासाठी हा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे. पहिल्या टप्प्यात दहिसर पूर्व ते काशीगावदरम्यान मेट्रो सेवा सुरू होणार असून त्यामुळे उत्तर उपनगरांतील प्रवासाचा वेळ कमी होण्यासह वाहतूककोंडीवरही मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे. लाइन ९ वरील नव्याने उभारण्यात आलेल्या स्थानकांवर मेट्रो गाड्या उभ्या असल्याचे दृश्य समोर आल्याने या मार्गाची तयारी जवळपास पूर्ण झाल्याचे स्पष्ट होते. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार स्थानके, ट्रॅक आणि रोलिंग स्टॉक मोठ्या प्रमाणावर तयार असून अंतिम सुरक्षा तपासणी व एकत्रीकरणाशी संबंधित परवानग्यांची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, मुंबईभर मेट्रोचे जाळे विणले गेले असून काही सेवा सुरू झाल्या असून लाखो मुंबईकर मेट्रो सेवेचा लाभ घेत आहेत. यामुळे उपनगरीय रेल्वेवरील प्रवाशांचा ताण कमी झाला आहे.


मेट्रो लाइन ९, मेट्रो लाइन २ बी हे नवे मेट्रो मार्ग सुरू झाल्यानंतर मुंबईतील सर्वाधिक गजबजलेल्या रस्त्यांना पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहेत. सध्या मोठ्या प्रमाणावर रस्ते वाहतुकीवर अवलंबून असलेल्या हजारो प्रवाशांचा दैनंदिन प्रवास सुलभ होण्याची अपेक्षा आहे. मेट्रो लाईन ९ ही मेट्रो लाइन ७ शी अखंडपणे जोडली जाणार असून त्यामुळे अंधेरी (पूर्व) ते मीरा-भाईंदरदरम्यान अधिक सुलभ आणि वेगवान संपर्क उपलब्ध होईल. यामुळे आधीच ताणाखाली असलेल्या उपनगरी रेल्वे सेवांवरील तसेच मुख्य रस्त्यांवरील गर्दी कमी होण्यास मदत होईल, असा प्रशासनाचा विश्वास आहे. मेट्रो लाईन २ बीच्या काही टप्प्यांचेही समांतरपणे उद्घाटन होणे हे मुंबई मेट्रो जाळ्याच्या सातत्यपूर्ण विस्ताराचे द्योतक आहे.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : न्यायाधीशांच्या कमतरतेमुळे १३८ पैकी केवळ ५८ जलदगती न्यायालये सुरू

- मुख्य न्यायाधीशांच्या बैठकीत पाठपुरावा करण्याची ग्वाही; - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई : "राज्यातील महिला

Horrific accident in Navi Mumbai : तळोजा येथे भरधाव कारने १० जणांना उडवले; २ जणांचा मृत्यू, ८ गंभीर

नवी मुंबई: नवी मुंबईतील तळोजा परिसरात आज मंगळवारी, ७ जुलै २०२६ रोजी एक अत्यंत धक्कादायक आणि भीषण अपघाताची घटना

2,000-Year-Old Indian Gold Rings : थायलंडमध्ये २००० वर्षे जुन्या भारतीय सोन्याच्या अंगठ्या सापडल्या; प्राचीन व्यापारी संबंधांचे पुरावे

बँकॉक: पश्चिम थायलंडमधील पेचबुरी प्रांतातील 'डॉन याई थोंग' (Don Yai Thong) या पुरातत्व स्थळावर सुरू असलेल्या उत्खननात

Ahilyanagar : भंडारदऱ्यात निसर्गाचा हाहाकार ! 24 तासांत 300 मिमी पाऊस; प्रमुख पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी बंद

Ahilyanagar Rain : महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यात पावसाचा तांडव पहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी नद्या, धरणे दुथडी भरून

Madhuri Misal : ग्लोबल हॉस्पिटलचा अतिरिक्त FSI परत घेण्याबाबत कायदेशीर चाचपणी; विधान परिषदेत राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे उत्तर!

- २० वर्षे गरीब रुग्णांना खाटा न दिल्याचा मुद्दा गाजला; २१ जुलैच्या कोर्टाच्या सुनावणीनंतर शासन कडक पावले

नाशिक प्रशासन अलर्ट! जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा इगतपुरी दौरा; धरणे, पूल आणि धबधब्यांची पाहणी

नाशिक : भारतीय हवामान विभागाने नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा, दिंडोरी आणि नाशिक ग्रामीण