भयानक हत्याकांड; जौनपूरमध्ये मुलानेच आई-वडिलांची निर्घृण हत्या करून मृतदेहाचे तुकडे नदीत फेकले

जौनपूर : उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक हत्याकांड समोर आले आहे. जाफराबाद पोलीस स्टेशन हद्दीतील अहमदपूर गावात अंबेश कुमार या तरुणाने आपली आई बबिता (६०) आणि वडील श्यामलाल (६२) यांची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हत्येनंतर आरोपीने दोघांच्या मृतदेहांचे तुकडे करून ते वेगवेगळ्या ठिकाणी नदीत फेकल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.


पोलिसांच्या चौकशीत अंबेश कुमारने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याने प्रथम आईची हत्या केल्यानंतर वडिलांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यानंतर दोघांच्या मृतदेहांचे तुकडे करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून संपूर्ण राज्यात संताप व्यक्त केला जात आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे वडील श्यामलाल हे रेल्वेचे निवृत्त लोको पायलट होते. ८ डिसेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास अंबेश आणि त्याच्या वडिलांमध्ये पैशाच्या कारणावरून जोरदार वाद झाला होता. या वादातूनच अंबेशने टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.


हत्येनंतर आरोपीने मृतदेहांचे तुकडे सहा पोत्यांमध्ये भरून ते आपल्या गाडीच्या डिक्कीत ठेवले. घरातील रक्ताचे डाग साफ करून आणि कपडे धुऊन त्याने पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पहाटे चार ते पाचच्या दरम्यान तो गाडीतून निघून गेला. वडिलांच्या मृतदेहाचे तुकडे गोमती नदीच्या बेलाव घाटावर फेकण्यात आले, तर आईच्या मृतदेहाचे तुकडे जलालापूर परिसरातील साई नदीत टाकण्यात आले. नदीत मृतदेहाचे अवयव आढळल्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली.


पोलिस तपासात कौटुंबिक वादाचा आणखी एक धागा समोर आला आहे. लॉकडाऊन काळात अंबेश कुमारने कोलकातामधील सहजिया नावाच्या महिलेशी विवाह केला होता. ती कोलकातामध्ये ब्युटी पार्लर चालवते. मात्र कुटुंबीय या विवाहास विरोध करत होते आणि अंबेशवर घटस्फोट घेण्यासाठी दबाव टाकत होते. घटस्फोटासाठी पैशांच्या मागणीवरून घरात सतत वाद होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेने जौनपूरसह संपूर्ण उत्तर प्रदेशात खळबळ उडवून दिली आहे.

Comments
Add Comment

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात फटकेबाजी करत इंग्लंडने मारली बाजी

कोलंबो : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ च्या सुपर एट फेरीतीली इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड हा सामना

IPL 2026 : आयपीएल कधी सुरू होणार ? हाती आली महत्त्वाची माहिती

मुंबई : मिनी ऑक्शन झाला त्यावेळी आयपीएल २०२६ ही स्पर्धा २६ मार्च २०२६ पासून सुरू होईल असे सूतोवाच बीसीसीआयने केले

रविवार १ मार्चला मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक; रेल्वेसेवा बघूनच घराबाहेर पडा

मुंबई : दररोज मुंबईच्या उपनगरीय रेल्वेतून लाखो प्रवासी प्रवास करतात. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि

मुंबईतील महापालिका प्रकल्प कामांना मिळणार गती, पुढील महिन्यात ताब्यात येणार १५०० प्रकल्पबाधितांसाठीच्या सदनिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : प्रकल्पबाधित नागरिकांच्या पुनर्वसनासाठी मुंबईतील महापालिकेच्या प्रत्येक प्रशासकीय

मुंबईत कबड्डी स्पर्धांसाठी मैदाने होणार अल्प दरात उपलब्ध

महापालिका सभागृहात ठराव मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कबड्डी हा भारतीय सांघिक खेळ असून कबड्डीची पंढरी म्हणून

मनरेगा मजुरांची होळी होणार आनंदात साजरी

केंद्राकडून १,१३८ कोटींची थकीत मजुरी मंजूर केंद्र सरकारकडून तब्बल ११३८ कोटी रुपयांची थकीत मजुरी राज्याला