FSSAI संस्थेचे राज्यांना अन्न भेसळीविरोधी युद्धपातळीवर निर्देश,धाडसत्र सुरु होणार!

मुंबई: मोठ्या प्रमाणात अन्नातील घातक पदार्थाची भेसळ सुरू असताना सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. भारताच्या अन्न विभागाची सर्वोच्च अधिकार असलेली संस्था फूड सेफ्टी अथोरिटी ऑफ इंडिया (FSSAI) संस्थेने प्रत्येक राज्य व केंद्रशासित प्रदेशांतील सरकारांना संपूर्ण राज्यभरात धडक कारवाईचे आदेश दिले आहेत. संबंधित सरकारी विभाग व पथकांना 'स्पेशल ड्राईव्ह' या मोहिमेअंतर्गत अशा संशयी व अस्वच्छ विघातक अथवा भेसळयुक्त पदार्थ विक्रेते, भेसळ दूध विक्री करणाऱ्यावर छापा टाकण्याचे निर्देश (Directives) दिले असून मोठ्या प्रमाणात सरकारकडून हे 'क्रॅकडाऊन' असणार आहे. प्रसारमाध्यमांना सुत्रांनी संबंधित माहिती दिली असून लवकरच या ऑपरेशनला सुरुवात होणार आहे.


इतकेच तर संस्थेने फूड सेफ्टी कंप्लायन्स सिस्टिम (FOSCOS) या प्रणाली अंतर्गत वेळोवेळी बदल लागू करुन त्यांचे रिपोर्टिंग संस्थेला करण्याचे निर्देश दिले. या प्रणालीअंतर्गत वेळोवेळी भेसळ संबंधित बाजारातील परिस्थितीवर लक्ष ठेवले जाऊन रियल टाईम बेसिसवर त्याचा अहवाल विभागाकडे सादर केला जाईल. यासह विविध राज्यराज्यातील अन्न सुरक्षा व पुरवठा याविषयी सहकार्य वाढवण्यासाठी काही मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत. २००६ साली झालेल्या अन्न सुरक्षा व मानक कायदा (Food and Safety Standards Act 2006) अंतर्गत ग्राहकांच्या हिताचे रक्षणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी सरकार विशेष प्रयत्न करणार आहे. खासकरून यातील उपायोजना त्वरीत लागू करत प्रभावी अंमलबजावणी या कायद्याची केली जाणार आहे अशी प्राथमिक माहिती पुढे आली आहे.


अलीकडेच सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांतील सणासुदीच्या काळात दुग्धजन्य पदार्थांच्या खपात वाढ होत असल्याने भेसळ रोखण्यासाठी आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी संस्था (FSSAI)ने विशेष पाळत आणि अंमलबजावणी मोहीम जाहीर केली होती. संस्थेने अधिकाऱ्यांना आता संवेदनशील ठिकाणांवर आणि महत्त्वाच्या जागांवर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश दिले आहेत. यापूर्वीही'फूड सेफ्टी ऑन व्हील्स' (FSWs) या फिरत्या अन्न-चाचणी प्रयोगशाळा प्रमुख बाजारपेठांमध्ये तैनात करण्यात आल्या होत्या.

Comments
Add Comment

Jayant Patil : अजित दादांची 'ती' इच्छा अधुरीच...राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत जयंत पाटलांचा मोठा खुलासा!

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी पोकळी

'राष्ट्रवादीकडे असलेलं सर्वात मोठं पद सुनेत्रा पवारांनी स्वीकारावं'

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे सध्या जे आहे त्यात राज्याचे उपमुख्यमंत्रिपद हे सर्वात मोठे पद आहे.

Mumbai Local Accident : शीव स्थानकाजवळ लोकलमधून ३ प्रवाशांचा तोल गेला अन् थेट रुळांवर फेकले गेले; २ जण गंभीर जखमी तर एक...

मुंबई : मुंबईच्या लोकल प्रवासातील जीवघेणी गर्दी पुन्हा एकदा प्रवाशांच्या मुळावर उठली आहे. शुक्रवारी सकाळी ऐन

Border 2 Box Office Collection Day 8 : सनी देओलचा जलवा कायम; ८ दिवसांत तब्बल 'इतक्या' कोटींचा टप्पा पार

मुंबई : सनी देओलच्या बहुप्रतिक्षित 'बॉर्डर २' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली पकड मजबूत ठेवली आहे. प्रजासत्ताक

Sharad Pawar : अजितदादांची 'ती' शेवटची इच्छा पूर्ण करणार; विलीनीकरणाचा निर्णय अंतिम टप्प्यात होता, पण...शरद पवार स्पष्टचं बोलले!

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर अवघ्या ७२ तासांत महाराष्ट्राच्या राजकारणाने एक

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री…! कोण आहेत सुनेत्रा पवार?

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर