फडणवीसांच्या भाषणाआधी भाजप उमेदवाराच्या ऑफिसवर गोळीबार

अंबरनाथ : ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमधील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पवन वाळेकर पॅनल क्रमांक चार यांच्या कार्यालयावर गोळीबार झाला. ही मंगळवार आणि बुधवार दरम्यान मध्यरात्री घडली. या प्रकरणी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फूटेज जप्त केले आहे. पोलीस तपास सुरू आहे.


अंबरनाथ पश्चिम भागातील शंकर मंदिर परिसरात पवन वाळेकर यांचं कार्यालय आहे. या कार्यालयावर गोळीबार झाला. गोळीबार करुन भाजपच्या उमेदवाराला आणि त्याच्या समर्थकांना घाबरवण्याचा हेतू असावा अशी शक्यता व्यक्त होत आहे.


दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञातांनी कार्यालयाच्या समोर उभे राहून तीन - चार फैरी झाडल्या. आवाज ऐकून कार्यालयातले सुरक्षा रक्षक बाहेर आले त्यावेळी सुरक्षा रक्षकांच्या दिशेने गोळीबार करत आलेले दोघे पळून गेले. गोळीबारात कोणीही जखमी झालेले नाही. जीवितहानी झालेली नाही. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने तपास सुरू केला आहे. स्थानिकांनी गोळीबार करणाऱ्यांच्या अटकेची मागणी केली आहे.


फडणवीसांच्या भाषणाआधी गोळीबार


राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी संध्याकाळी अंबरनाथमध्ये एक सभा घेतील असे आधीच जाहीर झाले होते. ही सभा होण्याच्या आधी मध्यरात्री अंबरनाथमधील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या कार्यालयावर गोळीबार झाल्यामुळे या घटनेमागील राजकीय संदर्भ पोलीस तपासत आहेत.

Comments
Add Comment

आदिवासी तरुणीची ३ लाखांत खरेदी-विक्री

श्रमजीवी संघटनेने उघडकीस आणला प्रकार, वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल वाडा  : तालुक्यातील गारगांव येथील एका वीस

बदलापूर MIDC : पॅसिफिक केमिकल फॅक्टरीत स्फोटांनंतर अग्नितांडव

बदलापूर : बदलापूर पूर्व महावितरण कार्यालयाजवळ पॅसिफिक ऑरगॅनिक केमिकल कंपनीत एका पाठोपाठ एक असे पाच ते सहा स्फोट

तासगावच्या पोलीस उपनिरीक्षकाची पुण्यात आत्महत्या

पुणे : डेक्कन परिसरातील आपटे रस्त्यावरील हॉटेलमध्ये तासगावच्या पोलीस उपनिरीक्षकाने आत्महत्या केली. सूरज मराठे

माणगावमध्ये बस आणि स्कूटीचा अपघात, आठ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

माणगाव : दिघी - पुणे महामार्गावरील मोर्बा रोडवर ट्रॅव्हलर बस आणि स्कूटी

'ऑस्ट्रेलियाच्या बाँडी बीचवर दिसलेलं दृष्य भविष्यात गिरगाव बीचवरही दिसू शकेल'

मुंबई : काही पक्ष राजकीय स्वार्थासाठी मुंबईची डेमोग्राफी बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. हे प्रकार असेच सुरू राहिले

महिलांसाठी मुंबई देशातील टॉप ५ शहरांमध्ये; बेंगळुरू पुन्हा एकदा अव्वल!

मुंबई  : भारतातील महिलांसाठी राहण्यायोग्य आणि करिअरसाठी पोषक शहरांच्या यादीत मुंबईने आपले स्थान अधिक भक्कम