अंबरनाथ, बदलापूरच्या विकासाला चालना देणार, पुढच्या चार महिन्यात मेट्रो १४ चे काम सुरू होणार


अंबरनाथ : मुंबई महानगर क्षेत्रात दोन लाख कोटींची कामे सुरू आहेत. मेट्रोच्या नेटवर्कच्या माध्यमातून अंबरनाथ, बदलापूर ही शहरे जोडली जाणार आहेत. कांजुरमार्ग ते बदलापूर या मेट्रो १४ चे काम येत्या चार महिन्यात सुरू होणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत बोलत होते. मेट्रो ५, १२, १४ चा फायदा अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये राहणाऱ्यांना होणार आहे; असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


मुंबई महानगर क्षेत्राचा विकास करायचा आहे. अंबरनाथ शहरासाठीही माझे स्वप्न आहे. या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी आमच्या उमेदवाराला विजयी करा, असे आवाहन फडणवीस यांनी यावेळी केले.


राज्यात २ डिसेंबर रोजी नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी पहिल्या टप्प्याचे मतदान झाले आहे. आता २० डिसेंबर रोजी नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी दुसऱ्या टप्प्याचे मतदान आहे. मतमोजणी २१ डिसेंबर रोजी होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने आधी एकाच टप्प्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी निवडणूक घेण्याचे जाहीर केले होते पण २ डिसेंबरच्या मतदानाला दोन दिवस उरले असताना निवडणूक दोन टप्प्यात घेण्याची घोषणा करण्यात आली. वेळापत्रकात दुरुस्ती करण्यात आली. यामुळे अंबरनाथ नगर परिषदेची निवडणूक पुढे ढकलली गेली. ही निवडणूक पुढे गेली म्हणूनच अंबरनाथला येता आले असे मुख्यमंत्री म्हणाले.


अंबरनाथ हे मुंबईचे प्रवेशद्वार आहे. भाजपचा विकासाचा अजेंडा सांगण्यासाठी इथे आलो आहे, मी कुणावरही टीका करण्यासाठी आलेलो नाही, असे सांगत फडणवीस यांनी भाषणाच्या सुरूवातीलाच आपण शिवसेनेवर टीका करणार नाही हे स्पष्ट केले. यावेळी बोलताना रेल्वे, मेट्रो प्रकल्पांची माहिती देत त्याचा अंबरनाथ, बदलापूरला फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कल्याण बदलापूर तिसरी चौथी मार्गिका झाल्यास दर दहा मिनिटाला लोकल मिळेल, असेही फडणवीस म्हणाले. सर्व साध्या लोकल वातानुकूलीत करण्यासाठी २३८ रॅक्सची मागणी करत आहोत. लवकरच सर्व लोकल कोणत्याही भाडेवाढीविना वातानुकूलीत होतील, असेही फडणवीस म्हणाले.


अंबरनाथमध्ये भाजपने नगराध्यक्ष पदाचा युवा आणि सुशिक्षित उमेदवार दिला आहे. त्या सनदी लेखापाल आहेत. त्या सर्व हिशोब ठेवतील आणि सर्वांचा हिशोब करतीलही, असे फडणवीस यावेळी म्हणाले. भाजप उमेदवारांची स्वप्ने ही माझे स्वप्ने असून ही स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्यांना निवडून द्या असे आवाहन त्यांनी यावेळी केले.


फक्त नगराध्यक्ष नाही तर नगरसेवकही निवडून द्यायला हवेत, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, वनमंत्री गणेश नाईक, आमदार किसन कथोरे, कुमार आयलानी, सुलभा गायकवाड, चित्रा वाघ, माजी मंत्री कपिल पाटील यांच्यासह भाजपचे उमेदवार आणि पदाधिकारी उपस्थित होते.


Comments
Add Comment

Best Budget Bike : दिखाऊपणा कशाला? ७० किमी मायलेज आणि ५५ हजारांपासून किंमत; बजेटमधील ५ सर्वोत्तम बाईक!

सध्याच्या काळात महागाई आणि सतत वाढणारे इंधनाचे दर यामुळे सर्वसामान्य मध्यमवर्गीय नागरि

BMC News : वरळी, प्रभादेवी आणि लोअर परळ मधील नागरिकांना ३ ते ४ दिवस कचऱ्याची राहणार समस्या

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी दक्षिण’ प्रशासकीय विभागात कचरा संकलन आणि वाहतुकीसाठी

Panchkula Murder Case : पंचकुलात खळबळ! मोलकरणीनेच केली रिटायर्ड कॅप्टनच्या पत्नीची हत्या; सीसीटीव्हीमुळे बिंग फुटले

Haryana : हरियाणामधील पंचकुला येथे घडलेल्या एका थरारक आणि खळबळजनक हत्याप्रकरणाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

Eknath Shinde : 'शिवसेना कोणाची?' जनतेनेच दिला कौल; ४० चे ६० आमदार करून जनतेने शिक्कामोर्तब केलं

मुंबई : शिवसेना पक्षाच्या मालकीबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)

Sarsanghchalak Dr. Mohan Bhagwat : 'जेन-झी' आणि 'जेन-अल्फा' जुन्या पिढीपेक्षा अधिक प्रामाणिक!

- सरसंघचालक डॉ. मोहन भागवत; लोकशाहीत आंदोलनसुद्धा संवादाचेच एक माध्यम मुंबई : "भारताच्या शिक्षणव्यवस्थेत अजूनही

Air India New CEO : टाटांचा मास्टरस्ट्रोक! पाकिस्तानकडे जाणारे टेवोल्डे गेब्रेमरियम आता एअर इंडियाचे नवे बॉस

मुंबई : टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाला अखेर नवे नेतृत्व मिळाले आहे. इथियोपियन एअरलाइन्स ग्रुपचे माजी