अंबरनाथ, बदलापूरच्या विकासाला चालना देणार, पुढच्या चार महिन्यात मेट्रो १४ चे काम सुरू होणार


अंबरनाथ : मुंबई महानगर क्षेत्रात दोन लाख कोटींची कामे सुरू आहेत. मेट्रोच्या नेटवर्कच्या माध्यमातून अंबरनाथ, बदलापूर ही शहरे जोडली जाणार आहेत. कांजुरमार्ग ते बदलापूर या मेट्रो १४ चे काम येत्या चार महिन्यात सुरू होणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत बोलत होते. मेट्रो ५, १२, १४ चा फायदा अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये राहणाऱ्यांना होणार आहे; असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


मुंबई महानगर क्षेत्राचा विकास करायचा आहे. अंबरनाथ शहरासाठीही माझे स्वप्न आहे. या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी आमच्या उमेदवाराला विजयी करा, असे आवाहन फडणवीस यांनी यावेळी केले.


राज्यात २ डिसेंबर रोजी नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी पहिल्या टप्प्याचे मतदान झाले आहे. आता २० डिसेंबर रोजी नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी दुसऱ्या टप्प्याचे मतदान आहे. मतमोजणी २१ डिसेंबर रोजी होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने आधी एकाच टप्प्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी निवडणूक घेण्याचे जाहीर केले होते पण २ डिसेंबरच्या मतदानाला दोन दिवस उरले असताना निवडणूक दोन टप्प्यात घेण्याची घोषणा करण्यात आली. वेळापत्रकात दुरुस्ती करण्यात आली. यामुळे अंबरनाथ नगर परिषदेची निवडणूक पुढे ढकलली गेली. ही निवडणूक पुढे गेली म्हणूनच अंबरनाथला येता आले असे मुख्यमंत्री म्हणाले.


अंबरनाथ हे मुंबईचे प्रवेशद्वार आहे. भाजपचा विकासाचा अजेंडा सांगण्यासाठी इथे आलो आहे, मी कुणावरही टीका करण्यासाठी आलेलो नाही, असे सांगत फडणवीस यांनी भाषणाच्या सुरूवातीलाच आपण शिवसेनेवर टीका करणार नाही हे स्पष्ट केले. यावेळी बोलताना रेल्वे, मेट्रो प्रकल्पांची माहिती देत त्याचा अंबरनाथ, बदलापूरला फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कल्याण बदलापूर तिसरी चौथी मार्गिका झाल्यास दर दहा मिनिटाला लोकल मिळेल, असेही फडणवीस म्हणाले. सर्व साध्या लोकल वातानुकूलीत करण्यासाठी २३८ रॅक्सची मागणी करत आहोत. लवकरच सर्व लोकल कोणत्याही भाडेवाढीविना वातानुकूलीत होतील, असेही फडणवीस म्हणाले.


अंबरनाथमध्ये भाजपने नगराध्यक्ष पदाचा युवा आणि सुशिक्षित उमेदवार दिला आहे. त्या सनदी लेखापाल आहेत. त्या सर्व हिशोब ठेवतील आणि सर्वांचा हिशोब करतीलही, असे फडणवीस यावेळी म्हणाले. भाजप उमेदवारांची स्वप्ने ही माझे स्वप्ने असून ही स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्यांना निवडून द्या असे आवाहन त्यांनी यावेळी केले.


फक्त नगराध्यक्ष नाही तर नगरसेवकही निवडून द्यायला हवेत, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, वनमंत्री गणेश नाईक, आमदार किसन कथोरे, कुमार आयलानी, सुलभा गायकवाड, चित्रा वाघ, माजी मंत्री कपिल पाटील यांच्यासह भाजपचे उमेदवार आणि पदाधिकारी उपस्थित होते.


Comments
Add Comment

The Mithi River : मिठी नदीतील भराव संरक्षक भिंतीच्या बांधकामासाठीच

मुंबई : मिठी नदीत कंत्राटदाराकडून बांधकामाचा राडारोडा (डेब्रीज) टाकून आणि त्यात चिखल मिसळून भ्रष्टाचार केला जात

Old Building : जुन्या इमारती अतिधोकादायक दाखवण्यामागे सल्लागारांचा खेळ?

मुंबई  : मुंबईतील ३० वर्षांपेक्षा जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट (संरचनात्मक परीक्षण) करताना, अनेक सल्लागार

U18 Asia Cup : U18 आशिया कप हॉकी स्पर्धेत भारताचा दुहेरी विजय

पुरुषांची सुवर्ण तर महिलांची कांस्यवर मोहोर काकामिगाहारा : भारतीय युवा हॉकीसाठी शनिवारचा दिवस ऐतिहासिक ठरला.

Women's Under-18 Hockey : भारतीय महिला संघाची कांस्यपदकावर मोहोर

काकामिगाहारा : भारतीय महिला अंडर-१८ हॉकी संघाने महिला १८-वर्षांखालील आशिया कप २०२६ स्पर्धेत शानदार कामगिरी करत

Devendra Fadnavis : कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन म्हणजे अराजकतेचे प्रकटीकरण

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका; 'संविधानविरोधी कृत्यांनी त्यांचा खरा चेहरा उघड केला' मुंबई : "राजधानी

IND vs AFG : गिलचा मुल्लानपूरमध्ये विक्रमांचा पाऊस; धोनी-गांगुलीला मागे टाकत कर्णधार म्हणून 1000 धावा पूर्ण

मुंबई : अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार शुभमन गिलने शानदार शतक झळकावत अनेक विक्रम