ठाण्यात शुक्रवारपर्यंत पाणीकपात

कल्याण फाटा येथे नादुरुस्त झालेल्या जलवाहिनीचे काम सुरू


ठाणे  : कल्याण फाटा येथील महानगर गॅसच्या कामांमध्ये ठाणे शहराला पाणीपुरवठा करणारी पिसे बंधारा येथून टेमघर जलशुद्धीकरण केंद्राकडे पाणी वाहून आणणारी १००० मि.मी. व्यासाची जलवाहिनी चार ते पाच वेगवेगळ्या ठिकाणी दिनांक ११ डिसेंबर रोजी नादुरूस्त झाली होती, ही जलवाहिनी दुरूस्त करण्याचे काम सुरू आहे, परंतु या कामासाठी आणखी ४ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाण्यात शुक्रवारपर्यंत ५० टक्के पाणीकपात लागू करण्यात येत आहे.


पाणीपुरवठा विभागामार्फत जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम तातडीने व जलदगतीने करण्यात येत आहे. मात्र जलवाहिनी जुनी व प्रिस्ट्रेस काँक्रीट पद्धतीची असल्यामुळे दुरुस्तीच्या कामासाठी उशीर होत असून हे काम पूर्ण होण्यास अजून ४ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.


परिणामी, ठाण्यातील पाणीपुरवठा कमी झाला असून शहरांमध्ये ५० टक्के पाणी कपात लागू करण्यात येत आहे. शहरामध्ये पाणी वितरणाचा समतोल ठेवण्यासाठी शुक्रवारपर्यंत प्रत्येक भागात दिवसातून १२ तास झोनिंग पद्धतीने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांना कमी प्रमाणात व अनियमित पाणीपुरवठा होणार आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा व महापालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आले.

Comments
Add Comment

ठाण्यातील भव्य त्रिमंदिर भाविकांसाठी खुले; तीन दिवसांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर दर्शनास सुरुवात

ठाणे : ठाणे शहरात उभारण्यात आलेले भव्य त्रिमंदिर अखेर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. तीन दिवस चाललेल्या

Rashmika Mandanna Latest News: रश्मीका मदांना व विजय देवरकोंडाच फेब्रुवारीमध्ये लग्न सोहळा; रश्मीकाची धक्कादायक प्रतिक्रिया...

गोल्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिक मदाना व अभिनेता विजय देवरकोंडा या दोघांच्या लग्नाबद्दल

पाणीपट्टी वाढीवर शिक्कामोर्तब

मुंबई  : मुंबई महानगरपालिका निवडणूक पार पडल्यानंतर गेल्या काही वर्षांपासून रखडलेला पाणीपट्टी वाढीचा निर्णय आता

अखेर भाजपचा गटनेता ठरला, गणेश खणकर यांची नियुक्ती

मुंबई: मुंबई महापालिकेत भाजपाच्या गटनेते पदी गणेश खणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खणकर हे प्रभाग ३ मधून

फडणवीसांनी अडचणीच्या काळात मोहिते पाटलांना छत दिलं, ताकद दिली अन् तेच..., जयकुमार गोरेंची मोहिते पाटलांवर जोरदार टीका

सोलापूर: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय वातावरण

गृह खरेदीदारांच्या अपेक्षाभंगामुळे रिअल इस्टेटवर परिणाम

मुंबई : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्प २०२६ मध्ये रिअल इस्टेट क्षेत्रासाठी