धक्कादायक! कर्ज फिटवण्यासाठी केला मृत्यूचा बनाव; एक मेसेज आणि सत्याचा उलगडा

लातूर: फायनान्स कंपनीत काम करणाऱ्या गणेश चव्हाण नावाच्या तरुणाने आपल्याच मृत्यूचा बनाव केल्याची धक्कादायक घटना लातूरमधून समोर आली आहे. त्याने तब्बल १२ तास कारमध्ये जळून मृत्यू झाल्याचे नाटक केले. त्याच्या या नाटकाला पोलीस सुद्धा भुलले. पण, जेव्हा तपास सुरू झाला तेव्हा एक मेसेज आणि एका तरुणीचे कनेक्शन समोर आल्याने गणेशचा सर्व डाव उलटला आणि तो पोलिसांच्या गळाला लागला.


मिळालेल्या माहितीनुसार, औसा पोलीस स्टेशनच्या हद्दीत शनिवार, १३ डिसेंबर रात्री उशिराने वानवडा भागात एक कारला आग लागली. ज्यात लातूरमधील औसा तालुक्यात वानवडा इथे एका कारमध्ये ५० वर्षीय इसमाचा जळून मृत्यू झाला. पोलीस घटनास्थळी पोहोचताच आग आटोक्यात आणण्याचे काम अग्निशमन दलाकडून करण्यात आले. आग नियंत्रणात येताच पोलिसांनी गाडीची तपासणी केली, ज्यात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. गणेश चव्हाण असे या तरुणाचे नाव सांगितले जात होते. पण, पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला असता मृत व्यक्ती गणेश चव्हाण ही जिवंत असल्याचे समोर आले. तसेच गणेश चव्हाणनेच आपल्याच मृत्यूचा बनाव केल्याचे उघड झाले.


मृत्यूचा बनाव करणारे गणेश चव्हाण यांची चौकशी करताना पोलिसांना समजले की, दुपारी घरातून बाहेर गेलेले गणेश दिवसभरात परत आले नव्हते. तसेच त्यांचा मोबाईल सुद्धा बंद होता. त्यामुळे पोलीसांची अशी धारणा झाली की, कारमधील मृत व्यक्ती ही गणेश चव्हाण आहे. त्यामुळे औसा पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या अपघाती मृत्यूची नोंद केली. मात्र घटनेचा तपास सुरू असताना पोलिसांना गणेश चव्हाणवर संशय आल्याने त्यांनी गणेशची इतर माहिती गोळा करण्यास सुरुवात केली असता त्याची एक मैत्रीण सापडली. तिच्याक़डे चौकशी केली असता असं निष्पन्न झाले की, गणेश चव्हाणकडे तिसरा फोन होता. अपघाताची घटना घडून गेल्यानंतरही तिसऱ्या नंबरवरून या तरुणीशी संवाद साधला जात होता. मेसेज, चॅट सुरू होते. त्यामुळे पोलिसांचा गणेशचा तपास सुरू केला.



गणेशचा तपास करण्यासाठी लातूर पोलिसांनी त्याचा तिसरा फोन नंबर ट्रेस करण्यास सुरुवात केली. जो आधी कोल्हापूर, नंतर सिंधुदुर्ग आणि विजयदुर्गपर्यंतचे लोकेशन दाखवत होता. लोकेशनच्या आधारे पोलिसांनी गणेश चव्हाणला जिवंत पकडले. त्यामुळे कारमध्ये असलेला मृत व्यक्तीचा सांगाडा हा दुसऱ्याच व्यक्तीचा असल्याचे स्पष्ट झाले. गणेशची चौकशी केल्यावर समोर आले की, गणेशवर फ्लॅटचे कर्ज होते. ते कर्ज कमी करण्यासाठी गणेश चव्हाण याने १ कोटी रुपयांचा टर्म इन्शुरन्स काढण्याचा प्लॅन केला. या टर्म इन्शुरन्ससाठी त्याने मृत्यूचा कट रचला.


यासाठी त्याने तुळजापूर टी पॉईंट औसा इथून एका व्यक्तीला लिफ्ट दिली होती. गोविंद यादव असे या व्यक्तीचे नाव होते. गोविंद यादवला गणेशने कारच्या समोरील सिटीवर बसवले आणि कारला आग लागली तरी तो तिथून पळून जाणार नाही, असे नियोजन करून गोविंद यादव यांचा त्याने खून केला. एवढेच नाहीतर मृतदेह हा आपलाच आहे, असे भासावे म्हणून गणेशने आपल्या हातातले कडे गोविंद यादवच्या सीटवर ठेवले. जेणे करून पोलिसांना संशय येणार नाही. त्याच्या कुटुंबीयांनाही हे सत्य असल्याचे वाटले. पण, औसा पोलिसांच्या तपासात सत्य समोर आले आहे. औसा पोलीस स्टेशनमध्ये गोविंद यादव याचा खून केला या प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करत आरोपी गणेशला अटक केली आहे.

Comments
Add Comment

उन्हाळी सुट्टीत प्रवाशांना दिलासा: मुंबई, पुणे, सोलापूरसह अनेक मार्गांवर उन्हाळी धावणार स्पेशल ट्रेन

पुणे : उन्हाळ्याचे दिवस म्हणजेच सुट्टीचे दिवस, वर्षभर अभ्यास करून दमलेल्या मुलांच्या उन्हाळ्यात परीक्षा संपतात

आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी हरिष भांदिर्गे, बाजार - उद्यान समिती अध्यक्षपदी हेतल गाला

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समिती आणि बाजार व उद्यान समिती अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष

त्र्यंबक-नाशिक कुंभमेळ्यासाठी २२ हजार १८१ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

मुंबई: त्र्यंबक- नाशिक मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन २०२७ मध्ये करण्यात येत असून या कुंभमेळ्यात

मांजरानं पोपटाचा पिंजरा पाडला, दोन शेजाऱ्यांतला वाद हाणामारीपर्यंत गेला

पुणे : पुणे तिथे काय उणे असं म्हणतात , हे अगदी बरोबर कारण आता तिथे गुन्हेगारीच्याही काही कमतरता उरलेल्या नाही आहेत.

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक