नवी मुंबईकरांनो पाणी जपून वापरा ; डिसेंबरमध्ये आठवड्यातून दोन दिवस पाणीकपात

नवी मुंबई : नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.नवी मुंबईतील उरण परिसरात रानसाई धरणातून पाणीपुरवठा कमी झाल्यामुळे सध्या आठवड्यातून दोन दिवस पाणीकपात लागू करण्यात आली आहे,जी डिसेंबर २०२५ पर्यंत सुरू राहू शकते, जेणेकरून उन्हाळ्यात पाणीपुरवठा सुरळीत राखता येईल. मुंबईतही भांडुप जलशुद्धीकरण केंद्रातील जलवाहिनी दुरुस्तीमुळे काही भागांमध्ये पाणीकपात झाली होती, पण उरणमधील ही समस्या दीर्घकाळ चालणारी आहे.


उरणमधील रानसाई धरणाचा पाणी साठा सध्या चिंताजनक पातळीवर पोहोचला असून,तो स्थिर ठेवण्यासाठी ही कपात अपरिहार्य झाली आहे.या धरणाची क्षमता कमी असल्यामुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होते आणि आवश्यकतेनुसार साठवणूक करता येत नाही.त्याचाच परिणाम म्हणून दरवर्षी उरणमधील रहिवाशांना पाण्यासाठी हाल करावे लागतात.त्यामुळे उपलब्ध साठा जास्तीत जास्त काळ टिकवण्यासाठी आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.


कधी होणार पाणीकपात?


या पाणीकपातीचा अवलंब दर मंगळवारी आणि शुक्रवारी करण्यात येणार आहे.जून २०२५ पर्यंत पाणी उपलब्ध राहावे, यासाठी ही संवर्धनात्मक रणनीती आखण्यात आली असून, अधिकाऱ्यांनी पुरवठा नियंत्रित ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे.

Comments
Add Comment

Bhiwandi building collapsed : भिवंडी इमारत दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू, मृतांच्या वारसांना आणि जखमींना मदत जाहीर

भिवंडी : ठाणे (Thane) जिल्ह्यातील भिवंडीत (Bhiwandi) भंडारी कंपाऊंड परिसरातील गंगाराम वाडी येथे कोहिनूर (Kohinoor) इमारत कोसळली

Devendra Fadnavis : भिवंडी इमारत दुर्घटनेप्रकरणी कंत्राटदारावर फौजदारी कारवाईचे आदेश

अतिधोकादायक इमारतींमधून नागरिकांना बाहेर काढण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना मुंबई :

Bhiwandi Building Collapse : भिवंडीतील इमारत दुर्घटनेत मृतांचा आकडा ८ वर; दोन मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही, बचावकार्य सुरू

भिवंडी : भिवंडीतील भंडारी कंपाऊंड परिसरातील गंगाराम वाडी येथे चार मजली निवासी इमारतीचा मोठा भाग कोसळून झालेल्या

Bhiwandi Building Collapse : भिवंडीत मध्यरात्री भीषण दुर्घटना! ४ मजली इमारतीचा भाग कोसळला; एकाचा मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली

भिवंडी : भिवंडीतील भंडारी कंपाऊंड येथील गंगाराम वाडी परिसरात शुक्रवारी उशिरा रात्री मोठी दुर्घटना (Accident) घडली.

Eknath Shinde : ठाण्यातील आनंद आश्रमात मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्री, आमदार, पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट ठाणे :- तमाम शिवसैनिकांचे श्रद्धास्थान

Malshej Ghat : वीकेंडला माळशेजला जाताय ? थांबा! रस्ता खचल्याने घाट आणखी ३–४ दिवस राहणार बंद; प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

ठाणे : पावसाळ्यात धबधबे आणि हिरवाईचा आनंद घेण्यासाठी माळशेज घाटाकडे जाण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी