नवी मुंबईकरांनो पाणी जपून वापरा ; डिसेंबरमध्ये आठवड्यातून दोन दिवस पाणीकपात

नवी मुंबई : नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.नवी मुंबईतील उरण परिसरात रानसाई धरणातून पाणीपुरवठा कमी झाल्यामुळे सध्या आठवड्यातून दोन दिवस पाणीकपात लागू करण्यात आली आहे,जी डिसेंबर २०२५ पर्यंत सुरू राहू शकते, जेणेकरून उन्हाळ्यात पाणीपुरवठा सुरळीत राखता येईल. मुंबईतही भांडुप जलशुद्धीकरण केंद्रातील जलवाहिनी दुरुस्तीमुळे काही भागांमध्ये पाणीकपात झाली होती, पण उरणमधील ही समस्या दीर्घकाळ चालणारी आहे.


उरणमधील रानसाई धरणाचा पाणी साठा सध्या चिंताजनक पातळीवर पोहोचला असून,तो स्थिर ठेवण्यासाठी ही कपात अपरिहार्य झाली आहे.या धरणाची क्षमता कमी असल्यामुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होते आणि आवश्यकतेनुसार साठवणूक करता येत नाही.त्याचाच परिणाम म्हणून दरवर्षी उरणमधील रहिवाशांना पाण्यासाठी हाल करावे लागतात.त्यामुळे उपलब्ध साठा जास्तीत जास्त काळ टिकवण्यासाठी आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.


कधी होणार पाणीकपात?


या पाणीकपातीचा अवलंब दर मंगळवारी आणि शुक्रवारी करण्यात येणार आहे.जून २०२५ पर्यंत पाणी उपलब्ध राहावे, यासाठी ही संवर्धनात्मक रणनीती आखण्यात आली असून, अधिकाऱ्यांनी पुरवठा नियंत्रित ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे.

Comments
Add Comment

Thane Crime : क्लिनिंगसाठी आलेल्या महिलेने चोरले ३.५ लाखांचे मंगळसूत्र; ठाणे पोलिसांनी तासाभरात परत मिळवले

ठाणे पोलिसांची कामगिरी, अवघ्या एका तासात मिळवले चोरी झालेले दागिने  ठाणे  : ठाण्यातील (Thane) राबोडी पोलिसांनी जलद

Kalyan Dombivli Rain Update : कल्याण-डोंबिवलीत पावसाची दाणादाण : नाले ओव्हरफ्लो, घरांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांची मोठी तारांबळ

कल्याण : कल्याण-डोंबिवली आणि आसपासच्या परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात दाणादाण उडाली असून जनजीवन

Dombivli News : मुसळधार पावसात डोंबिवलीत नागरिक हैराण; पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत, चोरट्यांच्या टोळीची दहशत

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain)

Thane Crime : निर्दयीपणाचा कळस; साडेतीन वर्षांच्या मुलाला गरम उलथण्याने दिले चटके

Thane News : ठाणे-बोरिवली बोगदा प्रकल्पासाठी कासारवडवलीत वाहतूक बदल; ६ जुलै ते ५ ऑगस्टपर्यंत मार्ग बंद

ठाणे : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) महत्त्वाकांक्षी ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या

Dombivli News : कोट्यवधींच्या प्रकल्पामुळे ५० कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ; डोंबिवलीतील दोन इमारती धोक्यात

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील टिळक रोड परिसरात कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) आणि एका खासगी कंपनीच्या