नवी मुंबईकरांनो पाणी जपून वापरा ; डिसेंबरमध्ये आठवड्यातून दोन दिवस पाणीकपात

नवी मुंबई : नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.नवी मुंबईतील उरण परिसरात रानसाई धरणातून पाणीपुरवठा कमी झाल्यामुळे सध्या आठवड्यातून दोन दिवस पाणीकपात लागू करण्यात आली आहे,जी डिसेंबर २०२५ पर्यंत सुरू राहू शकते, जेणेकरून उन्हाळ्यात पाणीपुरवठा सुरळीत राखता येईल. मुंबईतही भांडुप जलशुद्धीकरण केंद्रातील जलवाहिनी दुरुस्तीमुळे काही भागांमध्ये पाणीकपात झाली होती, पण उरणमधील ही समस्या दीर्घकाळ चालणारी आहे.


उरणमधील रानसाई धरणाचा पाणी साठा सध्या चिंताजनक पातळीवर पोहोचला असून,तो स्थिर ठेवण्यासाठी ही कपात अपरिहार्य झाली आहे.या धरणाची क्षमता कमी असल्यामुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होते आणि आवश्यकतेनुसार साठवणूक करता येत नाही.त्याचाच परिणाम म्हणून दरवर्षी उरणमधील रहिवाशांना पाण्यासाठी हाल करावे लागतात.त्यामुळे उपलब्ध साठा जास्तीत जास्त काळ टिकवण्यासाठी आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.


कधी होणार पाणीकपात?


या पाणीकपातीचा अवलंब दर मंगळवारी आणि शुक्रवारी करण्यात येणार आहे.जून २०२५ पर्यंत पाणी उपलब्ध राहावे, यासाठी ही संवर्धनात्मक रणनीती आखण्यात आली असून, अधिकाऱ्यांनी पुरवठा नियंत्रित ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे.

Comments
Add Comment

Thane News : दिवा येथून ७ वर्षीय चिमुकली बेपत्ता; ३६ तासांच्या प्रयत्नानंतर ठाणे पोलिसांना यश

ठाणे : ठाणे (Thane News) जिल्ह्यातील दिवा परिसरातून बेपत्ता झालेल्या ७ वर्षीय मुलीचा अवघ्या ३६ तासांत शोध घेण्यात ठाणे

Bhiwandi Water : भिवंडीच्या १५ लाख लोकांना २७३ एमएलडी पाणी मिळणार, ४२६ कोटींचा पाणी प्रकल्प

भिवंडी : अमृत अभियान २.० उपक्रमांतर्गत भिवंडी-निझामपूर शहराच्या विस्तारित पाणीपुरवठा योजनेंतर्गत १५ लाख

Actor Sharad Ponkshe : सावरकरांचे विचार विश्व कल्याणाचे - अभिनेते शरद पोंक्षे

ठाणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार कोणीही थांबवू शकत नाही. त्यांचे विचार विश्वकल्याणाचे आहेत. त्यांचे

Mira Road Forced Conversion : लग्नाचे आमिष, धर्मांतराची सक्ती अन् अमानुष मारहाण! मिरा रोडमध्ये हिंदू तरुणीसोबत घडला संतापजनक प्रकार

मुंबई (Mira Road Forced Conversion Case) : मुंबईलगतच्या मिरा रोड (Mira Road) परिसरातील काशीमीरा येथे एका हिंदू तरुणीची मुस्लिम युवकाकडून

Kalyan Crime : प्रेमविवाहाचा राग मनातच ठेवला; साखरपुडा मोडून लग्न केलेल्या मुलीची वडिलांनी केली हत्या

Crime News : कल्याण शहरात नातेसंबंधांना काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली. प्रेमविवाह केल्याच्या रागातून एका

Pune Fugewadi Suspicious Death : तुकाराम मुंढेंचा धडाका! पुण्यात २२ बळी घेणाऱ्या विषारी दारूकांडाचे 'भिवंडी कनेक्शन' उघड;

'रेक्स इंटरनॅशनल'वर छापा टाकत हजारो किलो मिथेनॉल जप्त पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड (Pimpari-Chinchwad) परिसरात गावठी