हाय-प्रोफाइल लग्नातही करण जोहर जेवत नाही; कारण ऐकून बसाल थक्क

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते करण जोहर आपल्या चित्रपटांसोबतच स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखले जातो . अनेकदा स्वतःच्या सवयी, अनुभव आणि वैयक्तिक आयुष्याबाबत तो मोकळेपणाने बोलतो. नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये करण जोहरने स्वतःच्या एका विचित्र सवयीचा खुलासा केला असून, त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.


करण जोहरने सांगितले की तो कितीही मोठ्या, हाय-प्रोफाइल लग्नात गेला तरी तिथे कधीच जेवत नाही. अनेकदा तो लग्न समारंभातून उपाशीच घरी परततो. दरवर्षी अनेक नामांकित सेलिब्रिटींच्या आणि उद्योगपतींच्या लग्नांना उपस्थित राहत असतानाही त्याने ही सवय कायम ठेवली असल्याचे त्याने स्पष्ट केले.


या सवयीमागचं कारण सांगताना करण म्हणाला की लग्नात जेवणासाठी लागणाऱ्या रांगा, हातात प्लेट घेऊन उभं राहणं आणि गोंधळाची परिस्थिती त्याला अजिबात आवडत नाही. “लग्नात जेवण्यासाठी उभं राहणं मला खूप विचित्र आणि अस्वस्थ वाटतं. त्यामुळे मी तिथे जेवण टाळतो,” असं करणने सांगितलं. त्याच्या या विधानानंतर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे.


अलीकडेच करण जोहर उदयपूरमध्ये झालेल्या भारतीय-अमेरिकन उद्योगपती राम राजू मंटेना यांच्या मुलगी नेत्रा मंटेनाच्या भव्य लग्नात होस्ट म्हणून उपस्थित होता. या लग्नात रणवीर सिंग, शाहिद कपूर, माधुरी दीक्षित, वरुण धवन यांसारख्या कलाकारांनी सादरीकरण केलं, तर आंतरराष्ट्रीय गायिका जेनिफर लोपेझनेही कार्यक्रमात रंग भरला.


कामाच्या आघाडीवर करण जोहरचा आगामी रोमँटिक कॉमेडी चित्रपट “तू मेरी मैं तेरा, मैं तेरा तू मेरी” लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, यात कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

Comments
Add Comment

‘पंचायत’ला ६ वर्षे पूर्ण, प्राइम व्हिडिओने केली पाचव्या पर्वाची घोषणा

मुंबई : द वायरल फीवर (टीव्हीएफ) निर्मित ‘पंचायत’च्या पाचव्या पर्वाची निर्मिती दीपक कुमार मिश्रा आणि चंदन कुमार

रहस्य, थरार आणि दमदार स्टारकास्ट सोबत येत आहे 'सालबर्डी'

मुंबई : मराठी चित्रपट त्याच्या आशय विषयासोबतच त्याच्या उच्च निर्मितीमूल्यांसाठी सुद्धा लोकप्रिय आहे.

"देऊळ बंद २" येतोय २१ मे रोजी

मुंबई : २०१५ साली प्रदर्शित झालेल्या "देऊळ बंद" चित्रपटाला प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. अध्यात्म आणि

मातृभूमी’मधील ‘चांद देख लेना’ गाण्याचा मेकिंग व्हिडीओ प्रदर्शित

मुंबई : सलमान खान फिल्म्स संगीतने सर्वांच्या आवडीच्या ‘चांद देख लेना’ या गाण्याचा एक विशेष पडद्यामागील व्हिडीओ

'मराठी माणसाच्या असंख्य आठवणींचे गाठोडे म्हणजे भारतमाता'

मुंबई : लालबाग, परळ आणि गिरणगावातील असंख्य मराठी माणसाच्या आठवणींचे एक मोठे गाठोडे घेऊन भारतमाता सिनेमागृह उभे

Bigg Boss Marathi 6 : शेवटची कॅप्टनसी कोणाला मिळणार ? प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढली

मुंबई : बिग बॉस मराठी ६ सीझन यंदा अनेक गोष्टींमुळे सतत चेर्चेत आहे. आता या सीझनचे काही दिवसच शिल्लक राहिले असून बिग