अंबेजोगाई-लातूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात! तिघांचा जागीच मृत्यू

बीड: अंबेजोगाई-लातूर राष्ट्रीय महामार्गावर स्कॉर्पिओ आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना तातडीने लातूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या भीषण अपघातावर महामार्गाजवळील स्थानिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, बीड- लातूर जिल्ह्याच्या सीमेजवळ काल (१५ डिसेंबर) रात्री स्कार्पिओ गाडी आणि कारचा समोरासमोर धडक झाल्याने हा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये स्कॉर्पिओ गाडीच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला. तर कारचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अपघातात तीन जण जागीच ठार झाले आहेत. तर दोघे गंभीर जखमी झाले आहे.




घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी स्थानिकांनी धाव घेऊन चारचाकीमधील अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. यानंतर माहिती मिळताच तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर अपघातातील जखमींना तातडीने लातूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.


दरम्यान, स्कॉर्पिओ आणि अपघातग्रस्त कार महामार्गावरून बाजूला करण्यात आली आहे. कारण अपघातामुळे महामार्गावर काहीकाळ वाहतूककोंडी झाली होती. तसेच या अपघातात मयत कोणत्या गावचे आहेत? त्यांची ओळख काय? याबाबत अद्याप कोणतीच माहिती मिळू शकली नाही आहे. तरी पोलीस वेगाने चौकशी करत आहेत.

Comments
Add Comment

विद्यार्थ्यांचा अनादर केल्यास शिक्षकांवर होणार कठोर कारवाई

शिक्षण विभागाकडून कठोर नियमावली; सुरक्षेत कसूर झाल्यास शाळा व्यवस्थापन आणि मुख्याध्यापक जबाबदार मुंबई :

धक्कादायक! कर्ज फिटवण्यासाठी केला मृत्यूचा बनाव; एक मेसेज आणि सत्याचा उलगडा

लातूर: फायनान्स कंपनीत काम करणाऱ्या गणेश चव्हाण नावाच्या तरुणाने आपल्याच मृत्यूचा बनाव केल्याची धक्कादायक

आचरसंहिता लागू होताच रोकड जप्त! पुण्यातील कुप्रसिद्ध आंदेकरच्या घरावर पोलिसांचा छापा

पुणे: महाराष्ट्राच्या गुन्हेगारी क्षेत्रात कुप्रसिद्ध असलेला बंडू आंदेकर याच्या घरावर पुणे पोलिसांनी

थेट शर्यतीत पळणाऱ्या बैलांवर भानामती! कोल्हापूरातील स्मशानात आढळून आला अंधश्रद्धेचा प्रकार

कोल्हापूर: अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार कोल्हापूरातून समोर आला आहे. कोल्हापूरातील हातकणंगले तालुक्यातील

घरगुती ग्राहकांसाठी प्रीपेड मीटर नाही : मुख्यमंत्री

नागपूर : राज्यात स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत घेण्यात आला आहे. मात्र, सामान्य

हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले, पुढील अधिवेशन २३ फेब्रुवारीला मुंबईत

नागपूर : नागपुरच्या गुलाबी थंडीत गेल्या एक आठवड्यापासून सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचे सूप अखेर वाजले. पुढील