अंबेजोगाई-लातूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात! तिघांचा जागीच मृत्यू

बीड: अंबेजोगाई-लातूर राष्ट्रीय महामार्गावर स्कॉर्पिओ आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना तातडीने लातूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या भीषण अपघातावर महामार्गाजवळील स्थानिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, बीड- लातूर जिल्ह्याच्या सीमेजवळ काल (१५ डिसेंबर) रात्री स्कार्पिओ गाडी आणि कारचा समोरासमोर धडक झाल्याने हा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये स्कॉर्पिओ गाडीच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला. तर कारचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अपघातात तीन जण जागीच ठार झाले आहेत. तर दोघे गंभीर जखमी झाले आहे.




घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी स्थानिकांनी धाव घेऊन चारचाकीमधील अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. यानंतर माहिती मिळताच तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर अपघातातील जखमींना तातडीने लातूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.


दरम्यान, स्कॉर्पिओ आणि अपघातग्रस्त कार महामार्गावरून बाजूला करण्यात आली आहे. कारण अपघातामुळे महामार्गावर काहीकाळ वाहतूककोंडी झाली होती. तसेच या अपघातात मयत कोणत्या गावचे आहेत? त्यांची ओळख काय? याबाबत अद्याप कोणतीच माहिती मिळू शकली नाही आहे. तरी पोलीस वेगाने चौकशी करत आहेत.

Comments
Add Comment

उन्हाळी सुट्टीत प्रवाशांना दिलासा: मुंबई, पुणे, सोलापूरसह अनेक मार्गांवर उन्हाळी धावणार स्पेशल ट्रेन

पुणे : उन्हाळ्याचे दिवस म्हणजेच सुट्टीचे दिवस, वर्षभर अभ्यास करून दमलेल्या मुलांच्या उन्हाळ्यात परीक्षा संपतात

आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी हरिष भांदिर्गे, बाजार - उद्यान समिती अध्यक्षपदी हेतल गाला

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समिती आणि बाजार व उद्यान समिती अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष

त्र्यंबक-नाशिक कुंभमेळ्यासाठी २२ हजार १८१ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

मुंबई: त्र्यंबक- नाशिक मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन २०२७ मध्ये करण्यात येत असून या कुंभमेळ्यात

मांजरानं पोपटाचा पिंजरा पाडला, दोन शेजाऱ्यांतला वाद हाणामारीपर्यंत गेला

पुणे : पुणे तिथे काय उणे असं म्हणतात , हे अगदी बरोबर कारण आता तिथे गुन्हेगारीच्याही काही कमतरता उरलेल्या नाही आहेत.

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक