मणिपूरमध्ये १४ दहशतवाद्यांना अटक, मोठा शस्त्रसाठा जप्त

इंफाळ : भारतीय लष्कर, आसाम रायफल्स आणि मणिपूर पोलीस यांनी डोंगराळ भागात संयुक्त कारवाई केली. या कारवाईत सुरक्षा यंत्रणेने १४ दहशतवाद्यांना अटक केली. मणिपूरमधील सहा जिल्ह्यांमधील डोंगराळ भागात सुरक्षा यंत्रणेने एकाचवेळी कारवाई केली. अटक केलेल्या दहशतवादी भारत विरोधी कारवायांमध्ये सहभागी होते, अशी माहिती सुरक्षा यंत्रणेने दिली आहे.


सुरक्षा यंत्रणेने अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून २१ शस्त्रे, स्फोटक साहित्य, बंदी असलेल्या वस्तू आणि युद्धासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले आहे. राज्यात सुरू असलेल्या हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरक्षा यंत्रणेने ठिकठिकाणी धडक कारवाई सुरू केली आहे. या कारवायांना ताज्या जप्ती आणि अटकसत्रामुळे मोठे यश मिळाले आहे.


गुप्तचरांनी दिलेल्या माहितीआधारे ही कामगिरी करण्यात आली. अचूक नियोजन केल्यामुळे कमी कालावधीत सुरक्षा यंत्रणेने प्रभावी कामगिरी केली. मणिपूरमध्ये शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी अशा मोहिमा पुढेही सुरू राहतील, असे सुरक्षादलांनी सांगितले आहे.


दरम्यान, मणिपुरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी लष्करी कारवाईसोबतच राजकीय पातळीवरही प्रयत्न सुरू आहेत. मे २०२३ नंतर प्रथमच कुकी आणि मैतेई समुदायातील भाजप आमदारांनी दिल्लीत बैठक घेतली. फेब्रुवारीपासून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असून या घडामोडींमुळे सरकार स्थापनेबाबत चर्चांना वेग आला आहे.

Comments
Add Comment

Bank Holiday Today : आज देशातील 'या' राज्यांमध्ये बँका बंद; RBI Holiday List तपासा

नवी दिल्ली : बँकेच्या शाखेत जाऊन महत्त्वाचे काम करण्याचा विचार करत असाल, तर आधी आज बँका सुरू आहेत की बंद हे तपासून

Shopian Terror Case : जम्मू आणि काश्मीरच्या शोपियानमध्ये तीन संशयितांना अटक, हँड ग्रेनेड आणि पोस्टर्स जप्त

श्रीनगर : काश्मिरी पंडितांना असलेला धोका आणि दक्षिण काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेच्या

Dattatray Bharne : पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; अतीउत्कृष्ट कामासाठी प्रथम पुरस्काराने सन्मान

“पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती”:

Artificial Intelligence : शिक्षणात AI चा वाढता प्रभाव, भारताची शैक्षणिक व्यवस्था आता बदलणार

मुंबई : AI आता फक्त तंत्रज्ञान क्षेत्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. ते थेट वर्गखोल्यांपर्यंत पोहोचलं आहे. पण

Kashmiri Pandit Threat Letter : काश्मिरी पंडितांना १५ दिवसांत दुसऱ्यांदा धमकीचं पत्र; वैयक्तिक माहिती व्हायरल, सुरक्षा यंत्रणा सतर्क

काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काश्मिरी

Tamil Nadu Gold Ring Scheme : ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर; ७५५ कोटींचा खर्च, ‘या’ बाळांना मिळणार १ ग्रॅम सोनं!

चेन्नई : तामिळनाडू सरकारने तब्बल ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर दिल्याने सध्या या निर्णयाची चर्चा सुरू