पुण्यात राजगुरूनगरमध्ये कोचिंग क्लासमध्ये विद्यार्थ्याचा मित्रावर चाकूने हल्ला; मित्राचा उपचारादरम्यान मृत्यू

पुणे : शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळख मिरवणाऱ्या पुण्याची प्रतिमा वाढत्या गुन्हेगारीमुळे मलिन होऊ लागली आहे. ताजी घटना पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगरची आहे. राजगुरूनगरमध्ये खासगी कोचिंग क्लासमध्ये दहावीच्या विद्यार्थ्याची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. भर दिवसा हा थरकाप उडवणारा प्रकार घडला.


राजगुरूनगरमधील मांजरेवाडी परिसरात असलेल्या संस्कार कोचिंग क्लासेसमध्ये दुपारच्या सुमारास हत्या झाली. दहावीचा वर्ग सुरू होता. शिक्षक शिकवत होते. क्लासचा दहावीचा वर्ग सुरू असताना बेंचवर बसलेल्या एका विद्यार्थ्यावर त्याच वर्गातील विद्यार्थ्याने अचानक चाकूने हल्ला केला. आरोपी विद्यार्थ्याने गळ्यावर आणि पोटात अनेक वार केल्याने दुसरा विद्यार्थी गंभीर जखमी झाला. पुरता रक्तबंबाळ झाला. याच अवस्थेत जखमी विद्यार्थ्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. उपचार सुरू असतानाच विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. तोपर्यंत हल्लेखोर विद्यार्थी दुचाकीवरून घटनास्थळावरून फरार झाला.


घटनेची माहिती मिळताच राजगुरूनगर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला आहे. पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांनी सांगितले की, ही घटना खासगी कोचिंग क्लासमध्ये घडली असून आरोपी आणि मृत विद्यार्थ्यामध्ये पूर्वी काही वाद होता का, या दृष्टीने तपास केला जात आहे. दोघेही अल्पवयीन असल्याने तपास अधिक संवेदनशील पद्धतीने सुरू आहे.


सध्या शाळा आणि क्लास सुटण्याच्या वेळेत परिसरात पोलीस बंदोबस्त आणि पेट्रोलिंग वाढवण्यात आले आहे. या हल्ल्यामागील नेमकं कारण काय, याचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे राजगुरूनगर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून खासगी कोचिंग क्लासमधील सुरक्षा व्यवस्था, प्रवेश नियंत्रण आणि विद्यार्थ्यांवर असलेली देखरेख यावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.



पालकांमध्ये भीतीचं वातावरण


या धक्कादायक घटनेनंतर पालकांमध्ये मोठी भीती पसरली आहे. अनेक पालक शाळा आणि क्लास सुटण्याच्या वेळी स्वतः उपस्थित राहून आपल्या पाल्यांना घरी घेऊन जाताना दिसत आहेत. शैक्षणिक संस्थांमधील सुरक्षा व्यवस्था मजबूत करा, क्लासमध्ये कडक नियम लागू करा आणि अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकरवी ठोस उपाययोजना करा; अशी मागणी पालकांकडून होत आहे. शाळा आणि क्लासच्या बाहेर विद्यार्थ्यांमध्ये वाढत चाललेल्या हाणामाऱ्या थांबवण्यासाठीही त्वरित कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

Comments
Add Comment

Healthy Monsoon Diet : पावसाळ्यात कोणते पदार्थ खावेत आणि कोणते टाळावेत?

पावसाळा (Monsoon) सुरू झाला की वातावरण आल्हाददायक होतं, पण या दिवसांत आरोग्याची विशेष काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं

Nashik : FDA अधिकाऱ्यांच्या नावाखाली खंडणी ! शहरात FDA च्या धाडी सुरू असताना तोतया अधिकाऱ्यांचा प्रताप

Nashik : अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाकडून राज्यभर भेसळविरोधी धाडींचे सत्र सुरू असताना, याच परिस्थितीचा गैरफायदा घेत

Riteish Deshmukh : पत्रकाराच्या एका प्रश्नाने रंगला वाद; रितेश देशमुखचा व्हिडिओ व्हायरल

अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) सध्या त्याच्या नव्या रिअॅलिटी शोमुळे चर्चेत आला आहे. नेटफ्लिक्सवरील ‘लॉक अप: सच या

Nashik : वणी येथे मंडप काढताना विजेचा धक्का लागून मंडप व्यावसायिकाचा मृत्यू

दिंडोरी : वणी येथे लग्नाचा मंडप काढण्यासाठी गेलेल्या मंडप व्यावसायिकाचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू

Nashik : नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी महावितरणाची 'तारीख पे तारीख'; मंत्री भुजबळांच्या शिफारस पत्राला महावितरणकडून केराची टोपली

Nashik : लोकप्रतिनिधींच्या पत्रालाही किंमत नाही आणि सामान्य जनतेच्या हक्काचीही दखल घेतली जात नाही, असा संतापजनक

Badlapur Accident : भरधाव BMW रस्त्यावर पलटली; भीषण अपघातात दोन जण ठार

बदलापूर : बदलापूर (Badlapur) परिसरात रविवारी पहाटे झालेल्या भीषण रस्ते अपघातात (Accident) दोन तरुणांचा मृत्यू (Death) झाला असून